एक्स्प्लोर

Konkan Rains : परतीच्या पावसामुळे भात कापणीला अडथळा; भात पडून, कोंबही आले

Konkan Rains : दसऱ्यानंतर कोकणात भात कापणीला सुरुवात होते. मात्र परतीच्या पावसामुळे भात कापणीत अडथळा निर्माण होत आहे.

Konkan Rains : कोकणात (Konkan) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात जवळपास 2 लाख 25 हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली आहे. दसऱ्यानंतर कोकणात भात (Rice) कापणीला सुरुवात होते. मात्र परतीच्या पावसामुळे भात कापणीत अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी भात पडून आहे. त्यावर पाऊस पडत असल्याने भाताला कोंब आले आहेत. त्यामुळे बळीराजाचे नुकसान होत आहे. भाताला शेतकऱ्याचं पिवळं सोन म्हटलं जातं. मात्र गेल्या चार महिन्यापासून मोठ्या कष्टाने पिकवलेलं भात पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा, शेतकरी हवालदिल 
परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. भात कापणीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडत असल्याने उभं भात आडवं झालं आहे. त्यामुळे पडलेल्या भाताला कोंब आल्याने ते भात निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्या भाताचा काही उपयोग होणार नसल्याने वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पंचनामा करुन मदत करावी, अन्यथा आंदोलन करु, शेतकऱ्यांचा इशारा  
कोकणात अल्पभूधारक शेतकरी असल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेत नाहीत. त्यामुळे त्यांना सरकारकडून पंचनामा करुन मदत करावी. अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी जमून आंदोलन करु असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

वीज कोसळून तरुणाचा मृत्यू
एकीकडे परतीच्या पावसाचा फटका पिकांना बसत असतानाच जीवितहानी झाल्याची घटनाही सिंधुदुर्गात घडली आहे. कोकणात परतीचा पाऊस सुरु असून विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावात अंगावर वीज कोसळून हनुमंत झोरे या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल (11 ऑक्टोबर) पहाटे घडली. हनुमंत लघुशंकेसाठी बाहेर गेला होता. त्यावेळी त्याच्यावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला.

राज्यभरात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, शेतीचं मोठं नुकसान
सध्या राज्यात परतीच्या पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. परभणी जिल्ह्यात पावसामुळे काढणीला आलेलं सोयाबीन (Soybean) पूर्णपणे पाण्यात गेलं आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे तात्काळ पीक विमा आणि मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातही सोयाबीन आणि कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर सांगली जिल्ह्यात पावसामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच भुईमूग, भाजीपाला या पिकांना देखील फटका बसला आहे. या पावसाचा परिणाम द्राक्षांच्या बागांवर पाहायला मिळत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget