एक्स्प्लोर

Pitru Paksha 2024: पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी कावळ्यांनाच अन्न का दिलं जातं?

Pitru Paksha 2024: पितृपक्षात केलेल्या श्राद्ध विधींचे अन्न कावळ्यांना खाऊ घातल्यास पितरांना मुक्ती आणि शांती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो, अशी धारणा आहे.

Pitru Paksha 2024: हिंदू धर्मात पितृ पक्षाला (Pitru Paksha) अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पितृ पंधरवड्यात आपल्या दिवंगत पूर्वजांचं स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली जाते. साधारणतः भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन कृष्ण पक्ष अमावास्येपर्यंत असा 15 ते 16 दिवस पितृपक्ष असतो. या काळात लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध घालतात. श्राद्ध विधींमध्ये पितरांना नैवेद्य, पिंडदान आणि इतर धार्मिक विधी केले जातात. पण, तुम्हाला माहीत असेल की, हिंदू धर्मात पितृ पंधरवड्यात कावळ्यांना नैवेद्य ठेवण्याची प्रथा आहे. तसेच, या प्रथेला खूप महत्त्व आहे. 

पितृपक्षात केलेल्या श्राद्ध विधींचे अन्न कावळ्यांना खाऊ घातल्यास पितरांना मुक्ती आणि शांती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो, अशी धारणा आहे. यामुळे पितर प्रसन्न होऊन साधकांना आशीर्वाद देतात, त्यामुळे साधकाच्या कुंडलीत पितृदोष असल्यास पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षात कावळ्यांना अन्नदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. पण पितृपक्षात कावळ्यांनाच का नैवेद्य दाखवतात?

पितृ पक्षात कावळ्यांना अन्नदान का करतात? 

यमदूताचं प्रतीक मानले जातात... 

हिंदू धर्मात कावळा हे यमदूताचे वाहन आणि यमाचे प्रतीक मानले जातात. यमराज हा मृत्यूचा देव आहे. असं मानलं जातं की, पितृपक्षात पितरांचे आत्मा पृथ्वीवर येतात आणि कावळ्यांच्या रूपात अन्नाचं सेवन करतात. जेव्हा आपण कावळ्यांना अन्न देतो, तेव्हा असं मानलं जातं की, आपण आपल्या पूर्वजांना संतुष्ट करतो आणि त्यांच्या आत्म्याला संतुष्ट करतो. 

पूर्वजांचा दूत म्हणजे, कावळा

काही मान्यतांनुसार, कावळे देखील पूर्वजांचे दूत मानले जातात. त्यामुळे पितृ पक्षाच्या काळात कावळ्यांना खाऊ घातल्यामुळे पितृदोष दूर होतोच, त्यासोबतच पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो.

कावळा आणि भगवान राम यांचा संबंध महत्त्वाचा 

कावळा देखील भगवान रामाशी संबंधित मानला जातो. ज्याचा एका पौराणिक कथेत उल्लेख आहे. कथेनुसार, एकदा एका कावळ्यानं माता सीतेच्या पायावर चोच मारली होती. त्यामुळे माता सीतेच्या पायाला जखम झाली. माता सीतेला वेदना होत असल्याचं पाहून भगवान राम क्रोधित झाले आणि त्यांनी बाण मारून कावळ्याला जखमी केलं. यानंतर जेव्हा कावळ्याला आपली चूक समजली, त्यावेळी त्यानं माता सीता आणि भगवान श्रीराम यांची माफी मागितली. भगवान श्रीरामांनी लगेच कावळ्याला माफ केलं आणि वरदान दिलं की, आता तुझ्याद्वारेच पितरांना मोक्ष मिळेल. तेव्हापासून पितृपक्षात कावळ्यांना भोजन देण्याची ही परंपरा शतकानुशतकं सुरू आहे, अशी अख्यायिका सांगितली जाते. 

(टीप : वर सांगितलेल्या सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pitru Paksha: पितृ पक्षापूर्वी तुमच्यासोबत 'या' घटना घडल्या, तर वेळीच सावध व्हा; पितृदोषाचे संकेत तर नाहीत...!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 6 मार्चचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनलाभाचे संकेत, वाचा लकी राशी
6 मार्चचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनलाभाचे संकेत, वाचा लकी राशी
Vastu Shashtra: मंडळींनो..तुम्ही पोळ्या मोजून बनवत असाल, तर सावधान! परिणाम जाणून व्हाल थक्क, वास्तुशास्त्र म्हणते...
मंडळींनो..तुम्ही पोळ्या मोजून बनवत असाल, तर सावधान! परिणाम जाणून व्हाल थक्क, वास्तुशास्त्र म्हणते...
March Month Born Zodiac Personality : मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो? वाचा लकी नंबर आणि स्वभाव वैशिष्ट्ये
मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो? वाचा लकी नंबर आणि स्वभाव वैशिष्ट्ये
Weekly Horoscope: मार्चचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ संकेत, 7 राशींची भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
मार्चचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ संकेत, 7 राशींची भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget