एक्स्प्लोर

ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची अवस्था बिकट झाली आहे. उद्धव ठाकरे मनसेला साद घालणार का, दानवे म्हणाले...

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांचा सुपडा साफ झाल्यानंतर राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची हवा पसरली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला अवघ्या 20 जागांवर विजय मिळवला. तर 128 जागा लढवणाऱ्या मनसेला एकाही जागेवर उमेदवार निवडून आला नव्हता. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधुंच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एकत्र यावे, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, त्यासाठी पुढाकार कोण घेणार, हा प्रश्न अनुत्तरित होता. याबाबत गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली.

मनसेला सोबत घेण्यासंदर्भात शून्य टक्के चर्चा आमच्या पक्षात आहे.  मनसे किंवा आम्ही त्यांना साद घालू ,असं मला वाटत नाही होईल.  मनसे नेमकी कोणासोबत होती हेच त्यांनी आधी क्लिअर करावं ?  ते म्हणत होते, भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि दुसरीकडे भाजपच्या विरोधात त्यांनी उमेदवार दिले होते, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा एकूण सूर पाहता सध्यातरी मनसे आणि ठाकरे गटात एकत्र येण्याविषयी कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे संकेत मिळत आहेत. 

यावेळी अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केले.  गद्दारीचा रिवॉर्ड त्यांना मिळाला आहे.  अडीच वर्षे ते मुख्यमंत्री होते. आता मुख्यमंत्री कोण करायचा आहे, ते भाजप ठरवेल. त्यांच्याकडे एवढी मेजॉरिटी आहे.  ते ठरवतील नेमका मुख्यमंत्री कोणाला करायचं, असे दानवेंनी म्हटले. 

मातोश्रीवर ठाकरे गटाच्या पराभूत आमदारांची बैठक

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या ठाकरे गटाच्या आमदारांची गुरुवारी मातोश्रीवर बैठक पार पडली. याबाबत अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. त्यांनी म्हटले की, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व पराभूत आणि विजयी उमेदवारांशी बैठकीत संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांचा म्हणणं जाणून घेतलं, त्यातील काही जणांचा म्हणणं होतं की आपण एकटं लढायला हवं होतं. 95 जागा आम्ही लढलो, 20 जागा जिंकलो. महाराष्ट्रभर शिवसेना पक्ष आहे 288 जागा लढलो असतो तर 40-50 जागा जिंकलो असतो, असा त्यांचं म्हणणं होतं. 

पण महाविकास आघाडीसोबत आम्ही आता आहोत, वेगळा कुठलाही निर्णय झाला नाही. आमचे मतं महाविकास आघाडीमध्ये राहून कमी झाले नाही. काही ना काही तरी फायदा तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा फायदा शिवसेनेला झाला आहे. शिवसेनेचा फायदासुद्धा त्यांना झाला आहे, असे दानवेंनी सांगितले. 

संघटना मजबुतीसाठी 288 जागासाठी तयारी करायला हवी. याचा अर्थ आम्ही स्वबळावर लढणार असा होतं नाही. कधी ना कधी स्वबळावर आमच्या पक्षाला सत्ता आणायची आहे पण त्यासाठी ताकद वाढवायला पाहिजे . लोकसभेनंतर काँग्रेसचे नेते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होते. त्यामुळे जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्र मध्ये इंडिया आघाडीचे नुकसान झाले.  ते मंत्रिपदचे विचार करायला लागले होते. निवडणुकीआधी ते काँग्रेस मुख्यमंत्रीपदासाठी तयारी करायला लागले होते.  उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी ठेवला असता 5 टक्के मतदान महाविकास आघाडीचे वाढले असते, असा दावा अंबादास दानवे यांनी केला.

आम्ही मविआतच राहणार, अंबादास दानवेंचा दावा

आम्ही आता महाविकास आघाडीसोबत आहोत, वेगळा कुठलाही निर्णय झाला नाही. आमचे मतं महाविकास आघाडी मध्ये राहून कमी झाले नाही. काही ना काही तरी फायदा तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा फायदा शिवसेनेला झाला आहे. शिवसेनेचा फायदासुद्धा त्यांना झाला आहे . अनेक जागा काँग्रेसने लोकसभा निकाल आणि सर्वेचा दाखला देत शिवसेनेला दिल्या नाहीत. स्वतः कडे ठेवल्या आणि तिथे काँग्रेस उमेदवार पडले.संभाजीनगर पूर्वमध्ये आमची ताकद असताना सुद्धा आम्ही काँग्रेसला ती जागा दिली आणि तिथे उमेदवार पडल्याचे दानवे यांनी सांगितले.

शिवसेना हिंदुत्ववादी आहे, शिवसेनेचा मतं कमी झाली नाहीत उलट मुस्लिम मतं वाढले तर चांगलं आहे. आमचा मुस्लिम आमदार निवडून आला. शिवसैनिकांची भावना जी होती ती मी मांडली. महापालिका निवडणूक आम्ही याआधी स्वबळावर लढली होती आणि भाजपच्या पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या, याकडे अंबादास दानवेंनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा

तुमचं नाव उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत; उदय सामंत म्हणाले, सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
NEET Paper Leak Pune Crime : मांढरेसोबत कनेक्शन; पुरावे नष्ट करण्यासाठी लढवली शक्कल, पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंगही डिलीट; पुरावे मिळू नये म्हणून मनिषा हवालदारने काय केलं?
मांढरेसोबत कनेक्शन; पुरावे नष्ट करण्यासाठी लढवली शक्कल, पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंगही डिलीट; पुरावे मिळू नये म्हणून मनिषा हवालदारने काय केलं?
पोशाख ते पेहराव, फुटबॉलपासून ते झालमुरी खाण्यापर्यंत, पश्चिम बंगालच्या अभूतपूर्व विजयामागील पंतप्रधान मोदींचं 'स्टाईल मेसेजिंग' वाचा संपूर्ण विश्लेषण
पोशाख ते पेहराव, फुटबॉलपासून ते झालमुरी खाण्यापर्यंत, पश्चिम बंगालच्या अभूतपूर्व विजयामागील पंतप्रधान मोदींचं 'स्टाईल मेसेजिंग' वाचा संपूर्ण विश्लेषण
Neet Exam Pune: नीट पेपरफुटीप्रकरणी पुणे केंद्रबिदू; पेपर फोडणारे तिघंही पुण्याचेच, तीन विषय अन् तीन शिक्षक दीड ते दोन किलोमीटरच्या रेडीयसमधले, एनटीएही संशयाच्या भोवऱ्यात
नीट पेपरफुटीप्रकरणी पुणे केंद्रबिदू; पेपर फोडणारे तिघंही पुण्याचेच, तीन विषय अन् तीन शिक्षक दीड ते दोन किलोमीटरच्या रेडीयसमधले, एनटीएही संशयाच्या भोवऱ्यात

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्जुन सचिन तेंडुलकर होणं सोप्पं नाही…
अर्जुन सचिन तेंडुलकर होणं सोप्पं नाही…
Rahul Gandhi on PM Modi: 'पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार' राहुल गांधी यांचा मोठा दावा; म्हणाले, वाढत्या जन असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होणार
'पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार' राहुल गांधी यांचा मोठा दावा; म्हणाले, वाढत्या जन असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होणार
पिकअपने बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला खाली पाडले; दगडफेकीत गोरक्षकाचा मृत्यू, गोवंश तस्करीची धक्कादायक घटना
पिकअपने बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला खाली पाडले; दगडफेकीत गोरक्षकाचा मृत्यू, गोवंश तस्करीची धक्कादायक घटना
Balochistan Attack: बलुचिस्तानमध्ये रेल्वे रुळाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 26 जण ठार, 70 जखमी; जाफर एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले
बलुचिस्तानमध्ये रेल्वे रुळाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 26 जण ठार, 70 जखमी; जाफर एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले
Gurinderveer Singh: भारताचा 'उसेन बोल्ट'! गुरिंदरवीर सिंगचा 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम
भारताचा 'उसेन बोल्ट'! गुरिंदरवीर सिंगचा 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती
महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती
Embed widget