एक्स्प्लोर

हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?

Chhatrapati Sambhajiraje : अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम 8 वर्षानंतर देखील सुरु झाले नसल्याने छत्रपती संभाजीराजे आक्रमक झालेत.

मुंबई : अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या स्मारकाचे काम 8 वर्षा नंतर देखील सुरु झाले नसल्याने स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे आक्रमक झालेत. संभाजीराजे यांनी चला अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला अशी हाक दिली आहे. छत्रपती संभाजीराजे आज मुंबईत अनोखे आंदोलन करणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारचे हेच का अच्छे दिन? असे म्हणत संभाजीराजेंनी एल्गार केलंय. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन केले जाणार आहे.

काही वेळातच संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील नेरुळ येथील डी वाय पाटील युनिव्हर्सिटी जवळून या रॅलीला सुरुवात होणार असून याठिकाणी कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली आहे. शेकडो गाड्यांचा ताफा नेरुळ येथे जमला असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. यापुढे फसव्या आश्वासनांची पोलखोल स्वराज्य पक्षातर्फे करण्यात येईल, असा इशारा स्वराज्य पक्षाकडून देण्यात आला आहे.

संभाजीराजे यांची पोस्ट चर्चेत

छत्रपती संभाजीराजे यांनी समाजमाध्यमावर काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर करत राज्य सरकारवर निशाणा साधला होता. त्यात म्हटले होते की, #चलो_मुंबई... अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. २४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप – शिवसेना प्रणित महायुती सरकारने अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले. स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही… चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला…, असे त्यांनी म्हटले होते. 

स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्रभरातून मुंबईत दाखल होत आहेत. नाशिकसह विविध जिल्ह्यातून शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मुंबई कडे रवाना झाला आहे. या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आंदोलकाना अडवण्याची तयारी 

आंदोलक गेटवे ऑफ इंडिया परिसरात येऊन त्यानंतर बोटीने समुद्रात जाणार असल्याने पोलिसांनी डीजी ऑफिस समोरच आंदोलकाना अडवण्याची तयारी केली आहे. स्वतः या परिसरातले डीसीपी प्रवीण मुंडे उपस्थित असून स्थानिक पोलिसांसोबतच राज्य राखीव पोलीस दल शीघ्रकृती दलाचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

आणखी वाचा 

Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मेल्यानंतर आपलं अंत्यदर्शन घ्यायला किती लोक येतील? पठ्ठ्याने स्वतःची अंत्ययात्रा काढली, सत्य समजल्यावर लोकांनी...
मेल्यानंतर आपलं अंत्यदर्शन घ्यायला किती लोक येतील? पठ्ठ्याने स्वतःची अंत्ययात्रा काढली, सत्य समजल्यावर लोकांनी...
शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता 2 लाख रुपये अनुदान; योजनेत मोठा बदल, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती
शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता 2 लाख रुपये अनुदान; योजनेत मोठा बदल, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती
Madhuri Dixit: या मुलीमुळं एका रात्रीत माधुरी दीक्षितचं नशीब बदललं! धक-धक गर्लच्या कारकिर्दीत सर्वात मोठा टर्निंग पाँईंट
या मुलीमुळं एका रात्रीत माधुरी दीक्षितचं नशीब बदललं! धक-धक गर्लच्या कारकिर्दीत सर्वात मोठा टर्निंग पाँईंट
Bihar Election 2025: बिहारमध्ये निकराची लढाई होणार? सी व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुखांचा धक्कादायक दावा
बिहारमध्ये निकराची लढाई होणार? सी व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुखांचा धक्कादायक दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis On MVA : म्हणून शरद पवार आज त्यांच्यासोबत गेले नाहीत
Voter List Scam: मतदार यादीत घोळ, ठाकरे बंधू आक्रमक, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
Bacchu Kadu Farmers Protest : बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली नागपूरात भव्य एल्गार मोर्चा
ST Bank Scam : अपमानास्पद बोलल्याचा आरोप, ST बँक बैठकीत सदावर्ते आणि शिंदे गट भिडले
ST Bank Clash: 'तोंडं बंद करण्यासाठी बाहेरची माणसं पाठवली', आनंदराव अडसूळ यांचा सदावर्तेंवर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मेल्यानंतर आपलं अंत्यदर्शन घ्यायला किती लोक येतील? पठ्ठ्याने स्वतःची अंत्ययात्रा काढली, सत्य समजल्यावर लोकांनी...
मेल्यानंतर आपलं अंत्यदर्शन घ्यायला किती लोक येतील? पठ्ठ्याने स्वतःची अंत्ययात्रा काढली, सत्य समजल्यावर लोकांनी...
शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता 2 लाख रुपये अनुदान; योजनेत मोठा बदल, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती
शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता 2 लाख रुपये अनुदान; योजनेत मोठा बदल, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती
Madhuri Dixit: या मुलीमुळं एका रात्रीत माधुरी दीक्षितचं नशीब बदललं! धक-धक गर्लच्या कारकिर्दीत सर्वात मोठा टर्निंग पाँईंट
या मुलीमुळं एका रात्रीत माधुरी दीक्षितचं नशीब बदललं! धक-धक गर्लच्या कारकिर्दीत सर्वात मोठा टर्निंग पाँईंट
Bihar Election 2025: बिहारमध्ये निकराची लढाई होणार? सी व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुखांचा धक्कादायक दावा
बिहारमध्ये निकराची लढाई होणार? सी व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुखांचा धक्कादायक दावा
Bihar Election 2025 : नितीश कुमारांच्या जदयुकडून 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; विधानसभेच्या मैदानात एकही मुस्लिम नाही
नितीश कुमारांच्या जदयुकडून 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; विधानसभेच्या मैदानात एकही मुस्लिम नाही
Pune : 27 वर्षांपासून कोर्टात हेलपाटे, न्यायाची प्रतिक्षाच; पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन
27 वर्षांपासून कोर्टात हेलपाटे, न्यायाची प्रतिक्षाच; पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन
तामिळनाडू सरकार हिंदीवर बंदी घालणारे विधेयक आणणार, हिंदी गाणी आणि होर्डिंग्जवरही बंदी
तामिळनाडू सरकार हिंदीवर बंदी घालणारे विधेयक आणणार, हिंदी गाणी आणि होर्डिंग्जवरही बंदी
Bihar Election : चिराग पासवान आशावादी असलेल्या 5 जागांवर जदयूचे उमेदवार, नितीशकुमार यांच्याकडून पहिल्या यादीत मोठी खेळी
चिराग पासवान आशावादी असलेल्या 5 जागांवर जदयूचे उमेदवार, नितीशकुमार यांच्याकडून पहिल्या यादीत मोठी खेळी
Embed widget