एक्स्प्लोर

Lok Sabha Election Result : मोजकंच बोलले, पत्रकारपरिषदही थोडक्यात आटोपली, पण खरगे नव्याने सोबत येणाऱ्या मित्रांबद्दल बोलून गेले, चर्चांना उधाण

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं पत्रकार परिषद घेतली. यावेळी मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी (Lok Sabha Election Counting) अद्याप सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Lok Sabha Election Result) स्वबळावर सत्ता मिळवण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं पत्रकार परिषद घेतली. मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. काँग्रेसनं  2019 च्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरी पेक्षा चांगलं प्रदर्शन यावेळी केलं आहे. मल्लिकार्जून खरगे यांनी ही निवडणूक मोदी विरुद्ध जनता अशी झाल्याचं म्हटलं. हा निकाल जनतेचा निकाल आहे. हा जनतेचा विजय असून लोकशाहीचा विजय असल्याचं मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटलं. 

ही निवडणूक जनता विरुद्ध मोदी अशी आहे, असं आम्ही सांगत आलेलो आहे. आम्ही विनम्रपणे निवडणुकीचा कौल स्वीकारत आहोत. जनतेनं यावेळी एका कुणालाही बहुमत दिलं नाही. हा जनादेश नरेंद्र मोदींच्या विरोधात गेल्याचं खरगे म्हणाले. आपल्या नावानं जो व्यक्ती मतं मागत होता, त्यांचा हा मोठा पराभव आहे, असं खरगे म्हणाले.

काँग्रेस पार्टी आणि इंडिया आघाडीनं प्रतिकूल परिस्थितीत निवडणूक लढवली. सरकारी यंत्रणांनी बँक खाती सील करण्यासारखे प्रकार केले. काँग्रेसनं सकारात्मक प्रचार केला. आम्ही बेरोजगारी, महागाई,मजुरांची वाईट स्थिती यावर आम्ही आवाज उठवला. आम्हाला लोकं जोडले गेले, असं मल्लिकार्जून खरगे म्हणाले. पाच न्याय घेऊन आम्ही लोकांपर्यंत गेलो, असं  मल्लिकार्जून खरगे म्हणाले. 

भाजपनं सर्व संविधानिक संस्थांवर बेकायदेशीर पद्धतीनं कब्जा मिळवला. काही जणांवर दाबव आणला गेला. जे दबावात आले नाहीत त्यांचे पक्ष तोडण्यात आले, असं मल्लिकार्जून खरगे म्हणाले.

इंडिया आघाडीतील सर्व मित्र पक्षांचे आभार मानतो, असं मल्लिकार्जून खरगे म्हणाले. हजारो आणि लाखो कार्यकर्त्यांनी योग्य समन्वय साधत काम केलं असं खरगे यांनी म्हटलं.  संविधानाच्या संरक्षणासाठी, सीमांच्या संरक्षणासाठी लढत राहणार आहोत. संसद योग्य पद्धतीनं चालवली जावी, विरोधी पक्षांच्या मुद्यांवर चर्चा झाली पाहिजे यासाठी आम्ही दक्ष राहू असं खरगे म्हणाले. 

नवे मित्र....

जोपर्यंत आम्ही आमच्या मित्रपक्षांसोबत बोलत नाही आणि नव्यानं जोडल्या जाणाऱ्या मित्रपक्षांसोबत चर्चा करुन कशा प्रकारे बहुमत बनवता येईल याचा विचार करत आहोत. सर्व गोष्टी इथंच सांगितल्या तर मोदी हुशार आहेत, असं मल्लिकार्जून खरगे म्हणाले. 


दरम्यान, राहुल गांधी यांनी देशातील गरिबांनी संविधानाला वाचवलं असल्याचं म्हटलं. देशातल्या गरिबांनी या संविधानाला वाचवलं, आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. 

संबंधित बातम्या :

Konkan Loksabha Election Result : कोकण पट्ट्यात ठाकरे गटाला धक्का; रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे आणि कल्याणमध्ये अपयश

baramati Lok Sabha Election Result : बारामतीच्या विजयानंतर अजित पवारांबद्दल प्रश्न, सुप्रिया सुळेंनी तीन शब्दात उत्तर दिलं...

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune: डोक्यावर हेल्मेट नाही, सिग्नल तोडला तरी काळजी नको, पुण्यात वाहतूक दंडात मोठी सूट, नेमकं काय होणार?
डोक्यावर हेल्मेट नाही, सिग्नल तोडला तरी काळजी नको, पुण्यात वाहतूक दंडात मोठी सूट, नेमकं काय होणार?
Samruddhi Expressway :  समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ; तपासात धक्कादायक कारण समोर, त्या रात्री नेमकं काय घडलं?
समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ; तपासात धक्कादायक कारण समोर, त्या रात्री नेमकं काय घडलं?
Gold Rate Update: सोनं झालं महागडं; एका तोळ्याची किंमत किती?
सोनं झालं महागडं; एका तोळ्याची किंमत किती?
नक्षल चळवळीतील मोठा बदल! पोलिसांविरोधातील लढ्यात अत्यंत महत्त्वाच्या  दंडकारण्य ऑपरेशनची सूत्रे बदलली, कोण आहेत देवजी सरचिटणीस, हिडमा?
नक्षल चळवळीतील मोठा बदल! नक्षलवाद्यांचं नेतृत्व बदललं, कोण आहेत देवजी सरचिटणीस, हिडमा?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune: डोक्यावर हेल्मेट नाही, सिग्नल तोडला तरी काळजी नको, पुण्यात वाहतूक दंडात मोठी सूट, नेमकं काय होणार?
डोक्यावर हेल्मेट नाही, सिग्नल तोडला तरी काळजी नको, पुण्यात वाहतूक दंडात मोठी सूट, नेमकं काय होणार?
Samruddhi Expressway :  समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ; तपासात धक्कादायक कारण समोर, त्या रात्री नेमकं काय घडलं?
समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ; तपासात धक्कादायक कारण समोर, त्या रात्री नेमकं काय घडलं?
Gold Rate Update: सोनं झालं महागडं; एका तोळ्याची किंमत किती?
सोनं झालं महागडं; एका तोळ्याची किंमत किती?
नक्षल चळवळीतील मोठा बदल! पोलिसांविरोधातील लढ्यात अत्यंत महत्त्वाच्या  दंडकारण्य ऑपरेशनची सूत्रे बदलली, कोण आहेत देवजी सरचिटणीस, हिडमा?
नक्षल चळवळीतील मोठा बदल! नक्षलवाद्यांचं नेतृत्व बदललं, कोण आहेत देवजी सरचिटणीस, हिडमा?
Solapur Crime: जिच्या नादापायी बीडच्या उपसरपंचाने आयुष्य संपवलं ती पूजा गायकवाड कोण?
जिच्या नादापायी बीडच्या उपसरपंचाने आयुष्य संपवलं ती पूजा गायकवाड कोण?
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कावळा आढळला नाही, तर कोणाला अन्न द्यावे? शास्त्र काय म्हणते? श्राद्ध कर्माशी संबंधित सर्व माहिती जाणून घ्या...
पितृपक्षात कावळा आढळला नाही, तर कोणाला अन्न द्यावे? शास्त्र काय म्हणते? श्राद्ध कर्माशी संबंधित सर्व माहिती जाणून घ्या...
Rohit Pawar & Ajit Pawar: अंजना कृष्णा प्रकरणावर दिलगिरी व्यक्त करूनही मित्रपक्षाकडून अजितदादांची जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल; रोहित पवार दादांच्या मदतीला धावले
अंजना कृष्णा प्रकरणावर दिलगिरी व्यक्त करूनही मित्रपक्षाकडून अजितदादांची जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल; रोहित पवार दादांच्या मदतीला धावले
Solapur Crime: पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोनं घेतलं, नंतर म्हणाली बंगला नावावर करा, नर्तिकेच्या नादापायी सोलापुरातील माजी उपसरपंचाने आयुष्य संपवलं
पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोनं घेतलं, नंतर म्हणाली बंगला नावावर करा, नर्तिकेच्या नादापायी सोलापुरातील माजी उपसरपंचाने आयुष्य संपवलं
Embed widget