Maratha Reservation | मराठा आरक्षणावर राज्य सरकार गंभीर नाही : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या बाबतीत या सरकारमधील कोणाचाच अभ्यास नाही. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री यांना या प्रकरणाचे गांभीर्य नाही. या नेत्यांना मराठा समाजातील गरीब वर्ग पुढे येऊ द्यायचा नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तसंच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकार गंभीर नसल्याचं पुनरुच्चारही त्यांनी केला. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार निशाणा साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकार गंभीर नाही. फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणारे नव्हते अशी टीका करणं हे चुकीचं आहे. आपलं यश झाकण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे.