एक्स्प्लोर

शेतकरी संपाच्या आडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव : मुख्यमंत्री

मुंबई : शेतकऱ्यांच्या संपाआडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव आहे. शेतकरी आणि पोलिसांची झटापट होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडावी, असं त्यांचं नियोजन आहे, असा गंभाीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, चर्चेने तोडगा काढू. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मात्र या संपाद्वारे शेतकऱ्यांनाच वेठीस धरलं जात आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. "संपामुळे शेतकऱ्यांचंच नुकसान होत आहे. शेतकऱ्याचं दूध, भाजीपाला अडवला जात आहे. संघर्ष यात्रेला प्रतिसाद न मिळाल्याने, आता शेतकऱ्यांच्या आडून हिंसेचा डाव आखला जात आहे", असा गंभीर आरोपही मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केला. राज्य सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले आहेत. यापुढेही शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यावर मार्ग काढू, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. दगडफेकीमागे राजकीय पक्षांचा हात शेतकरी संपादरम्यान अहमदनगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात दगडफेकीच्या घटना घडल्या. मात्र या  दगडफेकीच्या घटनांमागे राजकीय कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. दगडफेक करणारे शेतकरी नाहीत, त्यांच्यामागे काही राजकीय लोक आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. दुधाला भाव द्या अहमदनगर जिल्ह्यातील दूध खरेदी नाकारणाऱ्या दूध संघांनाही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं. दुधाला दूध संघांनीच योग्य भाव द्यावा. कारण नगर जिल्ह्यात दूध संघ  25 रुपयांनी दूध खरेदी करुन, तेच दूध मुंबईत 60 रुपयांनी विकतात. त्यामुळे दूध संघांनीच योग्य भाव द्यावा, असं आवाहन  मुख्यमंत्र्यांनी केलं. सरसकट कर्जमाफी अशक्य सरसकट कर्जमाफी कुठल्याही सरकारला शक्य नाही. यूपीएच्या काळात कर्जमाफी झाली त्यावेळी महाराष्ट्रात सात हजार कोटी रुपयांची आणि 30 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती.  सरसकट कर्जमाफीची भावना तयार केल्याने नियमिय कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना परावृत्त केल्याने, बँका अडचणीत येतील. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत होईल असा निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही शेतकरी कर्जमाफीला नाही म्हटलेलं नाही. राज्य सरकार 31 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना बनवत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
  • मी एकटा पडल्याचं कारण नाही. राज्य सरकार चालवणं सामूहिक जबाबदारी आहे. काही जण आपली जबाबदारी झटकत असतील, पण आम्ही आमची जबाबदार पार पाडू : मुख्यमंत्री
  • आम्ही चर्चेची दारं उघडी ठेवलेली आहे, शेतकऱ्यांनी चर्चा करावी : मुख्यमंत्री
  • संप फार काळ चालणं शेतकऱ्यांच्या हिताचं नाही. त्यामुळे नुकसान शेतकऱ्यांचंच आहे. आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर मार्ग निघावा : मुख्यमंत्री
  • दगडफेक करणारे शेतकरी नाहीत, त्यांच्यामागे काही राजकीय लोक आहेत - मुख्यमंत्री
  • नियमित कर्ज भरणाऱ्यांचाही राज्य सरकार निश्चितच विचार करेल - मुख्यमंत्री
  • सरसकट कर्जमाफी कुठल्याही सरकारला शक्य नाही : मुख्यमंत्री
  • UPA च्या काळातील कर्जमाफी झाली त्यावेळी महाराष्ट्रात सात हजार कोटी रुपयांची आणि 30 लाख शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली होती : मुख्यमंत्री
  • सरसकट कर्जमाफीची भावना तयार केल्याने नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना परावृत्त करणे आणि बँका अडचणीत येतील : मुख्यमंत्री
  • नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत होईल असा निर्णय घेऊ : मुख्यमंत्री
  • 15 जूनपर्यंत तूर खरेदीला वाढ देण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. विश्वास आहे की ही वाढ मिळेल : मुख्यमंत्री
  • काही राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे की हे आंदोलन चिघळावं : मुख्यमंत्री
  • डाळींचे भाव, शेतमालाचे भाव गेल्या सरकरच्या तुलनेत अधिक आहेत : मुख्यमंत्री
  • तुलनात्मक दृष्ट्या या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले : मुख्यमंत्री
  • दुधाचे भाव 4 रुपयांनी वाढले आणि ते आणखी वाढले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील : मुख्यमंत्री
  • आरे चे नवीन ब्रँड आम्ही आणतोय जे मार्केटमध्ये येतील : मुख्यमंत्री
  • सातत्याने दुष्कळ असून कृषीचा विकासदर साडे बारा टक्क्याने वाढलाय : मुख्यमंत्री
  • जे संप करतायेत त्यांना आवाहन करतो की राज्य सरकारसोबत काम करावं, त्यांची मदत आणि सल्ले आम्ही घेऊ इच्छितो : मुख्यमंत्री
  • पुढचे 2 ते 3 वर्षे विकासदर ठेऊ शकलो तर शेतकऱ्याला निश्चित फायदा होईल : मुख्यमंत्री
  • उत्पादकतेत महाराष्ट्र खाली असल्याने हमी भाव परवडत नाही, त्यामुळे उत्पादकता वाढवण्याचं काम आम्ही करतोय : मुख्यमंत्री
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
MI vs RCB Live Score : वानखेडे हादरलं! सॉल्ट-पाटीदार-कोहलीचा वादळी शो; मुंबईसमोर 241चं भलंमोठं लक्ष्य, जाणून घ्या LIVE अपडेट्स
MI vs RCB IPL 2026 Live Update : वानखेडे हादरलं! सॉल्ट-पाटीदार-कोहलीचा वादळी शो; मुंबईसमोर 241चं भलंमोठं लक्ष्य, जाणून घ्या LIVE अपडेट्स
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा फिस्कटली, आता ट्रम्प पुढे काय करणार? होर्मुझ संदर्भात मोठी घोषणा
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा फिस्कटली, आता ट्रम्प पुढे काय करणार? होर्मुझ संदर्भात मोठी घोषणा
Digvesh Rathi Celebration : स्टाईल जुनीच पण अंदाज नवा; दिग्वेश राठीने पुन्हा काढली 'ती' वादग्रस्त डायरी... पण यावेळी नक्की कोणाचं नाव लिहिलं?
स्टाईल जुनीच पण अंदाज नवा; दिग्वेश राठीने पुन्हा काढली 'ती' वादग्रस्त डायरी... पण यावेळी नक्की कोणाचं नाव लिहिलं?

व्हिडीओ

Raj Thackeray On Asha Bhosle : भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्त्वाचा घटक आज आपल्यातून गेला
Sanjay Raut PC : फडणवीसांना शिकारीचा नाद! टप्प्यात आली की बार उडवणार; खरात फाईल्सवरून राऊतांची टीका
Asha Bhosle Passes Away : पार्श्वगायिका आशा भोसलेंचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Iran US Talks Fail : इराण- अमेरिका युद्धावर चर्चा समाप्त, चर्चा निष्फळ, आता पुढे काय?
Asha Bhosle News : ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
Iran War Live Update: आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं...; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं..; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली "आशा''
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
Embed widget