एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Aurangabad: औरंगाबाद शहरातील 'कचरा कोंडी'चा प्रश्न मिटला; सफाई कामगारांचे आंदोलन मागे

Aurangabad News: अखेर वेतनाचा मुद्दा मार्गी निघाल्याने सफाई कामगारांनी आंदोलन मागे घेतली आहे. 

Aurangabad News: औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) कचरा कोंडीचा मुद्दा देशभरात गाजला होता. तर कचऱ्याच्या मुद्द्यावरून याच औरंगाबादेत दंगल झाली होती. आता पुन्हा एकदा मंगळवारी औरंगाबाद शहरात 'कचरा कोंडी' निर्माण झाली होती. महापालिकेच्या घंटागाड्यांवरील कामगारांनी मंगळवारी अचानक काम थांबवले.  कंत्राटदार रेड्डी कंपनीने दोन महिन्यांचे वेतन थकविल्याने कामगारांनी हे आंदोलन पुकारले होते. त्यामुळे दिवसभर शहरात कुठेही घंटागाडी फिरकली नव्हती. मात्र अखेर वेतनाचा मुद्दा मार्गी निघाल्याने कामगारांनी आंदोलन मागे घेतली आहे. 

औरंगाबाद महापालिकेने शहरातील कचरा संकलन व वाहतुकीचे काम बंगळुरू येथील रेड्डी कंपनीला दिले आहे. संकलित होणाऱ्या कचऱ्याचे मोजमाप करून त्यानुसार महापालिकेकडून कंपनीला बिल अदा करण्यात येते. एक टन कचऱ्यासाठी 1950 रुपये या दराने महापालिका हा मोबदला देण्यात येते. तर यासाठी रेड्डी कंपनीने कंत्राटी पद्धतीने 1000 कामगारांची नियुक्ती केली आहे. तसेच कचरा संकलनासाठी 300 घंटागाड्या, 18 कॉम्पॅक्टर आणि 12 टिप्पर ही वाहने लावली आहेत. मात्र कंपनीचे दोन महिन्याचे बिल काढणे बाकी असल्याने, कामगारांचे दोन महिन्याचे वेतन थकले होते. त्यामुळे सफाई कामगारांनी आंदोलन करत कचरा संकलन करण्याचे काम बंद केले होते. त्यामुळे शहरात कचरा कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिस्थिती लक्षात घेता महानगरपालिकेने तातडीने एका महिन्याचे बिल काढण्याचे आदेश दिल्याने कामगारांनी आंदोलन मागे घेतले आहे. 

जी- 20  पार्श्वभूमीवर आंदोलन? 

औरंगाबाद शहरात फेब्रुवारी महिन्यात जी-20 परिषदेचे सदस्य येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील साफसफाई आणि स्वच्छतेच्या कामांकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच भाग म्हणून महापालिकेने कंपनीला आणखी 20 घंटागाड्या वाढविण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार 14 घंटागाड्या आणल्या. मात्र, आता अशातच मंगळवारी अचानक कंपनीच्या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून दिवसभर शहरातील कोणत्याही भागात घंटागाड्या फिरकल्याच नाहीत. त्यामुळे जी- 20  च्या पार्श्वभूमीवर होणारे हे आंदोलन लक्षात घेता मनपाने एका महिन्याचे कंपनीचे बिलतत्काळ देण्याचे आदेश दिले आहेत.  

दोन महिन्याचे बिल थकले! 

रेड्डी कंपनीकडून शहरात दररोज सरासरी चारशे ते साडेचारशे टन कचरा संकलित केला जातो. एक टन कचरा उचलण्यासाठी महापालिका कंपनीला 1950 रुपये अदा करते. नोव्हेंबर महिन्याच्या बिलाची आकारणी 2 कोटी 26 लाख रुपये एवढी झालेली आहे. डिसेंबर महिन्याच्या बिलाचा हिशेब अजून होणे बाकी आहे, परंतु तेही जवळपास सव्वादोन कोटींच्या आसपास असेल असे घनकचरा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र यातील एका महिन्याचे बिल तत्काळ काढण्याचे आदेश देण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Aurangabad News : औरंगाबादेत लागलेल्या आगीत पाच दुकाने जळून खाक, अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
Tomato Price : टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines TOP Headlines 11 AM 06 October 2024Nitin Gadkari Sangli : मुंबई-पुणे-बंगळूर महामार्ग बांधणार, पाच ठिकाणी उतरणार विमानRamRaje Nimbalkar Join NCP | तुतारी हाती घ्यायची का? असं विचारताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोषRaj Thackeray Nashik : मनसेच्या 500 पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे देणार कानमंत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
Tomato Price : टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
Mangal Gochar 2024 : दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Ahmednagar News : मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Embed widget