एक्स्प्लोर

छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श घोटाळ्याचा आणखी एक बळी, 14 लाखांच्या ठेवीच्या धक्क्यामुळे हृदयविकाराचा झटका

Adarsh Scam : मयत श्रीनिवास तोतला यांच्यावर गेल्या 22 दिवसापासून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते.

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) आदर्श घोटाळ्याचा (Adarsh Scam) आणखी एकाचा बळी गेला आहे. आदर्श सहकारी पतसंस्थेत ठेवीदार असलेल्या निवास कन्हैयालाल तोतला (वय 78 वर्षे) यांचे आज निधन झाले आहे. आदर्श सहकारी पतसंस्थेत त्यांचे 14 लाख रुपये जमा होते. मात्र, आदर्शमध्ये घोटाळा समोर आल्यानंतर तोतला यांना मानसिक धक्का बसला होता. या मानसिक धक्क्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते कोमात गेले होते. गेल्या 22 दिवसापासून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, अखेर आज सकाळी 9 वाजता त्यांचे निधन झाले. विशेष म्हणजे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी काही दिवसांपूर्वी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. 

छत्रपती संभाजीनगर आदर्श सहकारी पतसंस्थेत तब्बल 200 कोटींचा घोटाळा समोर आला आहे. त्यामुळे हजारो ठेवीदार सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात या प्प्रकरणी अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आदर्श नागरी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाने ठराविक ठेवीदारांना नियमबाह्य कर्जाची खैरात वाटल्याचे तपासातून समोर आले होते. या  प्रकरणी मुख्य आरोपी अंबादास मानकापेसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, तपास वेगाने होत नसून, यातील अनेक आरोपी अजूनही फरार असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, याच मानसिक धक्क्यामुळे श्रीनिवास तोतला यांना हृदयविकाराचा झटका आला होता. गेल्या 22 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. 

यापूर्वी दोघांचा मृत्यू...

आदर्श घोटाळ्यात तोतला यांचा हा तिसरा बळी आहे. यापूर्वी एकाने आत्महत्या केली होती, तर दुसऱ्याचा ठेव बुडण्याच्या धास्तीने मानसिक तणावातून मृत्यू झाला होता. पतसंस्थेत 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने लाडगाव येथील 38 वर्षीय रामेश्वर नारायण इथर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर आदर्श बँकेत ठेवलेली 27 लाखांची ठेव बुडण्याच्या धास्तीने मानसिक तणावात करमाड भागातील भानुदास उकर्डे यांचा ठेव बुडण्याच्या धास्तीने मानसिक तणावातून मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबियांची जवळपास 1 कोटी रुपयांची ठेव बँकेत आहे. आधीच दोघांचा बळी गेला असतांना आता तोतला यांचा देखील मृत्यू झाला आहे. 

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली दखल...

दोन दिवसांपूर्वीच ठेवीदारांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आदर्श सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी मोर्चा काढला होता.  खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान यावेळी ठेवीदार यांच्यासह जलील यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने गोंधळ उडाला होता. शेवटी याची दखल मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आदर्शच्या मानकापेची मालमत्ता जप्त करुन ठेवीदारांची रक्कम परत देऊ असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जलील यांनी रुग्णालयात जाऊन श्रीनिवास यांची भेट घेतली होती. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने आदर्शच्या ठेवीदारांमध्ये मोठा संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या: 

Adarsh Scam : आदर्श घोटाळ्याचा दुसरा बळी, पैसे बुडण्याच्या धास्तीने ठेवीदाराचा तणावातून मृत्यू

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Embed widget