एक्स्प्लोर

Sanjay Raut: राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; संजय राऊत कडाडले

Sanjay Raut on Raj Thackeray: राज ठाकरे बोलण्याला किंमत नाही, मनसेलाही महाराष्ट्रात स्थान नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मुंबई: राज ठाकरे हे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई आहेत. त्यांना एकाचवेळी गुजरात आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची इच्छा आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही. त्यांच्या पक्षालाही महाराष्ट्रात स्थान नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने करण्यात येणाऱ्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेविषयी राज ठाकरे यांच्या मनात नेमकी काय भूमिका आहे, याबाबत आम्हाला शंका आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मितेचा प्रचार करत आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांची लढाई ही स्वाभिमानाची आहे. हे दोन नेते स्वत:च्या स्वार्थासाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी या संघर्षात उतरले आहेत. गुजरातच्या दोन खतरनाक व्यापाऱ्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची जी लूट चालवली आहे, ज्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारे दोन फोडले, त्यांच्या बाजूने  राज ठाकरे उभे आहेत. त्यांना पाहून मला मोरारजी देसाई यांची आठवण झाली. राज ठाकरे महान नेते आहेत, मला त्यांच्याबाबत बोलायचे नाही. पण त्यांनी उद्धव ठाकरेंकडून टीका करताना भान ठेवावे. उद्धव ठाकरे केवळ शिवसेना पक्षप्रमुखच नाहीत तर पण महाराष्ट्रावर हल्ला करणाऱ्या खतरनाक व्यापाऱ्यांविरोधात त्यांची लढाई सुरु आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

एकनाथ शिंदेंनी यंत्रणा विकत घेतल्यात का, त्यांच्या बॅगा कोण तपासणार? राऊतांचा सवाल

नाशिकमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकाने उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांच्या बॅगा तपासल्या होत्या. यावर संजय राऊत यांनी कडाडून टीका केली. कोण कुठे पैशांचं वाटप करतोय, याची आम्ही माहिती सांगतो. सांगोल्यात 15 कोटी पकडण्यात आले, पण पोलिसांनी रेकॉर्डवर 5 कोटींची रक्कम दाखवली. 10 कोटी कुठे गेले? शिंदे गटाच्या प्रत्येक उमेदवाराला 25 कोटी रुपये पोहोचले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

आमचा उद्धव ठाकरे यांची तपासणी करायला विरोध नाही. पण लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त एका तासासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरमधून 15 ते 16 बॅगा बाहेर काढण्यात आल्या. तेव्हा त्या बॅगा कोणीही तपासल्या नाहीत. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यासोबतच्या बॅगाही कोणी तपासत नाही. या लोकांनी निवडणूक यंत्रणा विकत घेतली आहे का, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा

सदा सरवणकरांची भेट का नाकारली?; राज ठाकरेंनी सांगितलं यामगचं कारण, एकनाथ शिंदेंनाही प्रत्युत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Eknath Shinde Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
Embed widget