एक्स्प्लोर

BLOG: सेमी फायनलमध्ये आऊट, निवड समितीला गो आऊट; बीसीसीआयचं कडक पाऊल!

Ashvin Bapat Blog On  BCCI sacks selection committee: टीम इंडियाच्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील सेमी फायनलच्या मानहानीकारक पराभवाला बीसीसीआयने अत्यंत गांभीर्याने घेतलंय. चेतन शर्मांच्या नेतृत्वाखालील अख्खी निवड समिती बदलण्याचा निर्णय आता बीसीसीआयने घेतलाय. या स्पर्धेत टीम इंडियाचा मुकाबला पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तीन तगड्या संघांशी झाला होता. यापैकी पाकविरुद्धची लढत कशीबशी जिंकली होती, तर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध भारताला दोन मोठ्या पराभवांना सामोरं जावं लागलं होतं. यातील सेमी फायनलचा पराभव इतका जिव्हारी लागणारा होता की, इंग्लिश सलामीवीरांची जोडीही भारत फोडू शकला नव्हता. बटलरच्या टीमने चार ओव्हर्स आणि दहा विकेट्स राखत भारताला धूळ चारली. तर, अन्य सामन्यातील भारतीय कामगिरीचा विचार केल्यास बांगलादेशविरुद्धच्या लढाईत जिंकतानाही आपल्याला घाम फुटला होता. नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे हे दोनच सामने आपण त्यातल्या त्यात कम्फर्टेबली जिंकलो होतो. पण, या दोघांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ताकद ही भारताच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. याउलट टी-ट्वेन्टी सांघिक क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी आहे. त्यामुळे या लौकिकाला अव्वल संघांविरुद्धची कामगिरी नक्कीच साजेशी नाही. टी-ट्वेन्टी हा तरुण रक्ताचा, सळसळत्या तारुण्याचा आणि अव्वल फिटनेसचा खेळ आहे. अशा खेळात आपल्या संघातील काही खेळाडूंचं वय, फिटनेस यावरुन चर्चा सुरु झाल्या असतानाच आता बीसीसीआयने हे कठोर पाऊल उचललंय. 

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समध्ये आता आपल्याकडे वेगळे संघ आणि वेगळा कॅप्टन असावा, अशी चर्चा जोरात सुरु आहे. काही देशांनी याआधीच तिन्ही फॉरमॅट्सकरता ही तरतूद करुन ठेवलीय. इंग्लंडचंच उदाहरण घेऊया. त्यांनी मॉर्गन, स्टोक्स आणि बटलर अशा निरनिराळ्या खेळाडूंना कर्णधार म्हणून नियुक्त करत त्या त्या फॉरमॅटची तयारी उत्तम केली. आपण, कोहलीसह तिन्ही फॉरमॅट्समध्ये खेळणं आधी प्रिफर केलं होतं. कोहलीने कॅप्टन्सी सोडल्यावर आपण रोहित, राहुल असे पर्याय चाचपले. आता प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यावर आपण किवी दौऱ्यासाठी हार्दिक पंड्याकडे संघाचं सुकाणू दिलंय. खरं तर ही फक्त तात्पुरती अरेंजमेंट म्हणून न करता भारतीय क्रिकेटच्या म्हणजे टी-ट्वेन्टी क्रिकेटच्या भविष्यासाठी ही गुंतवणूक ठरावी‌, असं असलं तरीही भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मात्र सावध पावलं टाकण्याचाच सल्ला दिलाय. भारताच्या सेमी फायनलमधील पराभवानंतर ते म्हणतात, संघात मोठ्या प्रमाणात बदल करुन काहीच साध्य होणार नाही. आपल्याकडे एखाद्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर संघावर वाट्टेल तसे ताशेरे मारण्याची प्रथाच पडलीय. हा योग्य मार्ग नव्हे. निवड समितीला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, हे मान्य आहे. असं असलं तरीही याकरता आपल्याला काही वेळ द्यावाच लागेल. माझी खात्री आहे की, निवड समिती योग्य ती पावलं उचलेल.

एकाच पराभवाने सारं काही संपलं, असं मानण्याची गरज नसली तरीही पुढच्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी संघबांधणीची हीच खरी वेळ आहे. हार्दिक पंड्याला जर आपण दीर्घकालीन टी-ट्वेन्टी कॅप्टन म्हणून पाहत असू. तर त्याच्या हातात असा ग्रुप ऑफ प्लेअर्स द्यायला हवा, जो आपल्याला पुढची किमान पाच वर्षे या फॉरमॅटमध्ये उत्तम रिझल्ट देईल. याची सुरुवात बीसीसीआयने निवड समितीपासून केलीय. आता नव्याने निवड समिती निवडल्यानंतर ती कशी परफॉर्म करते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Crime Special Report : दिल्ली ॲसिड हल्ला प्रकरणात मोठा खुलासा, कुणी रचला बनाव?
Gangaram Gavankar : ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर अनंतात विलीन
MCA Election Row: 'असा कोणताही ठराव मंजूर नाही', MCA निवडणुकीवरून 28 Clubs आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद पेटला
BEST Fleet: '...आधीच्या सरकारने Best ला West केले', DCM Eknath Shinde यांचा मागील सरकारवर निशाणा
CNAP Mandate: 'आता मोबाईलवर दिसणार कॉलरचे खरे नाव', Spam Calls आणि फसवणुकीला बसणार चाप!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Mohammad Shami : मोहम्मद शमीचा सलग दुसऱ्या रणजी सामन्यात धमाका, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, आगरकरसह निवड समितीचं टेन्शन वाढलं
मोहम्मद शमीचा धडाका कायम, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, निवड समितीला दमदार कामगिरीतून उत्तर
Rashmika Mandanna: 8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचं आणखी एक पाऊल
आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय
Embed widget