एक्स्प्लोर

Chanakya Niti : डोक्यावर कर्जाचा बोजा असो वा रखडलेलं प्रमोशन, पगारवाढ; तुमच्या वाईट काळात चाणक्यांच्या 'या' 3 शिकवणी पडतील कामी, लवकरच येतील 'अच्छे दिन'

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात, कठीण काळावर मात करायची असेल तर माणसाने या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या. या गोष्टींचा अवलंब केल्यास माणसाच्या सर्व समस्या दूर होतात, असं चाणक्य सांगतात.

Chanakya Niti : सुखी जीवनाची गाडी निरंतर चालत राहावी यासाठी अनेकजण आजही चाणक्य नीतिमधील (Chanakya Niti) तत्त्वांचा अवलंब करतात. आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी कठीण काळाचा (Bad Patch) सामना करावाच लागतो. अशा वेळी काही लोक फार गोंधळून जातात. संकट काळात नेमकं करावं काय हे त्यांना कळत नाही आणि त्यांच्या समोरील समस्या आणखी वाढत जातात. अशा स्थितीत वाईट काळाचा सामना करण्यासाठी चाणक्यांनी काही युक्त्या सांगितल्या आहेत.

तुमच्या कठीण काळात चाणक्यांनी सांगितलेल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास कोणी तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. तुम्ही यशाच्या मार्गावर चालत राहाल आणि संकटं तुमच्यापासून चार हात लांब राहतील. कठीण काळात नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? जाणून घेऊया.

आत्मविश्वास डगमगू देऊ नका

तुम्ही ठरवलं तर कोणालाही मुठीत घेऊ शकता. तुमच्यावर कितीही संकटं येऊ दे, पण तुमचा आत्मविश्वास हलला नाही पाहिजे. कठीण काळात तुम्ही मनाने खचू नये. चाणक्य सांगतात, जर तुम्ही जिंकण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. जर तुमच्या मनात जिंकण्याची जिद्द असेल, तर अंधाऱ्या खोलीतही खिडकीतून डोकावणारा प्रकाश तुम्हाला यशाचा मार्ग दाखवू शकतो. पण जर तुम्ही मनातूनच पराभव स्वीकारला तर चांगल्या काळासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल. कठीण काळात आत्मविश्वास हे सर्वात मोठं शस्त्र आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही असाध्य गोष्टीही साध्य करू शकता.

आपात्कालीन स्थितीसाठी पैशांची बचत करा

चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, कठीण काळात पैसाच माणसाच्या कामी येतो. हातात पैसा असेल तर कठिणातल्या कठीण समस्याही दूर लोटता येतात. आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नेहमी पैशाची बचत केली पाहिजे. तुम्ही कठीण काळातून जात असाल तर तुम्ही अनावश्यक खर्च थांबवला पाहिजे आणि पैशाची बचत केली पाहिजे.

संयम आणि धैर्य महत्त्वाचं

घाबरला तो संपला, ही म्हण कायम लक्षात ठेवा. चाणक्य म्हणतात, घाबरलेला माणूस कधीही यशस्वी होऊ शकत नाही. आयुष्यात जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा त्याला घाबरू नये, धैर्य धरावे. भीती माणसाला कमकुवत बनवते आणि हळूहळू ती आपल्यावर वर्चस्व गाजवते. 

ज्याप्रमाणे दिवसापाठोपाठ रात्र येते, त्याचप्रमाणे माणसाच्या आयुष्यातही वाईट काळ येतो. ठराविक कालावधीनंतर पुन्हा सुखाच्या क्षणांना सुरुवात होते. या काळात जो संयम आणि धीर धरतो, तो माणूस कधीही पराभूत होणार नाही.

Chanakya Niti : लग्नाआधीच जोडीदाराला विचारा 'हे' 3 प्रश्न; नाहीतर लग्नानंतर होईल संताप, चाणक्य सांगतात...

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: भगवान विठ्ठल पंढरपुरात येण्यामागे 'हे' मोठं कारण? एका भक्ताची विनंती भगवंतांनी कशी मान्य केली? पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
भगवान विठ्ठल पंढरपुरात येण्यामागे 'हे' मोठं कारण? एका भक्ताची विनंती भगवंतांनी कशी मान्य केली? पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
Kalki Puran: सावधान, कलियुगाचा अंत व्हायला 'इतका' वेळ शिल्लक? भगवान कल्कि कधी घेणार अवतार? कल्कि पुराणातील रहस्य जाणून व्हाल थक्क
सावधान, कलियुगाचा अंत व्हायला 'इतका' वेळ शिल्लक? भगवान कल्कि कधी घेणार अवतार? कल्कि पुराणातील रहस्य जाणून व्हाल थक्क
Shadashtak Yog 2026 : शुक्र-शनिच्या युतीने जुळून येणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, हातात खेळणार पैसाच पैसा
शुक्र-शनिच्या युतीने जुळून येणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, हातात खेळणार पैसाच पैसा
Vastu Tips : पावसाळ्यात 'ही' 7 शुभ झाडं घरी लावा; घरात पैशांची होईल बरसात, लक्ष्मीची कृपाही राहील - वास्तूशास्त्र
पावसाळ्यात 'ही' 7 शुभ झाडं घरी लावा; घरात पैशांची होईल बरसात, लक्ष्मीची कृपाही राहील - वास्तूशास्त्र

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
Embed widget