Vande Bharat Express : Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा
Maharashtra Samruddhi Mahamarg: (Balasaheb Thackeray) समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 10 जिल्ह्यातील 26 तालुके आणि 391 गावातून जाणाऱ्या या महामार्गामुळे राज्यातील विकासात आणखी एक भर पडणार असून, प्रवास सुखकर होणार आहे. दरम्यान याचा फायदा औरंगाबाद ते शिर्डी (Aurangabad To Shirdi) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील होणार आहे. कारण समृद्धी महामार्गामुळे आता औरंगाबाद ते शिर्डी अवघ्या एका तासात पूर्ण होणार आहे. त्यामुळे औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील (Jalna District) साई भक्तांचा प्रवास आता कमी वेळेत आणि सुखकर होणार आहे.























