एक्स्प्लोर

BLOG: सेमी फायनलमध्ये आऊट, निवड समितीला गो आऊट; बीसीसीआयचं कडक पाऊल!

Ashvin Bapat Blog On  BCCI sacks selection committee: टीम इंडियाच्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील सेमी फायनलच्या मानहानीकारक पराभवाला बीसीसीआयने अत्यंत गांभीर्याने घेतलंय. चेतन शर्मांच्या नेतृत्वाखालील अख्खी निवड समिती बदलण्याचा निर्णय आता बीसीसीआयने घेतलाय. या स्पर्धेत टीम इंडियाचा मुकाबला पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तीन तगड्या संघांशी झाला होता. यापैकी पाकविरुद्धची लढत कशीबशी जिंकली होती, तर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध भारताला दोन मोठ्या पराभवांना सामोरं जावं लागलं होतं. यातील सेमी फायनलचा पराभव इतका जिव्हारी लागणारा होता की, इंग्लिश सलामीवीरांची जोडीही भारत फोडू शकला नव्हता. बटलरच्या टीमने चार ओव्हर्स आणि दहा विकेट्स राखत भारताला धूळ चारली. तर, अन्य सामन्यातील भारतीय कामगिरीचा विचार केल्यास बांगलादेशविरुद्धच्या लढाईत जिंकतानाही आपल्याला घाम फुटला होता. नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे हे दोनच सामने आपण त्यातल्या त्यात कम्फर्टेबली जिंकलो होतो. पण, या दोघांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ताकद ही भारताच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. याउलट टी-ट्वेन्टी सांघिक क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी आहे. त्यामुळे या लौकिकाला अव्वल संघांविरुद्धची कामगिरी नक्कीच साजेशी नाही. टी-ट्वेन्टी हा तरुण रक्ताचा, सळसळत्या तारुण्याचा आणि अव्वल फिटनेसचा खेळ आहे. अशा खेळात आपल्या संघातील काही खेळाडूंचं वय, फिटनेस यावरुन चर्चा सुरु झाल्या असतानाच आता बीसीसीआयने हे कठोर पाऊल उचललंय. 

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समध्ये आता आपल्याकडे वेगळे संघ आणि वेगळा कॅप्टन असावा, अशी चर्चा जोरात सुरु आहे. काही देशांनी याआधीच तिन्ही फॉरमॅट्सकरता ही तरतूद करुन ठेवलीय. इंग्लंडचंच उदाहरण घेऊया. त्यांनी मॉर्गन, स्टोक्स आणि बटलर अशा निरनिराळ्या खेळाडूंना कर्णधार म्हणून नियुक्त करत त्या त्या फॉरमॅटची तयारी उत्तम केली. आपण, कोहलीसह तिन्ही फॉरमॅट्समध्ये खेळणं आधी प्रिफर केलं होतं. कोहलीने कॅप्टन्सी सोडल्यावर आपण रोहित, राहुल असे पर्याय चाचपले. आता प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यावर आपण किवी दौऱ्यासाठी हार्दिक पंड्याकडे संघाचं सुकाणू दिलंय. खरं तर ही फक्त तात्पुरती अरेंजमेंट म्हणून न करता भारतीय क्रिकेटच्या म्हणजे टी-ट्वेन्टी क्रिकेटच्या भविष्यासाठी ही गुंतवणूक ठरावी‌, असं असलं तरीही भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मात्र सावध पावलं टाकण्याचाच सल्ला दिलाय. भारताच्या सेमी फायनलमधील पराभवानंतर ते म्हणतात, संघात मोठ्या प्रमाणात बदल करुन काहीच साध्य होणार नाही. आपल्याकडे एखाद्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर संघावर वाट्टेल तसे ताशेरे मारण्याची प्रथाच पडलीय. हा योग्य मार्ग नव्हे. निवड समितीला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, हे मान्य आहे. असं असलं तरीही याकरता आपल्याला काही वेळ द्यावाच लागेल. माझी खात्री आहे की, निवड समिती योग्य ती पावलं उचलेल.

एकाच पराभवाने सारं काही संपलं, असं मानण्याची गरज नसली तरीही पुढच्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी संघबांधणीची हीच खरी वेळ आहे. हार्दिक पंड्याला जर आपण दीर्घकालीन टी-ट्वेन्टी कॅप्टन म्हणून पाहत असू. तर त्याच्या हातात असा ग्रुप ऑफ प्लेअर्स द्यायला हवा, जो आपल्याला पुढची किमान पाच वर्षे या फॉरमॅटमध्ये उत्तम रिझल्ट देईल. याची सुरुवात बीसीसीआयने निवड समितीपासून केलीय. आता नव्याने निवड समिती निवडल्यानंतर ती कशी परफॉर्म करते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
Sunil Shelke : मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shivsena vs BJP : भाजप-शिवसेनेची राज्यात मैत्री, पण नगरपालिकेत कुस्ती? Special Report
Donkey soap : गाढविणीच्या दुधाने अंघोळ, काय असतं खास? Special Report
Periods Leave Policy : कोणत्या राज्यात मिळते मासिळ पाळी रजा? Special Reports
Iran : इराणमध्ये फाशीचं सत्र, दहा महिन्यात 1000 जण फासावर Special Report
Celebrity Marriage : अब्जाधीश वामसी गदिराजूंचा डोळे दीपवणारा लग्नसोहळा Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
Sunil Shelke : मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
Yugendra Pawar : आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
IPL :राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठा निर्णय घेणार
राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Satara Politics : सातारा जिल्ह्यात सातारा कराडसह नऊ नगरपरिषदा आणि मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी कोण रिंगणात? यादी पाहा
सातारा जिल्ह्यात सातारा कराडसह नऊ नगरपरिषदा आणि मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी कोण रिंगणात? यादी पाहा
Silver Rate : चांदीच्या दरात आठवड्यात 8000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर देखील घसरले, जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात आठवड्यात 8000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर देखील घसरले, जाणून घ्या नवे दर
Embed widget