एक्स्प्लोर

हातकणंगले लोकसभा : राजू शेट्टींना पराभवाचा धक्का, 'आपलं दुःख बाजूला ठेवून संघर्ष करु' पराभवानंतर राजू शेट्टींची प्रतिक्रिया

पुन्हा नव्या दमाने गोरगरीब, वंचित, शेतकऱ्यांसाठी काम करायचे आहे. आपण काम करायचं थांबलो तर या गोरगरिबांना कुणीच वाली राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

हातकणंगले : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्याकडून लाखाहून अधिक मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना 582060 मतं मिळाली तर राजू शेट्टी यांना 486042 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अस्लम सय्यद यांना 122646 इतकी मतं मिळाली. हातकणंगले मतदारसंघासाठी 17 उमेदवार मैदानात होते.  2014 च्या निवडणुकीत राजू शेट्टी शिवसेना-भाजपच्या महायुतीसोबत होते. त्यावेळी राजू शेट्टींविरोधात काँग्रेसने कल्लाप्पा आवाडे यांना तिकीट दिलं होतं. राजू शेट्टींनी त्यांचा पराभव केला होता. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना  4,81,025 मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांना 3,85,965 मतं  मिळाली होती.  2014 च्या लोकसभेत राजू शेट्टी यांना 6,40,428 मतं मिळाली होती, काँग्रेसच्या कलाप्पा आवाडे यांना 4,62,618 मतं  मिळाली होती. यावेळी मात्र शेट्टी यांना गेल्यावेळीपेक्षा जवळपास दोन लाख मतं कमी मिळाली. या धंदेवाईक राजकारणामध्ये शेतकऱ्यांचा कुणी वाली असणार नाही.  म्हणूनच गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आपल्याला आपलं दुःख बाजूला ठेवून संघर्ष करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे. अनेकांनी मी निवडून यावं म्हणून प्रयत्न केले. अनेकांनी वर्गणी दिली. आतापर्यंत माझ्या सगळ्या निवडणुका पैसे शिल्लक ठेवून लढलो. ज्यांनी माझ्यासाठी पायाला चिंध्या लावून प्रचार केला, त्यांचे आभार मानतो, असे शेट्टी म्हणाले. संस्कार आपल्याला विसरून चालणार नाही या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि आघाडीचे पूर्ण सहकार्य लाभले. विजयाच्या जवळ पोहोचू शकलो नाही मात्र जो निकाल आहे तो आपल्याला मान्य करावा लागेल, असे ते म्हणाले. मी लोकशाहीवर प्रेम करतो. या महाराष्ट्रावर फुले, शाहू, आंबेडकरांचे संस्कार आहेत. ते संस्कार आपल्याला विसरून चालणार नाही, असे ते म्हणाले. आता पराभूत झालो म्हणून निराश व्हायचे कारण नाही. विचारांना मरण नसत, विचारांमध्ये ताकद असते. या विचारांसाठी गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकरांसारख्या माणसांना मरण पत्करावा लागले आहे. आपल्याला तर साधा पराभव पत्करावा लागला आहे, असे ते म्हणाले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, डोक्यात राग घालून घेऊ नका. गेली 20-25 वर्ष मी तुमच्यावर केलेले संस्कार तकलादू नव्हते हे लक्षात घ्या. डोक्यात राग न घालता शांतपणे या पराभवाचे आपण चिंतन करू, असे ते म्हणाले. पुन्हा नव्या दमाने गोरगरीब, वंचित, शेतकऱ्यांसाठी काम करायचे आहे. आपण काम करायचं थांबलो तर या गोरगरिबांना कुणीच वाली राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
Rajya Sabha Election 2026: राजकारण कोळून प्यायलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी का दिली? संजय शिरसाटांनी सांगितलं पडद्यामागचं राज'कारण'
राजकारण कोळून प्यायलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी का दिली? संजय शिरसाटांनी सांगितलं पडद्यामागचं राज'कारण'

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda On Indusrty: 'ज्यांचं नाव चांगलंय, ते खूपच डेंजर असतात...'; गोविंदाकडून बॉलिवूडच्या 'त्या' मोठ्या नावाची पोलखोल
'ज्यांचं नाव चांगलंय, ते खूपच डेंजर असतात...'; गोविंदाकडून बॉलिवूडच्या 'त्या' मोठ्या नावाची पोलखोल
Mira Bhayandar News :आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Rohit Pawar on VSR: अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहित पवारांचा आरोप
काळ्या काचांची गाडी, शाही बडदास्त, VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट: रोहित पवार
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Embed widget