एक्स्प्लोर

Monsoon News : सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या राज्यांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा, अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या

देशातील काही राज्यात अद्यापही पावसानं दडी मारली आहे. प्रमुख अन्न उत्पादक असणाऱ्या उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात अद्यापही पाऊस हा सामान्य पातळीपेक्षा कमीच आहे

Monsoon News : संपूर्ण भारतात मान्सूनचं आगमन झालं आहे. देशातील विविध राज्यात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचं चित्र दित आहे. मात्र, काही राज्यात अद्यापही पावसानं दडी मारली आहे. प्रमुख अन्न उत्पादक असणाऱ्या उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात अद्यापही पाऊस हा सामान्य पातळीपेक्षा कमीच आहे. पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची गरज आहे. सरकारी आकडेवारीनुसार, या राज्यात सध्या 27.872 दशलक्ष  हेक्टरवर भात आणि इतर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. 

या राज्यात पावसाचं प्रमाण कमी

दरम्यान, गहू आणि ऊसाचे प्रमुख उत्पादक असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये पाऊस सामान्य पातळीपेक्षा कमी झाला आहे. धानाचे सर्वाधिक उत्पादक असलेल्या पश्चिम बंगालमध्येही पाऊस कमीच आहे. याचबरोबर झारखंड ओडिशा आणि बिहारमध्ये पावसाचं प्रमाण कमीच आहे.  गुजरात आणि केरळमधील काही भागातही सामान्यपेक्षा कमीच पाऊस झाल्याचं चित्र आहे. तसेच वायव्य भारतासह मध्य भारतात पावसाची कमतरता आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये सामान्य पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येत्या आठवड्यात पूर्वेकडील भागात काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जून ते सप्टेंबर नैऋत्य मान्सून दरम्यान भारतात वार्षिक पावसाच्या तीन चतुर्थांश पाऊस पडतो. त्याची प्रगती हा देशाच्या कृषी उत्पादन आणि ग्रामीण उत्पन्नाचा मुख्य निर्धारक आहे. तर काही भागात अल्पावधीत मुसळधार पाऊस पडल्यानं पुराचा धोका येण्याची शक्यताही असते. त्याचा फटका शेती उत्पादनाला बसू शकतो.

महाराष्ट्रात चांगला पाऊस
 
सध्या महाराष्ट्रात विविध भागात चांगला पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरु असल्याचं दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 8 जुलै ते 12 जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभगानं वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांनी सावधानता बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget