एक्स्प्लोर

अमळनेरच्या घटनेतून : भाजपानेच अंतर्गत गटबाजीतून उभी केली पक्षासमोर आव्हाने

१९९१ पासून जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचा भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे. मात्र अशा फ्रीस्टाइल होत असतील तर याचा याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना वाटलं नसेल इतके ते अज्ञानी नाहीत.

अमळनेर येथे भारतीय जनता पार्टीचा मेळावा घेण्यात आला. लोकसभा निवडणूक असल्याने प्रचार सभा, भव्य मांडवातील व्यासपीठावर पक्षाचे मंत्री गिरीश महाजन, मित्र पक्ष शिवसेनेचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील, अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी, भाजपाचे माजी आमदार डॉ.बी एस पाटील,  भाजपाचे उमेदवार उन्मेष पाटील, जिल्हा अध्यक्ष उदय वाघ, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ इतर आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. इतके सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असताना व्यासपीठावर खालून स्मिता वाघ आगे बढोच्या घोषणा दिल्या जातात भाजपाचे माजी आमदार बी एस पाटील यांना व्यासपीठाखाली उतरवण्यासाठी कार्यकर्ते ओरडतात आणि तितक्यात जिल्हा अध्यक्ष उदय वाघ उठतात आणि माजी आमदार डॉ.बी एस पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात करतात. नेता मारतोय म्हणून कार्यकर्तेही व्यासपीठावर चढून मारहाणीत सहभागी होतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून खासदार ए टी पाटील यांचे तिकीट कापले गेले आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आले. तिकीट कापले गेल्यानंतर ए टी पाटिल त्यांनी पारोळा येथे मेळावा घेतला. त्याचवेळी अमळनेर येथील वादाची ठिणगी पडली होती. मेळाव्यात गिरीश महाजन यांचेवरसुद्दा आरोप करण्यात आले होते, तसेच उदय वाघ यांचा आरोप आहे की माजी आमदार डॉ.बी एस पाटिल यांनी पारोळा येथील मेळाव्यात स्मिता वाघ यांच्याविषयी गैर उद्गार काढले होते. स्मिता वाघाचे लोकसभेचे फॉर्म भरले गेले असताना, (विशेष म्हणजे भाजपाच्या ए.बी. फॉर्म वर) स्मिता वाघ यांचे तिकीट रद्द करून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटिल यांना उमेदवारी देण्यात आली आणि स्मिता वाघ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राग वाढला. स्मिता वाघ यांचे तिकीट कापले गेल्याने वाघ समर्थकानी भाजपाचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांचे जळगाव येथील कार्यालयात त्यांच्याशीसुद्धा वाद घातला होता. परंतु अमळनेरच्या मेळाव्याआधी गिरीश महाजन यांनी स्मिता वाघ यांचे पती आणि भाजपाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ.बी एस पाटील यांचेत समेट घडवून आपल्या गाडीतच बसवून दोघांना मेळाव्या ठिकाणी आणले होते. मंत्री गिरीश महाजन यांना भाजपा महाराष्ट्रात संकटमोचक मानते. मंत्री गिरीश महाजन यांनी  भाजपाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ.बी एस पाटील यांच्यात समेट घडवून आणला होता. मग व्यासपीठावर हा हंगामा झाला कसा? महाराष्ट्रात भाजपाचे संकट मोचक ठरलेले गिरीश महाजन यांना त्यांच्याच जिल्ह्यात पदाधिकारी जुमानत नसतील आणि त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकी जळगावचीच भाजपाची लोकसभेची सीट पडली तर संकटमोचकच संकटात येऊ शकत नाहीं का? अमळनेरातील महायुतीच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर झालेला हाणामारीचा प्रकार हा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील एक लज्जास्पद अध्याय म्हणून गणला जाणार आहे. राजकारण ही विचारांची लढाई मानली जाते. येथे विचाराचा प्रतिकार विचारानेच करणे अपेक्षित असते. अगदी विरोधकांसोबतही शालिन, सुसंस्कृतपणे वागणे अभिप्रेत असते. मात्र जिथे स्वकीयच लाथा-बुक्क्यांवर उतरतात आणि लोकशाही ही ठोकशाहीत परिवर्तित होते; तिथे नैतिक पतनाचा प्रारंभ होतो. अलीकडच्या काही घटना या भाजपच्या नैतिक र्‍हासपर्वाची नांदी ठरल्या होत्या. अमळनेरातील धुडगुस हा यावर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे. गत सुमारे अडीच दशकांपासून जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाने एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांना महत्वाची खाती दिली. मात्र मुख्यमंत्र्यांना डोईजड झालेल्या खडसे यांना हटविण्यासाठी त्यांच्यासमोर महाजन यांना समोर करण्यात आले. यातून निर्माण झालेले सूडचक्र आता गटबाजीच्या पलीकडे जात अश्‍लील क्लिपमार्गे मारहाणीपर्यंत येऊन ठेपले आहे. खरं तर, खडसे आणि महाजन यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले असते तर जिल्ह्यात विकासगंगा नव्हे तर किमान विकासाची तापी/गिरणा नदी तरी वाहिली असती. मात्र आजही महापालिकेच्या सतराव्या मजल्यावरून जरी दुर्बिण घेऊन पाहिले तर फक्त विकासाचा नालाच वाहतांना दिसतो. अर्थात, काँग्रेसी पॅटर्ननुसार भाजपच्या वरिष्ठांनी जिल्ह्यातील नेत्यांचा वापर करून म्हणजेच त्यांना एकमेकांसमोर उभे करून स्वत:चा स्वार्थ साधून घेतला. नेते भांडणांमध्ये मग्न तर जनता कामे होत नसल्यामुळे त्रस्त असा हा सर्व प्रकार सध्या सुरू आहे. व्यासपीठावर दोन मंत्री, आमदार विविध पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी असतांना वादाला हे सर्व मिलवून थांबवू कसे शकले नाही? का हे घड़णे पूर्वनियोजित होते? प्रश्न जरी अनुत्तरित असले तरी आपसातील वाद जाहीर करायला व्यासपीठ हा नक्कीच पर्याय नव्हता, एक शिस्त प्रिय पक्षाच्या महत्वाच्या पदावरील लोकांकडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेले हे फ्री स्टाईल एका वरिष्ठ आणि आपल्याच पक्षाच्या माजी आमदारास लोकांसमोर केलेली मारहाण हीच भाजपाची शिस्त आता राहिली का ? १९९१ पासून जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचा भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे. मात्र अशा फ्रीस्टाइल होत असतील तर याचा याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना वाटल नसेल इतके ते अज्ञानी नाहीत. असो मात्र या वादाने भाजपाची प्रतिमा मलिन होत आहे हे वेगळे सांगायला नको.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Embed widget