एक्स्प्लोर

हातकणंगले लोकसभा : राजू शेट्टींना पराभवाचा धक्का, 'आपलं दुःख बाजूला ठेवून संघर्ष करु' पराभवानंतर राजू शेट्टींची प्रतिक्रिया

पुन्हा नव्या दमाने गोरगरीब, वंचित, शेतकऱ्यांसाठी काम करायचे आहे. आपण काम करायचं थांबलो तर या गोरगरिबांना कुणीच वाली राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

हातकणंगले : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्याकडून लाखाहून अधिक मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना 582060 मतं मिळाली तर राजू शेट्टी यांना 486042 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अस्लम सय्यद यांना 122646 इतकी मतं मिळाली. हातकणंगले मतदारसंघासाठी 17 उमेदवार मैदानात होते.  2014 च्या निवडणुकीत राजू शेट्टी शिवसेना-भाजपच्या महायुतीसोबत होते. त्यावेळी राजू शेट्टींविरोधात काँग्रेसने कल्लाप्पा आवाडे यांना तिकीट दिलं होतं. राजू शेट्टींनी त्यांचा पराभव केला होता. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना  4,81,025 मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांना 3,85,965 मतं  मिळाली होती.  2014 च्या लोकसभेत राजू शेट्टी यांना 6,40,428 मतं मिळाली होती, काँग्रेसच्या कलाप्पा आवाडे यांना 4,62,618 मतं  मिळाली होती. यावेळी मात्र शेट्टी यांना गेल्यावेळीपेक्षा जवळपास दोन लाख मतं कमी मिळाली. या धंदेवाईक राजकारणामध्ये शेतकऱ्यांचा कुणी वाली असणार नाही.  म्हणूनच गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आपल्याला आपलं दुःख बाजूला ठेवून संघर्ष करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे. अनेकांनी मी निवडून यावं म्हणून प्रयत्न केले. अनेकांनी वर्गणी दिली. आतापर्यंत माझ्या सगळ्या निवडणुका पैसे शिल्लक ठेवून लढलो. ज्यांनी माझ्यासाठी पायाला चिंध्या लावून प्रचार केला, त्यांचे आभार मानतो, असे शेट्टी म्हणाले. संस्कार आपल्याला विसरून चालणार नाही या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि आघाडीचे पूर्ण सहकार्य लाभले. विजयाच्या जवळ पोहोचू शकलो नाही मात्र जो निकाल आहे तो आपल्याला मान्य करावा लागेल, असे ते म्हणाले. मी लोकशाहीवर प्रेम करतो. या महाराष्ट्रावर फुले, शाहू, आंबेडकरांचे संस्कार आहेत. ते संस्कार आपल्याला विसरून चालणार नाही, असे ते म्हणाले. आता पराभूत झालो म्हणून निराश व्हायचे कारण नाही. विचारांना मरण नसत, विचारांमध्ये ताकद असते. या विचारांसाठी गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकरांसारख्या माणसांना मरण पत्करावा लागले आहे. आपल्याला तर साधा पराभव पत्करावा लागला आहे, असे ते म्हणाले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, डोक्यात राग घालून घेऊ नका. गेली 20-25 वर्ष मी तुमच्यावर केलेले संस्कार तकलादू नव्हते हे लक्षात घ्या. डोक्यात राग न घालता शांतपणे या पराभवाचे आपण चिंतन करू, असे ते म्हणाले. पुन्हा नव्या दमाने गोरगरीब, वंचित, शेतकऱ्यांसाठी काम करायचे आहे. आपण काम करायचं थांबलो तर या गोरगरिबांना कुणीच वाली राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget