एक्स्प्लोर

Konkan Rains : परतीच्या पावसामुळे भात कापणीला अडथळा; भात पडून, कोंबही आले

Konkan Rains : दसऱ्यानंतर कोकणात भात कापणीला सुरुवात होते. मात्र परतीच्या पावसामुळे भात कापणीत अडथळा निर्माण होत आहे.

Konkan Rains : कोकणात (Konkan) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात जवळपास 2 लाख 25 हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली आहे. दसऱ्यानंतर कोकणात भात (Rice) कापणीला सुरुवात होते. मात्र परतीच्या पावसामुळे भात कापणीत अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी भात पडून आहे. त्यावर पाऊस पडत असल्याने भाताला कोंब आले आहेत. त्यामुळे बळीराजाचे नुकसान होत आहे. भाताला शेतकऱ्याचं पिवळं सोन म्हटलं जातं. मात्र गेल्या चार महिन्यापासून मोठ्या कष्टाने पिकवलेलं भात पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा, शेतकरी हवालदिल 
परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. भात कापणीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडत असल्याने उभं भात आडवं झालं आहे. त्यामुळे पडलेल्या भाताला कोंब आल्याने ते भात निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्या भाताचा काही उपयोग होणार नसल्याने वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पंचनामा करुन मदत करावी, अन्यथा आंदोलन करु, शेतकऱ्यांचा इशारा  
कोकणात अल्पभूधारक शेतकरी असल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेत नाहीत. त्यामुळे त्यांना सरकारकडून पंचनामा करुन मदत करावी. अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी जमून आंदोलन करु असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

वीज कोसळून तरुणाचा मृत्यू
एकीकडे परतीच्या पावसाचा फटका पिकांना बसत असतानाच जीवितहानी झाल्याची घटनाही सिंधुदुर्गात घडली आहे. कोकणात परतीचा पाऊस सुरु असून विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावात अंगावर वीज कोसळून हनुमंत झोरे या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल (11 ऑक्टोबर) पहाटे घडली. हनुमंत लघुशंकेसाठी बाहेर गेला होता. त्यावेळी त्याच्यावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला.

राज्यभरात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, शेतीचं मोठं नुकसान
सध्या राज्यात परतीच्या पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. परभणी जिल्ह्यात पावसामुळे काढणीला आलेलं सोयाबीन (Soybean) पूर्णपणे पाण्यात गेलं आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे तात्काळ पीक विमा आणि मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातही सोयाबीन आणि कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर सांगली जिल्ह्यात पावसामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच भुईमूग, भाजीपाला या पिकांना देखील फटका बसला आहे. या पावसाचा परिणाम द्राक्षांच्या बागांवर पाहायला मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget