एक्स्प्लोर

Pitru Paksha 2024: पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी कावळ्यांनाच अन्न का दिलं जातं?

Pitru Paksha 2024: पितृपक्षात केलेल्या श्राद्ध विधींचे अन्न कावळ्यांना खाऊ घातल्यास पितरांना मुक्ती आणि शांती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो, अशी धारणा आहे.

Pitru Paksha 2024: हिंदू धर्मात पितृ पक्षाला (Pitru Paksha) अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पितृ पंधरवड्यात आपल्या दिवंगत पूर्वजांचं स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली जाते. साधारणतः भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन कृष्ण पक्ष अमावास्येपर्यंत असा 15 ते 16 दिवस पितृपक्ष असतो. या काळात लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध घालतात. श्राद्ध विधींमध्ये पितरांना नैवेद्य, पिंडदान आणि इतर धार्मिक विधी केले जातात. पण, तुम्हाला माहीत असेल की, हिंदू धर्मात पितृ पंधरवड्यात कावळ्यांना नैवेद्य ठेवण्याची प्रथा आहे. तसेच, या प्रथेला खूप महत्त्व आहे. 

पितृपक्षात केलेल्या श्राद्ध विधींचे अन्न कावळ्यांना खाऊ घातल्यास पितरांना मुक्ती आणि शांती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो, अशी धारणा आहे. यामुळे पितर प्रसन्न होऊन साधकांना आशीर्वाद देतात, त्यामुळे साधकाच्या कुंडलीत पितृदोष असल्यास पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षात कावळ्यांना अन्नदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. पण पितृपक्षात कावळ्यांनाच का नैवेद्य दाखवतात?

पितृ पक्षात कावळ्यांना अन्नदान का करतात? 

यमदूताचं प्रतीक मानले जातात... 

हिंदू धर्मात कावळा हे यमदूताचे वाहन आणि यमाचे प्रतीक मानले जातात. यमराज हा मृत्यूचा देव आहे. असं मानलं जातं की, पितृपक्षात पितरांचे आत्मा पृथ्वीवर येतात आणि कावळ्यांच्या रूपात अन्नाचं सेवन करतात. जेव्हा आपण कावळ्यांना अन्न देतो, तेव्हा असं मानलं जातं की, आपण आपल्या पूर्वजांना संतुष्ट करतो आणि त्यांच्या आत्म्याला संतुष्ट करतो. 

पूर्वजांचा दूत म्हणजे, कावळा

काही मान्यतांनुसार, कावळे देखील पूर्वजांचे दूत मानले जातात. त्यामुळे पितृ पक्षाच्या काळात कावळ्यांना खाऊ घातल्यामुळे पितृदोष दूर होतोच, त्यासोबतच पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो.

कावळा आणि भगवान राम यांचा संबंध महत्त्वाचा 

कावळा देखील भगवान रामाशी संबंधित मानला जातो. ज्याचा एका पौराणिक कथेत उल्लेख आहे. कथेनुसार, एकदा एका कावळ्यानं माता सीतेच्या पायावर चोच मारली होती. त्यामुळे माता सीतेच्या पायाला जखम झाली. माता सीतेला वेदना होत असल्याचं पाहून भगवान राम क्रोधित झाले आणि त्यांनी बाण मारून कावळ्याला जखमी केलं. यानंतर जेव्हा कावळ्याला आपली चूक समजली, त्यावेळी त्यानं माता सीता आणि भगवान श्रीराम यांची माफी मागितली. भगवान श्रीरामांनी लगेच कावळ्याला माफ केलं आणि वरदान दिलं की, आता तुझ्याद्वारेच पितरांना मोक्ष मिळेल. तेव्हापासून पितृपक्षात कावळ्यांना भोजन देण्याची ही परंपरा शतकानुशतकं सुरू आहे, अशी अख्यायिका सांगितली जाते. 

(टीप : वर सांगितलेल्या सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pitru Paksha: पितृ पक्षापूर्वी तुमच्यासोबत 'या' घटना घडल्या, तर वेळीच सावध व्हा; पितृदोषाचे संकेत तर नाहीत...!

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: भगवान विठ्ठल पंढरपुरात येण्यामागे 'हे' मोठं कारण? एका भक्ताची विनंती भगवंतांनी कशी मान्य केली? पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
भगवान विठ्ठल पंढरपुरात येण्यामागे 'हे' मोठं कारण? एका भक्ताची विनंती भगवंतांनी कशी मान्य केली? पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
Kalki Puran: सावधान, कलियुगाचा अंत व्हायला 'इतका' वेळ शिल्लक? भगवान कल्कि कधी घेणार अवतार? कल्कि पुराणातील रहस्य जाणून व्हाल थक्क
सावधान, कलियुगाचा अंत व्हायला 'इतका' वेळ शिल्लक? भगवान कल्कि कधी घेणार अवतार? कल्कि पुराणातील रहस्य जाणून व्हाल थक्क
Shadashtak Yog 2026 : शुक्र-शनिच्या युतीने जुळून येणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, हातात खेळणार पैसाच पैसा
शुक्र-शनिच्या युतीने जुळून येणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, हातात खेळणार पैसाच पैसा
Vastu Tips : पावसाळ्यात 'ही' 7 शुभ झाडं घरी लावा; घरात पैशांची होईल बरसात, लक्ष्मीची कृपाही राहील - वास्तूशास्त्र
पावसाळ्यात 'ही' 7 शुभ झाडं घरी लावा; घरात पैशांची होईल बरसात, लक्ष्मीची कृपाही राहील - वास्तूशास्त्र

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
Embed widget