एक्स्प्लोर

Air India Sale: एयर इंडियाच्या खरेदीसाठी आता कोलकात्याच्या पवन रुईयांचीही दावेदारी

टाटा ग्रुप आणि एयर इंडिया कर्मचारी संघटना यांच्यासोबत एयर इंडियाच्या (Air India) खरेदी स्पर्धेत आता कोलकात्याचे उद्योगपती पवन रुईया (Pawan Ruia) उतरले असून त्यांनीही एयर इंडियाच्या खरेदीची इच्छा व्यक्त केलीय.

नवी दिल्ली: कोलकात्याचे उद्योगपती पवन रुईया यांनी सरकारी एयरलाईन्स कंपनी एयर इंडियाचे 100 टक्के शेअर्स खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली असून तसे पत्र (expression of interest) सरकारकडे दिलं आहे. या आधी टाटा ग्रुप आणि एयर इंडिया कर्मचारी संघटनेनं तशा प्रकारचं पत्र दिलं होतं. आता या दोन महत्वाच्या दावेदारांच्या स्पर्धेत उद्योगपती पवन रुईयाही उतरले आहेत.

कोण आहेत पवन रुइया? उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या पवन रुईया यांनी कोलकात्यात आपल्या रुईया उद्योग समुहाची उभारणी केली. कोलकात्याच्या बाहेर त्यांच्या नावाची जास्त चर्चा नसली तरी त्यांना 'टर्नअराउंड स्पेशलिस्ट' म्हणून ओळखले जाते. त्याचं कारण म्हणजे पवन रुईया यांनी आर्थिक अडचणीत चाललेल्या अनेक कंपन्याची खरेदी केली आणि त्या अगदी कमी कालावधीत पुन्हा फायद्यात आणल्या. यामध्ये डनलॉप इंडिया, फाल्कन टायर्स आणि जेसॉप अॅन्ड कंपनी यांचा समावेश होतोय.

पवन रुईया यांनी 220 वर्षापूर्वीची जुनी असलेली अभियांत्रिकी कंपनी जेसॉप अॅन्ड कंपनी ही 2003 साली ताब्यात घेतली. त्यावेळी ही कंपनी डबघाईला आली होती. पण रुईया यांनी या कंपनीचा ताबा घेतल्यानंतर अगदी कमी कालावधीतच ही कंपनी पुन्हा उभी राहीली. कर्जात असणारी ही कंपनी दोनच वर्षात दहा कोटी नेट प्रॉफिटमध्ये आली.

Good News : Air Indiaकडून प्रवाशांसाठी मोठी सवलत; तिकीट दर अर्ध्यावर

त्यानंतर पवन रुईया यांनी डनलॉप इंडिया आणि फाल्कन टायर्स या दोन कंपन्या ताब्यात घेतल्या. त्या वेळी या दोनही कंपन्या आर्थिक डबघाईला आल्या होत्या. रुईया यांनी ताबा घेताच या कंपनीच्या चार हजार कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर परत बोलवण्यात आलं. कायदेशीर अडचणी सोडवण्यात आल्या. या कर्मचाऱ्यांना कामाची कायदेशीर सुरक्षा देण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये उत्साह निर्माण झाला आणि कंपनीच्या पूर्ण क्षमतेनं उत्पादनाला सुरुवात झाली. त्यामुळे या दोनही कंपन्या कर्जातून बाहेर आल्या.

आता या तिनही कंपन्यांपेक्षा एयर इंडियाची परिस्थिती वेगळी असणार आहे. कारण जी कोणती कंपनी एयर इंडियाचा मालकी हक्क मिळवेल त्याच्या मागे केंद्र सरकार थामपणे उभे राहण्याची शक्यता आहे. यावर पवन रुईया यांनी लगेच काही प्रतिक्रिया दिली नसली तरी या क्षेत्रातले तज्ज्ञांचं असं मत आहे की रुईया हे अशा एका व्यावसायिक पार्टनरच्या शोधात आहेत जो त्यांना भक्कमपणे आर्थिक साथ देऊ शकेल.

एयर इंडियाच्या मालकी हक्काची खरेदी करणाऱ्या कंपनीकडे किमान 3,500 कोटी रुपयांची नेट व्हॅल्यू असणं आवश्यक आहे असं सरकारकडून सांगण्यात आलंय. या क्षेत्रातील अनुभव आणि आर्थिक परिस्थिती पाहता टाटा ग्रुपची दावेदारी अधिक भक्कम आहे असं दिसतंय.

वेतन कपातीविरोधात एअर इंडिया कर्मचाऱ्यांची हायकोर्टात धाव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget