एक्स्प्लोर

Success Tips : सतत मनात नको ते विचार येतात? मन एकाग्र आणि शांत ठेवण्यासाठी करा 5 गोष्टी, टेन्शनला करा टाटा बाय

तुमच्या मनात सतत विचार सुरू असतील तर तुम्ही कोणतंही प्रोडक्टिव्ह काम करू शकणार नाही, त्यामुळे तुमचा तुमच्या मनावर ताबा असणं फार महत्त्वाचं आहे.

Success Mantra : आजच्या व्यस्त जीवनशैलीत तणाव ही एक सामान्य गोष्ट आहे. कामाचा ताण, घरगुती जबाबदाऱ्या आणि त्याचसोबत अनेक छोट्यामोठ्या समस्या मन अस्वस्थ करतात. अनेक वेळा मनात नकारात्मक विचार आल्याने मन अस्वस्थ होतं. मन शांत नसेल तर कोणतंही काम नीट करता येत नाही. अशा वेळी मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही काही मार्ग (Tips) अवलंबू शकतात. ते नेमके कोणते? जाणून घेऊया.

ध्यान आणि योग (Meditation and Yoga)

जर तुमचं मन नेहमी विचलित असेल, कोणत्या ना कोणत्या विचारात बुडालं असेल तर तुम्ही तुमच्या दिनचर्येत ध्यान आणि योगाचा समावेश करावा. मन शांत करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. तर योगामुळे शरीर तर निरोगी राहतेच पण मन शांत होण्यासही मदत होते. प्राणायाम आणि ध्यानाचा नियमित सराव केल्याने तणाव आणि चिंता कमी होते.

सकारात्मक विचार (Positive Thoughts)

सकारात्मक विचार केल्याने नकारात्मक विचार दूर होतात, तणाव कमी होतो आणि कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची ताकद मिळते. जर तुम्हाला तुमचं मन शांत ठेवायचं असेल तर तुमच्या मनात नकारात्मक विचारांना जागा देऊ नका. सकारात्मक विचार विकसित करा आणि नेहमी आशावादी रहा. नेहमी कृतज्ञतेची भावना ठेवा. तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला गेलात तर आपोआप तुमचे विचार सकारात्मक होतील.

निरोगी जीवनशैली अंगीकारा (Follow Positive Lifestyle)

निरोगी जीवनशैली आपल्या जीवनातील प्रत्येक पैलू सुधारते. निरोगी जीवनशैलीमुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्या निरोगी तर राहालच, पण मानसिकदृष्ट्या देखील तुम्ही फिट राहाल आणि भावनांवर नियंत्रण मिळवणं तुमच्यासाठी सोपं जाईल. यासाठी तुम्ही पौष्टिक आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि 7-8 तास चांगली झोप घ्या. अल्कोहोल, धूम्रपान आणि कॅफिनचं सेवन मर्यादित करा.

तुमच्या भावना व्यक्त करा (Express Your Feelings)

आपल्या भावना दडपण्याऐवजी त्या कोणाकडे तरी व्यक्त करा. भावना व्यक्त केल्याने मन शांत होतं. भावना व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. काही लोकांना इतरांशी बोलणं फायद्याचं वाटतं, तर काहींना त्यांच्या भावना लेखन किंवा कलेद्वारे व्यक्त करणं आवडतं. यासाठी तुम्ही थेरपिस्टचा सल्ला देखील घेऊ शकता. 

तुम्हाला जे आवडतं ते करा (Follow Your Passion)

जर तुमचं मन अस्वस्थ असेल तर तुम्हाला आवडेल असं काहीतरी करा. तुमचे छंद जोपासा. तुमचे छंद पूर्ण केल्याने तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमचं मन शांत राहील. यासाठी गाणी ऐका, पुस्तकं वाचा, चित्रकला करा, रोज थोडा वेळ निसर्गात घालवा, उद्यानात फेरफटका मारा किंवा काही वेळ झाडाखाली बसा.

हेही वाचा:

Chanakya Niti : आयुष्यात कधीच येणार नाही अपयश; उंच भरारी घेण्यासाठी पक्ष्यांकडून शिका 'या' 4 गोष्टी, चाणक्य सांगतात...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
Mahavikas Aghadi Joint Press Conference : महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
Shantigiri Maharaj : 'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J P Nadda On Rss : आता भाजप सक्षम, जेपी नड्डा यांचं RSS वर मोठं वक्तव्य ABP MajhaABP Majha Headlines : 10 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 18 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09.00 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
Mahavikas Aghadi Joint Press Conference : महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
Shantigiri Maharaj : 'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
Kolhapur Crime : भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
Virat Kohli Anushka Sharma : दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
Embed widget