एक्स्प्लोर

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ | शिवसेना बालेकिल्ला परत मिळवणार?

दीड वर्षांपूर्वी अहमदनगरमधील केडगाव येथे 2 शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्याकांडमुळे नगर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शिवसेना माजी आमदार अनिल राठोड आणि राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्यातील वातावरण देखील चिघळले होते. याप्रकरणी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी तुरुंगवारी करावी लागली होती.

अहमदनगर : अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांनी पराभूत करून विजय मिळवला आहे. 2014 पर्यंत अहमदनगर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. सध्याची टर्म सोडली तर त्याआधी सलग 5 टर्म शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड हे शिवसेनेकडून आमदार राहिले आहेत. त्यामुळे हा अहमदनगर शहर मतदार शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांनी सलग 5 टर्म निवडून येत अहमदनगर मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे ठेवली होती.

2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अमहदनगर शहर मतदार संघावर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला. गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती तुटल्याने शिवसेनेला मोठा फटका बसला. शिवसेना आणि भाजप दोघांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि युतीच्या मतांचे विभाजन झाले. याचा फायदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उभे राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना झाला आणि संग्राम जगताप यांनी अनिल राठोड यांनी पराभूत करून विजय मिळवला.

अहमदनगर मतदार संघाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप यांचे सुपुत्र आहेत. संग्राम जगताप यांनी आमदार असताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. मात्र काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे पाटील यांनी संग्राम जगताप यांचा अडीच लाख मतांनी पराभव केला. या पराभवानंतर आता विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप काय करणार हा प्रश्न येताच संग्राम हे शिवसेनेत जाणार अशा चर्चांना उधाण आले. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेना पक्षात पक्षांतर केले आहे. याच धर्तीवर अहमदनगर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे देखील पक्षांतर करुन शिवसेनेत जाणार अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र संग्राम जगताप यांनी होणाऱ्या चर्चा अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

अहमदनगर मतदारसंघात शिवसेनेकडून माजी आमदार अनिल राठोड यांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे संग्राम जगताप काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. करण संग्राम जगताप शिवसेनेत जाण्याच्या अफवा असल्याचे जगताप यांनी सांगितले असले तरी राष्ट्रवादीने घेतलेल्या मुलाखतींना संग्राम जगताप यांनी दांडी मारली आहे. तर माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी अहमदनगरमधून उमेदवारीची मागणी केली आहे.

विशेष बाब म्हणजे अहमदनगर महानगरपालिकेत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी भाजपला पाठिंबा देत महापालिकेत भाजपचा महापौर आणि उपमहापौर निवडून दिला. महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळालेल्या असताना देखील दुसऱ्या स्थानावर असलेल्या राष्ट्रवादीने आमदार संग्राम यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या स्थानावर असलेल्या भाजपला पाठिंबा देत अभद्र युती केली आणि भाजपचा महापौर, उपमहापौर निवडून दिला. त्यामुळे अहमदनगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन रंगत निर्माण होणार आहे.

अहमदनगर मतदारसंघातील समस्या

  • अहमदनगर शहरात MIDC चा महत्वाचा प्रश्न आहे. अनेक निवडणुकांमध्ये MIDC चा प्रश्न चर्चेला येतो, मात्र निवडणूक झाली की पुन्हा हा विषय बाजूला पडतो.
  • MIDC बरोबरच अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न देखील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या उड्डाणपुलाचे 2 वेळेस भूमिपूजन झाले. मात्र उड्डाणपुलाच्या कामाला मात्र आद्यपही सुरुवात झाली नाही. औरंगाबादहून पुण्याला जाताना अहमदनगर शहरातून जावे लागते. त्यामुळे अपघात, वाहतुकीची कोंडी वारंवार होते. म्हणून हा उड्डाणपूल अत्यंत महत्वाचा आहे.
  • अहमदनगर शहरातील तिसरी महत्वाची समस्या आहे ती रस्ते. अहमदनगर मतदारसंघात रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था आहे.
 

विधानसभा निवडणूक 2014 मतदानाची आकडेवारी

  • संग्राम जगताप (राष्ट्रवादी) - 49378
  • अनिल राठोड (शिवसेना) - 46061
  • अभय आगरकर (भाजप) - 39913
  • सत्यजित तांबे (काँग्रेस) - 27076

दीड वर्षांपूर्वी अहमदनगरमधील केडगाव येथे 2 शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्याकांडमुळे नगर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शिवसेना माजी आमदार अनिल राठोड आणि राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्यातील वातावरण देखील चिघळले होते. याप्रकरणी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी तुरुंगवारी करावी लागली होती. आणि त्याचाच फटका म्हणून लोकसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांना ज्या नगर शहरातून आमदार म्हणून मतदारांनी निवडून दिले तेथे सर्वात कमी मतदान झाले. त्यामुळे आता या निवडणुकीत मतदारांचा कौल संग्राम जगताप यांच्याकडे वळतो का हा देखील मोठा प्रश्न आहे.

विधानसभा 2019 च्या निवडणुकीत नगर मतदार संघातून शिवसेनेकडून अनिल राठोड हे इच्छुक उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीकडून घेण्यात आलेल्या मुलाखतींमध्ये नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी दांडी मारली आणि नगरच्या जागेसाठी माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी उमेदवारीची मागणी केलीय. त्यामुळे आता विद्यमान आमदार संग्राम जगताप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पोशाख ते पेहराव, फुटबॉलपासून ते झालमुरी खाण्यापर्यंत, पश्चिम बंगालच्या अभूतपूर्व विजयामागील पंतप्रधान मोदींचं 'स्टाईल मेसेजिंग' वाचा संपूर्ण विश्लेषण
पोशाख ते पेहराव, फुटबॉलपासून ते झालमुरी खाण्यापर्यंत, पश्चिम बंगालच्या अभूतपूर्व विजयामागील पंतप्रधान मोदींचं 'स्टाईल मेसेजिंग' वाचा संपूर्ण विश्लेषण
Neet Exam Pune: नीट पेपरफुटीप्रकरणी पुणे केंद्रबिदू; पेपर फोडणारे तिघंही पुण्याचेच, तीन विषय अन् तीन शिक्षक दीड ते दोन किलोमीटरच्या रेडीयसमधले, एनटीएही संशयाच्या भोवऱ्यात
नीट पेपरफुटीप्रकरणी पुणे केंद्रबिदू; पेपर फोडणारे तिघंही पुण्याचेच, तीन विषय अन् तीन शिक्षक दीड ते दोन किलोमीटरच्या रेडीयसमधले, एनटीएही संशयाच्या भोवऱ्यात
Vidhan Parishad Election 2026: भंडारा - गोंदिया विधान परिषद जागा वाटपाचा तिढा कायम; भाजपसह, राष्ट्रवादीनंही शड्डू ठोकला; जिंकेल मात्र काँग्रेसचं, नाना पटोलेंचा दावा
भंडारा - गोंदिया विधान परिषद जागा वाटपाचा तिढा कायम; भाजपसह, राष्ट्रवादीनंही शड्डू ठोकला; जिंकेल मात्र काँग्रेसचं, नाना पटोलेंचा दावा
निवडणूक ही केवळ औपचारिकता, विरोधकांनी कितीही मोट बांधली तरी 100 पेक्षा अधिक मतं मिळणार नाहीत : जयकुमार गोरे
निवडणूक ही केवळ औपचारिकता, विरोधकांनी कितीही मोट बांधली तरी 100 पेक्षा अधिक मतं मिळणार नाहीत : जयकुमार गोरे

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, प्रतापराव पाटील यांच्यासाठी जागा मागितली : गुलाबराव पाटील
विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, यापूर्वी दोनवेळा ती जागा आम्ही जिंकलेली : गुलाबराव पाटील
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ, इराणचं ट्रम्प यांना डिवचणारं प्रत्युत्तर
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं जगभरात खळबळ
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
Embed widget