एक्स्प्लोर
Powai Hostage Crisis:रोहित आर्यचे सरकारशी काय संबंध होते?
पवईमधील (Powai) स्टुडिओत १७ मुलांना ओलीस धरणारा चित्रपट निर्माता रोहित आर्या (Rohit Arya) याचा पोलिसांच्या कारवाईत मृत्यू झाला आहे. 'स्वच्छता मॉनिटर' (Swachhata Monitor) या सरकारी योजनेचे पैसे थकवल्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. 'वारंवार पत्र लिहूनही सरकारनं दखल घेतली नाही', असा आरोप करत आर्याने निराशा व्यक्त केली होती. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आता पुढील तपासासाठी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. 'स्वच्छता मॉनिटर' प्रकल्पाच्या जानेवारी २०२४ च्या जीआरमध्ये रोहितचं नाव होतं आणि यासाठी सुमारे २०.६३ कोटींचं बजेट होतं. पैसे थकल्याने त्याने शिक्षण विभागाला पत्र लिहिलं, उपोषण केलं आणि तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची भेटही घेतली होती. मात्र, आश्वासन देऊनही पैसे न मिळाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, ज्यानंतर आता या योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement



















