एक्स्प्लोर

Sant Nivruttinath Palkhi : 'जातो माघारी विठुराया, तुझे दर्शन झाले आता! संत निवृत्तीनाथांची पालखी निघाली त्र्यंबकेश्वरला!  

Sant Nivruttinath Palkhi : विठुरायाचा निरोप घेत संत निवृत्तीनाथांची दिंडी (Sant Nivruttinath Palkhi) पालखीने आजपासून परतीचा प्रवास सुरु केला आहे.

Sant Nivruttinath Palkhi : विठू दर्शन झाले, सुख ओंजळीत आले! ध्यास लागला नामाचा, आता येतो पंढरीनाथा' अशा भावपूर्ण वातावरणात विठुरायाचा निरोप घेत पंढरपूरातून संत निवृत्तीनाथांची दिंडी (Sant Nivruttinath Palkhi) पालखीने आजपासून परतीचा प्रवास सुरु केला आहे. जवळपास सतरा दिवसांच्या प्रवासानंतर दिंडी त्र्यंबकेश्वरला पोहचणार आहे. डोळ्याच्या कडा ओल्या करत वारकऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे.

संत निवृत्तीनाथांच्या पालखीसह राज्यभरातून दिंड्या पंढरपुरात (Pandharpur) दाखल झाल्या होत्या. पंचवीस सव्वीस दिवसांच्या पायी प्रवासानंतर दिंड्या पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासासाठी दाखल झाल्या होत्या. संत निवृत्तीनाथांची दिंडी 2 जूनला पंढरपूरकडे निघाली होती. सिन्नर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर आदी प्रवास करत पंचवीस दिवसांनंतर नाथांची पालखी पंढरपुरात पोहचली होती. आषाढीला पंढरीत गर्दीचा महापूर उसळला होता. मात्र हळूहळू वारकऱ्यांनी परतीचा प्रवास सुरु केला आहे. त्यानुसार नाथांची पालखीने देखील आज पंढरपूरातून त्र्यंबकेश्वरकडे (Trimbakeshwer) प्रस्थान केले आहे. 

आज सकाळी मोठ्या उत्साहात काल्याचे कीर्तन पार पडले. यानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरातून त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ झाली आहे. यावेळी पंढरपूर नगरीतून माघारी जाताना वारकऱ्यांचे हृदय दाटून येत जड अंतःकरणाने पांडुरंगाला निरोप देताना अनेकांच्या भावनांचा बांध फुटत होता. नगरप्रदक्षिणेनंतर 1 जुलैला शनिवारी बहुतेक पालख्या माघारी गेल्या. परंतु संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी पुनवेची लाही घेतल्याखेरीज माघारी जात नसल्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार पौर्णिमेला काल्याच्या प्रसादानंतर आज 3 जुलैला पालखीचे प्रस्थान झाले आहे. जवळपास सतरा दिवसांचा परतीचा प्रवास करून 20 जुलैला पालखी त्र्यंबकेश्वर नगरीत पोचणार आहे.  तसेच श्री संत मुक्ताई पालखीचे (Sant Muktabai Palkhi) देखील पंढपूरवरून मुक्ताईनगरकडे प्रस्थान झाले आहे. 

असा असणार परतीचा प्रवास 

आज संत निवृत्तीनाथांची दिंडी पालखीचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यानुसार आज पंढरपूरातून दिंडी मार्गस्थ झाली आहे. दुपारी भटउंबरे गावी दुपारचे जेवण करून तुळशी गावात मुक्कामी जाणार आहे. त्यानंतर 04 जुलै रोजी तुळशी गावातून प्रस्थान करत पुढे वरवडे गावात दुपारचे जेवण त्यानंतर पिंपळनेर गावी मुक्कामी जाणार आहे. 05 जुलै रोजी पिंपळनेर गावातून पुढे जात लिमगाव येथे दुपारचे जेवण करून रात्री मुक्कामाला केमला जाणार आहे. त्यानंतर 06 जुलै रोजी केम येथून निघून दुपारी मलवडी , तर रात्री झरे येथे मुक्काम होईल. 07 जुलै रोजी झरे येथून निघून करमाळा येथील देवळाली येथे दुपारचे जेवण त्यानंतर जातेगावात मुक्कामी जाईल. 08 जुलै रोजी जातेगावातून निघून पाटेवाडी चापडगाव येथे दुपारचे जेवण करून पुढे बाभुळगावला मुक्काम होईल. 

त्यानंतर 09 जुलै रोजी बाभुळगावातून पुढे मार्गक्रमण करत घोगरगावला दुपारचे जेवण होईल, त्यानंतर मुक्कामाला वाटेफळला जाईल. 10 जुलै रोजी वाटेफळ येथून निघून शिरढोणला दुपारचे जेवण करून दिंडी अहमदनगरला मुक्कामी पोहचेल. 11 जुलै रोजी नगर मुक्कामानंतर विळद मार्गे नांदगाव येथे मुक्काम होईल. 12 जुलै रोजी नांदगाव येथून निगुन राहुरीला दुपारचे जेवण झाल्यानंतर गुहा येथे त्या दिवशीचा मुक्काम होईल. 13 जुलै रोजी गुहा येथून निघून दुपारी कोल्हार येथे जेवण करून मुक्कामासाठी दिंडी गोगलगावी पोहचेल. 14 जुलै रोजी गोगलगाव येथून निघून वडझरीमार्गे नान्नजला पोहचेल. त्यानंतर 15 जुलै रोजी नान्नजवरून निघालेली दिंडी पिंपळे, निमोण मार्गे सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटेला मुक्कामी येईल. 

त्यानंतर 16 जुलै रोजी नाथांची दिंडी नांदूर शिंगोटेहून निघून दोडी ला मुक्काम असेल. त्यानंतर 17 जुलै रोजी दोडी येथून निघून दुपारचे जेवण गोंदे येथे करून दिंडी सिन्नरला मुक्कामी पोहचेल. त्यानंतर 18 जुलै रोजी सिन्नर येथून मार्गक्रमण करत दिंडी चिंचोली येथे दुपारचे जेवण करून पुन्हा चेहेडीला मुक्कामी जाईल. 19 जुलै रोजी चेहेडी येथून दिंडी दुपारी देवळाली गावात पोहचेल. देवळाली येथून पुढे त्र्यंबक रस्त्यावरील पिंपळगाव बाहुला येथे मुक्कामी पोहचेल. 20 जुलै रोजी पिंपळगाव बहुला येथील मुक्कामांनंतर नाथांची दिंडी महिरावणी मार्गे सायंकाळी त्र्यंबकेश्वरला पोहचेल. 

Aashadhi Wari 2023: विठ्ठल भेटीची ओढ... आज संतांच्या पालखी सोहळ्यासोबतच लाखो वैष्णवांच्या मेळ्याचा पंढरीत प्रवेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Nashik News : सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
Jitendra Awhad : संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04PM 18 February 2024ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 18 February 2024Supriya Sule Meet Mahadev Munde : सुप्रिया सुळेंची दिवंगत महादेव मुंडेच्या घरी सांत्वनपर भेटSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Nashik News : सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
Jitendra Awhad : संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
Nashik Godavari : नाशिकमध्ये गोदावरी काँक्रिटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर! काँक्रिट हटवण्याची मागणी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
नाशिकमध्ये गोदावरी काँक्रिटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर! काँक्रिट हटवण्याची मागणी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
JanNivesh SIP : छोटी सुरुवात, मोठी स्वप्नं...250 रुपयांच्या जननिवेश एसआयपीनं गुंतवणुकीचा प्रवास सुरु करा,  जाणून घ्या प्रमुख गोष्टी
छोटी सुरुवात, मोठी स्वप्नं...250 रुपयांच्या जननिवेश एसआयपीनं गुंतवणुकीचा प्रवास सुरु करा, जाणून घ्या प्रमुख गोष्टी
Bhaskar Jadhav & Vaibhav Naik : राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.