एक्स्प्लोर

Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा, अतिवृष्टी झालेल्या सर्वच मंडळात पंचनामे सुरु

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तत्काळ मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली होती. त्यानंतर तत्काळ बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या सर्वच मंडळात पंचनामे सुरु झाले आहेत.

Swabhimani Shetkari Sanghatana : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळं नदी नाल्यांना पूर आल्यान, जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच काही ठिकाणी शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तत्काळ मदत करावी. शेतकऱ्यांचा जर राग अनावर झाला तर लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरणेही मुश्किल होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (Swabhimani Shetkari Sanghatana) दिला होता. त्यानंतर तत्काळ बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या सर्वच मंडळात अधिकाऱ्यांनी पंचनामे सुरु केले आहेत.

अतिवृष्टीमुळं विदर्भातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तत्काळ मदत करावी. शेतकऱ्यांचा जर राग अनावर झाला तर लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरणेही मुश्किल होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. त्यानंतर याची प्रशासनानं तत्काळ दखल घेत बुलढाणा जिल्ह्यातील नुतसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरु केले आहेत. सर्वच मंडळात प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी पंचनामा करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, आता पंचनामे सुरु झाले असले तरी जिल्ह्यातील शेतकरी मदत केव्हा मिळणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

 काय म्हणाले होते रविकांत तुपकर

अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे तातडीनं पंचनामे करावे, तसेच त्यांना तत्काळ मदत करावी अशी मागणी रविकांत तुककर यांनी केली होती. हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी असी मागणी ही त्यांनी केली होती. राज्यातील बऱ्याच भागात शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यांची संपूर्ण पिकं पाण्याखाली गेली आहे. त्यामुळं तत्काळ मदत करण्याची मागमी शेतकरी करत आहे. आज जी परिस्थिती महाराष्ट्रातील विदर्भातील शेतकऱ्यांवर आली आहे, एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांवर कधीच आली नव्हती असे तुपकर म्हणाले होते.या काळात सरकार मदत करणार नाही तर मग कोण मदत करणार? असा सवाल देखील तुपकर यांनी उपस्थित केला होता. जसे श्रीलंकेतील राष्ट्रपतीच्या घराचा ताबा लोकांनी घेतला, तसेच शेतकऱ्यांना जर राग आला तर लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर फिरणे अवघड होईल. आमचा संयम सुटत चालला असल्याचे तुपकर म्हणाले होते. त्यामुळं तत्काळ पंचनामे करुन हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget