एक्स्प्लोर

Ranbir Alia : रणबीर-आलियाकडे एक नव्हे, दोन चिमुकले पाहुणे येणार? अभिनेत्याच्या उत्तराने वेधलं चाहत्यांचं लक्ष!

Ranbir Kapoor, Alia Bhatt : रणबीर आणि आलिया लवकरच आई-बाबा होणार आहे. त्यांची ही गुडन्यूज ऐकल्यापासून सगळे चाहते या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Ranbir Alia : सध्या सगळीकडेच अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या जोडीची चर्चा सुरु आहे. नुकतीच या जोडीने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. रणबीर आणि आलिया लवकरच आई-बाबा होणार आहे. त्यांची ही गुडन्यूज ऐकल्यापासून सगळे चाहते या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मात्र आता रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीत दिलेल्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. रणबीरने दिलेल्या एका उत्तरामुळे आता त्यांच्या घरात एक नव्हे, तर दोन चिमुकले पाहुणे येणार असल्याचा अंदाज चाहते बांधू लागले आहेत.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘शमशेरा’ (Shamshera) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान तो अनेकदा माध्यमांना मुलाखती देत आहे. यातील एका मुलाखती दरम्यान अभिनेत्याला एक तस्क देण्यात आला. या टास्कमध्ये त्याला सगळ्या चुकीच्या गोष्टी बोलायच्या होत्या. या टास्कमध्ये रणबीर म्हणाला की, ‘माझ्या घरी जुळ्या बाळांचं आगमन होणार आहे. मी एका मोठ्या पौराणिक चित्रपटाचा भाग बनणार आहे. आणि मी लवकरच या सगळ्यातून मोठा ब्रेक घेणार आहे.’

चर्चांना सुरुवात!

रणबीर कपूरने त्याला दिलेला टास्क तर पूर्ण केला. पण यात त्याने दिलेल्या उत्तराने आता चाहते गोंधळात पडले आहे. या टास्कच्या नियमानुसार रणबीरला खोटं बोलायचं होतं. मात्र, रणबीरने थेट बाळांचा उल्लेख केल्याने आता त्याने याचे संकेत दिले असावेत, असा अंदाज चाहते बांधत आहेत. तसेच, रणबीरचा आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ हा पौराणिक कथेवर आधारित असलेलाच चित्रपट आहे. तर, बाळाच्या जन्मानंतर कदाचित रणबीर कपूर कामातून ब्रेक घेऊ शकतो. या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यास रणबीरने खरं-खोटं हा खेळ न खेळता भविष्यातील काही गोष्टींचे संकेत दिले असावेत, अशी अटकळ बांधली जात आहे.

लवकरच चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबंधनात अडकले. मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला. आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यातील फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या सेटवर आलिया आणि रणबीरच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रणबीर आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबतच अभिनेते अमिताभ बच्‍चन, नागार्जुन, मौनी रॉय हे कलाकार देखील ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये प्रमूख भूमिका साकारणार आहेत.

संबंधित बातम्या

Alia Bhatt Pregnancy : आलिया आणि रणबीरकडून चाहत्यांना गूड-न्यूज; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

Alia Bhatt Pregnancy Reactions : 'एवढ्या लवकर तर...'; आलिया- रणबीरनं 'गूड न्यूज' दिल्यानंतर फॅन्सच्या भन्नाट रिअॅक्शन्स

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan On CJP Students Protest: 'आंदोलनाला हिंसक वळण लागणं...', सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?
सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?
Preity Zinta On CJP Student Protest: प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
Kangana Ranaut on Rahul Gandhi Protest At PM Modi Residence: पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
Shreyas Talpade Kajal Aggarwal Meet Tukaram Mundhe: 'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : ''जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget