एक्स्प्लोर

तब्बल 22 वर्षांनी मिळालं चोरी गेलेलं कोट्यवधींचं सोनं! 1998 साली पडलेला कुलाब्यात दरोडा

1998 Colaba robbery : 1998 मध्ये कुलाबा येथे राहणाऱ्या अर्जुन दासवानी नावाच्या व्यावसायिकाच्या घरी दरोडा पडला होता. ही घटना 6 एप्रिल 1998 रोजी सकाळी 8च्या सुमारास घडली होती.

मुंबई : तब्बल 22 वर्षांनंतर मुंबईतील कुलाबा (1998 Colaba robbery) परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला त्याचे वडिलोपार्जित सोने परत मिळाले, त्यानंतर कुटुंबीय भावुक झाले. कुलाबा विभागाचे एसीपी पांडुरंग शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की, 1998 मध्ये कुलाबा येथे राहणाऱ्या अर्जुन दासवानी नावाच्या व्यावसायिकाच्या घरी दरोडा पडला होता. ही घटना 6 एप्रिल 1998 रोजी सकाळी 8च्या सुमारास घडली होती.

दरोड्यावेळी दासवानी पत्नी, मुलं आणि नोकरासह घरातच होते. तेवढ्यात त्यांच्या दाराची बेल वाजली आणि त्यांनी दरवाजा उघडताच, चार जण चाकू घेऊन घरात घुसले आणि दासवानी यांच्यासह घरातील सर्व लोकांना खुर्चीला बांधून, दासवानी यांना मारहाण देखील केली.

कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी चावी दिली!

दरोडेखोरांनी घरात लॉकर कुठे आहे, अशी विचारणा केली. मारहाण आणि चाकूच्या धाकाने घाबरलेल्या दासवानी यांनी घरातील सदस्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन, घराच्या लॉकरची चावी दरोडेखोरांना दिली होती. याचा फायदा घेत त्यांच्या घरातील ऐवज लुटला. दरोडेखोरांनी घरातून दोन नाणी घेतली, ज्यावर राणी व्हिक्टोरिया आणि राणी एलिझाबेथ यांचा फोटो होता. याशिवाय सोन्याचे ब्रेसलेट आणि इतर दागिने होते.

त्यावेळी त्यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम 342, 394, 397, 452 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे एसीपी शिंदे यांनी सांगितले. त्यावेळी त्या सोन्याची किंमत 13 लाख 45 हजार रुपये होती, जी आजच्या काळात दीड कोटींपेक्षा जास्त असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आता त्याचे वारसा मूल्य किती असेल, हे सांगणे देखील कठीण आहे.

खटल्याची सुनावणी

शिंदे यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणात एकूण 9 आरोपी होते, त्यापैकी एक आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेला नव्हता. 2002 मध्ये या प्रकरणी न्यायालयाचा आदेश आला होता, त्यात 3 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्यातील एक आरोपी अद्याप ताब्यात यायचा होता, त्यामुळे न्यायालयाने चोरांकडून जप्त केलेले सोने आपल्याकडेच ठेवण्यास सांगितले होते. जोपर्यंत वॉन्टेड आरोपी सापडत नाही आणि त्यांची सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत काळजी घ्यावी, असे न्यायालयाने म्हटले होते.

...आणि सोने परत मिळाले!

दासवानी यांचे वकील सुनील पांडे यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये मुंबई आयुक्तांनी अशा सर्व प्रकरणांमध्ये जप्त केलेले सोने आणि चांदी त्याच्या मालकाला परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तक्रारदार अर्जुन यांचा मुलगा राजू दासवानी याला पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर त्याने वकील पांडे यांच्या मदतीने सत्र न्यायालयात अर्ज केला,  त्यानंतर न्यायालयाने त्याला सोने परत करण्याचे आदेश दिले.

राजू यांच्या वडिलांचे 2007 मध्ये निधन झाले, तेव्हापासून त्यांना हे सोने इतक्या लवकर मिळेल असे वाटले नव्हते. पण सोने मिळताच त्यांचे संपूर्ण कुटुंब खूप भावुक झाले.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Washim Farmer News: अनुदानाबाबत जाब विचारल्याने राग आला; सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, वाशीममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
अनुदानाबाबत जाब विचारल्याने राग आला; सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, वाशीममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Horoscope Today 14 January 2026 : आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या

व्हिडीओ

Mahapalika Election Update : प्रचाराचा 'दी एन्ड', आता सुरु 'माईंड गेम' Special Report
Akola Politics : मतदारांना 'तीळगूळ', उमेदवारांवर 'संक्रांत'? अकोल्यात मतदारांच्या घराबाहेर ठेवल्या साड्या Special Report
Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Farmer News: अनुदानाबाबत जाब विचारल्याने राग आला; सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, वाशीममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
अनुदानाबाबत जाब विचारल्याने राग आला; सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, वाशीममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Horoscope Today 14 January 2026 : आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
KDMC Election 2026 BJP Vs Shivsena: डोंबिवलीत शिवसेना-भाजप राडा, पोलिसांकडून मध्यरात्री शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना अटक, हायव्होल्टेज ड्रामा
डोंबिवलीत मध्यरात्री हायव्होल्टेज राडा, शिवसेनेच्या उमेदवारांना पोलिसांनी हॉस्पिटलमधून उचललं, नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis on Vadapav: देवेंद्र फडणवीसांच्या सभेतील 'त्या' एका वाक्यावरुन 'सामना'तून रान उठवलं, थेट महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या मुद्द्यालाच हात घातला
देवेंद्र फडणवीसांच्या सभेतील 'त्या' एका वाक्यावरुन 'सामना'तून रान उठवलं, थेट महाराष्ट्राच्या स्वाभिमानालाच हात घातला
Embed widget