एक्स्प्लोर

Divya Bharti Birth Anniversary : बॉलिवूडवर राज्य करणारी दिव्या भारती! मृत्यूच्या रात्री अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं...?

Divya Bharti : अभिनेत्री दिव्या भारती यांनी वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत 21 सिनेमांत काम करत आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केलं.

Divya Bharti : बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti)  ही हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री होती जिच्या सौंदर्याचे चाहते जगभर होते. आज तिचा  जन्मदिवस आहे.  वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत 21 सिनेमांत काम करत आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केलं होतं. तिची गणना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत केली जाते. 

दिव्या भारती यांनी डी. रामानायडू यांच्या 'बोबली राजा' या तेलुगू सिनेमाच्या माध्यमातून 1990 साली मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे.  पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला होता. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिव्या भारती यांची क्रेझ पाहता बॉलिवूडच्या सिने-निर्मात्यांनीदेखील आपल्या सिनेमासाठी दिव्या भारतीसा विचारणा केली. त्यानंतर त्यांनी 1992 साली 'विश्वात्मा' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा सिनेमा सुपरहिट ठरला नसला तरी या सिनेमाच्या माध्यमातून त्या रातोरात सुपरस्टार झाली. त्यानंतर त्या 'शोला और शबनम' या सिनेमात झळकली. हा त्यांचा पहिला बिग बजेट सिनेमा. त्यानंतर त्या दीवाना, जान से प्यारा, दिल आशना है, बलवान, दिल ही तो है, दुश्मन जमाना, गीतसारख्या सिनेमांत काम केलं. 

मृत्यूच्या रात्री दिव्या भारतीसोबत काय घडलं? 

5 एप्रिल 1993 रोजी दिव्या चेन्नईहून शूटिंग संपवून मुंबईत आली. दरम्यान  मैत्रीण आणि डिझायनर नीता लुल्लाने त्यांना आगामी प्रोजेक्टबाबत चर्चा करण्यासाठी बोलावलं. पण दिव्याने  मुंबईतील तिच्या घरी बोलावलं. त्यानंतर नीता आपल्या पतीसह दिव्याच्या घरी गेली. दिव्या त्यांची मैत्रीण नीता आणि तिचा पती या तिघांमध्ये ड्रिंक्स घेत गप्पा रंगल्या होत्या. दरम्यान दिव्या अचानक रुमध्ये गेली. त्यामुळे नीता आणि तिचा पती टीव्ही पाहू लागले. त्यावेळी त्यांच्या घरी कामवालीदेखील होती. 

दिव्याच्या रुममधील बाल्कनीला संरक्षक जाळ्या नव्हत्या. त्या खिडकीत नीट उभं राहण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाय घसरला आणि त्या खाली पडली. दिव्या पाचव्या मजल्यावरुन खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला मार बसला होता. त्यानंतर नीताने दिव्याला जवळच्या रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषिक केलं. दिव्याच्या मृत्यूप्रकरणाचा जवळपास पाच वर्ष मुंबई पोलीस तपास करत होते. अखेर बाल्कनीतून पडून दिव्याचा अपघाती मृत्यू झाल्याचं सांगून पोलिसांनी दिव्या भारती यांची केस क्लोज केली. 

वयाच्या 18 व्या वर्षी अडकली लग्नबंधनात!

'शोला और शबनम' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान गोविंदाने दिव्या भारती आणि साजिद नाडियाडवाला यांची भेट करुन दिली होती. त्यानंतर दिव्या आणि साजिद यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 10 मे 1992 रोजी ते लग्नबंधनात अडकले. 

संबंधित बातम्या

Divya Bharti : 18 व्या वर्षी दिव्या भारतीनं साजिद नाडियाडवालासोबत बांधली लग्नगाठ; लग्नाच्या 11 महिन्यांनी झालं होत्याचं नव्हतं

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Muntashir On Student Protest: 'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'
'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'
CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: 'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी
'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्र्यांची मोठी मागणी
4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल
कतरिना कैफनं विद्यार्थी आंदोलनावर चकार शब्द काढला नाही, लहानपणापासून फॉलो करणारा चाहता भलताच नाराज, उचललं टोकाचं पाऊल

व्हिडीओ

CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget