एक्स्प्लोर

Konkan Rains : परतीच्या पावसामुळे भात कापणीला अडथळा; भात पडून, कोंबही आले

Konkan Rains : दसऱ्यानंतर कोकणात भात कापणीला सुरुवात होते. मात्र परतीच्या पावसामुळे भात कापणीत अडथळा निर्माण होत आहे.

Konkan Rains : कोकणात (Konkan) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात जवळपास 2 लाख 25 हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली आहे. दसऱ्यानंतर कोकणात भात (Rice) कापणीला सुरुवात होते. मात्र परतीच्या पावसामुळे भात कापणीत अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी भात पडून आहे. त्यावर पाऊस पडत असल्याने भाताला कोंब आले आहेत. त्यामुळे बळीराजाचे नुकसान होत आहे. भाताला शेतकऱ्याचं पिवळं सोन म्हटलं जातं. मात्र गेल्या चार महिन्यापासून मोठ्या कष्टाने पिकवलेलं भात पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा, शेतकरी हवालदिल 
परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. भात कापणीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडत असल्याने उभं भात आडवं झालं आहे. त्यामुळे पडलेल्या भाताला कोंब आल्याने ते भात निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्या भाताचा काही उपयोग होणार नसल्याने वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पंचनामा करुन मदत करावी, अन्यथा आंदोलन करु, शेतकऱ्यांचा इशारा  
कोकणात अल्पभूधारक शेतकरी असल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेत नाहीत. त्यामुळे त्यांना सरकारकडून पंचनामा करुन मदत करावी. अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी जमून आंदोलन करु असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

वीज कोसळून तरुणाचा मृत्यू
एकीकडे परतीच्या पावसाचा फटका पिकांना बसत असतानाच जीवितहानी झाल्याची घटनाही सिंधुदुर्गात घडली आहे. कोकणात परतीचा पाऊस सुरु असून विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावात अंगावर वीज कोसळून हनुमंत झोरे या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल (11 ऑक्टोबर) पहाटे घडली. हनुमंत लघुशंकेसाठी बाहेर गेला होता. त्यावेळी त्याच्यावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला.

राज्यभरात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, शेतीचं मोठं नुकसान
सध्या राज्यात परतीच्या पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. परभणी जिल्ह्यात पावसामुळे काढणीला आलेलं सोयाबीन (Soybean) पूर्णपणे पाण्यात गेलं आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे तात्काळ पीक विमा आणि मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातही सोयाबीन आणि कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर सांगली जिल्ह्यात पावसामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच भुईमूग, भाजीपाला या पिकांना देखील फटका बसला आहे. या पावसाचा परिणाम द्राक्षांच्या बागांवर पाहायला मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 
लवकरच शेतकऱ्यांना कर्ज नील झाल्याचे सर्टीफीकेट मिळणार, दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफ होणार, मंत्री दत्रात्रय भरणेंची माहिती
लवकरच शेतकऱ्यांना कर्ज नील झाल्याचे सर्टीफीकेट मिळणार, दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफ होणार, मंत्री दत्रात्रय भरणेंची माहिती

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget