एक्स्प्लोर

"ऐश्वर्याला मंगळ, ज्या घरात जाईल, त्यांचं वाटोळं होईल", जेव्हा अफवांवर संतापलेले बिग बी, दिलेलं सडेतोड उत्तर

007 मध्ये जेव्हा ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचं लग्न झालं, त्यावेळी अभिनेत्रीबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात होत्या. अनेक अफवा पसरवल्या गेल्या. त्याबाबत बोलताना अमिताभ बच्चन संतापले होते.

Aishwarya Abhishek Bachchan: ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) म्हणजे, बॉलिवूडमधील सर्वात फेवरेट कपल. दोघांनी 2007 मध्ये आपली लग्नगाठ बांधली होती. विश्वसुंदरी म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सून झाली. पण, ज्यावेळी बीटाऊनमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या, त्याचवेळी दोघांबाबत अनेक अफवादेखील उडाल्या होत्या. ऐश्वर्या रायला मंगळ असून अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी तिचं लग्न एका झाडाशी लावण्यात आल्याचा दावा देखील त्यावेळी करण्यात आला होता. काही रिपोर्ट्समध्ये ऐश्वर्या बच्चन कुटुंबासाठी अशुभ असल्याचंही म्हटलं होतं. या बातमीनं अमिताभ बच्चन संतापले आणि त्यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं.

2007 मध्ये जेव्हा ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचं लग्न झालं, त्यावेळी अभिनेत्रीबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात होत्या. अनेक अफवा पसरवल्या गेल्या. ऐश्वर्या राय शुभेच्छुक असून अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी तिनं एका झाडाशी लग्न केल्याचा दावा करण्यात आला होता. काही रिपोर्ट्समध्ये ऐश्वर्या बच्चन कुटुंबासाठी अशुभ असल्याचंही म्हटलं आहे. या बातमीनं अमिताभ बच्चन संतापले आणि त्यांनी सडेतोड उत्तर दिलेलं.

एप्रिल 2007 मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याचं लग्न झालं होतं आणि लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जून 2007 मध्ये अमिताभ यांनी 'मिड डे'ला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी ऐश्वर्या रायबाबतच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली होती.

ट्रोलर्सना सडतोड उत्तर देताना काय म्हणालेली बिग बी?

ऐश्वर्याबाबत अफवा पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना बिग बी म्हणालेले की, "हे अत्यंत असंवेदनशील आहे. आधी तर असं समोर आलं की, तिला मंगळ होता. त्यानंतर तिचं लग्न झाडासोबत लावलं गेलं आणि आता की, ती आमच्यासाठी अशुभ आहे."

"नशिबात जे असेल ते होईल, ऐश्वर्या अशुभ नाही"

बिग बी पुढे म्हणाले होते की, "ती (ऐश्वर्या राय) कशी असेल? तिचं भविष्य काय असेल? ती ज्या घरात जाईल, तिच्या सासऱ्याचा मृत्यू होईल, याविषयी दररोज काही ना काही अंदाज लावले जातात. ऐश्वर्या आमच्यासाठी अशुभ नाही, जे नियतीला मान्य असेल तेच होईल."

"ऐश्वर्यामुळे हे झालं, ते झालं..."

अमिताभ इथेच थांबले नाहीत. त्यानंतर ते म्हणाले की, "मीडियानं अंदाज बांधणं आणि लिहिणं खूप चांगलं आहे, पण, जे लिहिलं जातं, त्यामुळे ते आणि त्यांचं कुटुंब कोणत्या परिस्थितीतून जात असेल? याचा विचार कधी केलाय का? सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, चर्चा थांबलेल्या नाहीत. हे झालं, ते झालं. हे सर्व ऐश्वर्यामुळेच झालंय, असं बोललं जातंय."

"अभिषेक-ऐश्वर्या कोणत्या परिस्थितीतून जातायत कल्पना आहे...?"

"तुम्हाला कल्पना आहे का? ती आणि अभिषेक खरोखर कोणत्या परिस्थितीतून जात आहेत? दोन व्यक्तींमधील विश्वासाशिवाय लग्न म्हणजे काय? हे दोन मनांच्या संबंधाबद्दल आहे. ती माझी पत्नी आहे आणि आयुष्यभर माझी पत्नी राहील. तेच खरं आहे.", असं बिग बी म्हणालेले. 

अभिषेक-ऐश्वर्यामध्ये सध्या चाललंय काय? 

अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र दिसत नाहीत. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्यात सर्वकाही ठीक नसून ते घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक वेगळे झाल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, बच्चन कुटुंबीय किंवा अभिषेक-ऐश्वर्याकडून अद्याप कोणीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ऐश्वर्याला झालाय 'हा' आजार, सारखं वाढतंय वजन? सोशल मीडियावर दावा, नेटकरी म्हणाले, "अच्छा, म्हणूनच अभिषेकसोबत घटस्फोट..."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
Kolhapur Crime: 'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
Buldhana Crime News: बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
Kolhapur Crime: 'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
Buldhana Crime News: बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
Babasaheb Ambedkar Mahaparinirvan din: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी डेडलाईन सांगितली, म्हणाले...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी डेडलाईन सांगितली, म्हणाले...
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
Nanded Crime: सक्षमचं कुटुंब अन् आचलच्या जीवाला धोका, नांदेडमधील भयानक प्रकारानंतर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
सक्षमचं कुटुंब अन् आचलच्या जीवाला धोका, नांदेडमधील भयानक प्रकारानंतर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
Embed widget