एक्स्प्लोर

BLOG: सेमी फायनलमध्ये आऊट, निवड समितीला गो आऊट; बीसीसीआयचं कडक पाऊल!

Ashvin Bapat Blog On  BCCI sacks selection committee: टीम इंडियाच्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील सेमी फायनलच्या मानहानीकारक पराभवाला बीसीसीआयने अत्यंत गांभीर्याने घेतलंय. चेतन शर्मांच्या नेतृत्वाखालील अख्खी निवड समिती बदलण्याचा निर्णय आता बीसीसीआयने घेतलाय. या स्पर्धेत टीम इंडियाचा मुकाबला पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तीन तगड्या संघांशी झाला होता. यापैकी पाकविरुद्धची लढत कशीबशी जिंकली होती, तर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध भारताला दोन मोठ्या पराभवांना सामोरं जावं लागलं होतं. यातील सेमी फायनलचा पराभव इतका जिव्हारी लागणारा होता की, इंग्लिश सलामीवीरांची जोडीही भारत फोडू शकला नव्हता. बटलरच्या टीमने चार ओव्हर्स आणि दहा विकेट्स राखत भारताला धूळ चारली. तर, अन्य सामन्यातील भारतीय कामगिरीचा विचार केल्यास बांगलादेशविरुद्धच्या लढाईत जिंकतानाही आपल्याला घाम फुटला होता. नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे हे दोनच सामने आपण त्यातल्या त्यात कम्फर्टेबली जिंकलो होतो. पण, या दोघांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ताकद ही भारताच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. याउलट टी-ट्वेन्टी सांघिक क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी आहे. त्यामुळे या लौकिकाला अव्वल संघांविरुद्धची कामगिरी नक्कीच साजेशी नाही. टी-ट्वेन्टी हा तरुण रक्ताचा, सळसळत्या तारुण्याचा आणि अव्वल फिटनेसचा खेळ आहे. अशा खेळात आपल्या संघातील काही खेळाडूंचं वय, फिटनेस यावरुन चर्चा सुरु झाल्या असतानाच आता बीसीसीआयने हे कठोर पाऊल उचललंय. 

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समध्ये आता आपल्याकडे वेगळे संघ आणि वेगळा कॅप्टन असावा, अशी चर्चा जोरात सुरु आहे. काही देशांनी याआधीच तिन्ही फॉरमॅट्सकरता ही तरतूद करुन ठेवलीय. इंग्लंडचंच उदाहरण घेऊया. त्यांनी मॉर्गन, स्टोक्स आणि बटलर अशा निरनिराळ्या खेळाडूंना कर्णधार म्हणून नियुक्त करत त्या त्या फॉरमॅटची तयारी उत्तम केली. आपण, कोहलीसह तिन्ही फॉरमॅट्समध्ये खेळणं आधी प्रिफर केलं होतं. कोहलीने कॅप्टन्सी सोडल्यावर आपण रोहित, राहुल असे पर्याय चाचपले. आता प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यावर आपण किवी दौऱ्यासाठी हार्दिक पंड्याकडे संघाचं सुकाणू दिलंय. खरं तर ही फक्त तात्पुरती अरेंजमेंट म्हणून न करता भारतीय क्रिकेटच्या म्हणजे टी-ट्वेन्टी क्रिकेटच्या भविष्यासाठी ही गुंतवणूक ठरावी‌, असं असलं तरीही भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मात्र सावध पावलं टाकण्याचाच सल्ला दिलाय. भारताच्या सेमी फायनलमधील पराभवानंतर ते म्हणतात, संघात मोठ्या प्रमाणात बदल करुन काहीच साध्य होणार नाही. आपल्याकडे एखाद्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर संघावर वाट्टेल तसे ताशेरे मारण्याची प्रथाच पडलीय. हा योग्य मार्ग नव्हे. निवड समितीला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, हे मान्य आहे. असं असलं तरीही याकरता आपल्याला काही वेळ द्यावाच लागेल. माझी खात्री आहे की, निवड समिती योग्य ती पावलं उचलेल.

एकाच पराभवाने सारं काही संपलं, असं मानण्याची गरज नसली तरीही पुढच्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी संघबांधणीची हीच खरी वेळ आहे. हार्दिक पंड्याला जर आपण दीर्घकालीन टी-ट्वेन्टी कॅप्टन म्हणून पाहत असू. तर त्याच्या हातात असा ग्रुप ऑफ प्लेअर्स द्यायला हवा, जो आपल्याला पुढची किमान पाच वर्षे या फॉरमॅटमध्ये उत्तम रिझल्ट देईल. याची सुरुवात बीसीसीआयने निवड समितीपासून केलीय. आता नव्याने निवड समिती निवडल्यानंतर ती कशी परफॉर्म करते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP Premium

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Embed widget