एक्स्प्लोर
Heavy Rain | परभणीत मुसळधार पाऊस, शेती पाण्याखाली, गावांमध्ये पाणी शिरले
परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. पहाटे झालेल्या पावसामुळे ओढे, नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे शेती पुन्हा एकदा पाण्याखाली गेली असून, हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. नासोल शिवारामध्ये जवळपास पंचवीस ते तीस हेक्टर शेतीचा पट्टा पाण्याखाली गेला आहे. एका शेतकऱ्याने सांगितले की, "इतकं पाणी कधीच नाही पडलं." काल दोन तासांमध्ये ढगफुटी झाल्याप्रमाणे पाऊस झाल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले. शेतातच नव्हे तर गावांमध्येही अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. रात्रीचा पाऊस भयंकर होता, असेही एका शेतकऱ्याने सांगितले. दीड ते पावणेदोन तासांत जास्त पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















