एक्स्प्लोर

Zero Hour : कुठे नेऊन ठेवलीये राजकीय संस्कृती! पडळकर, आव्हाडांच्या समर्थकांमध्ये राडा

दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों

झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. बशीर बद्र साहेबांचा हा शेर आजच्या विषयाचं सार, संदेश आणि सूत्रही आहे. उत्तर भारत किंवा दक्षिण भारताच्या राजकारणात जीवघेणी दुष्मनी निभावली जाते, एकमेकांचं नाव टाकलं जातं. जयललिता यांनी करुणानिधींना रात्री २ वाजता फरफटत नेण्याची दृष्य असोत, इंदिरा गांधींनी साक्षात जयप्रकाश नारायण यांचा "एक जना..." म्हणजे एक जण किंवा त्यांच्या नावाची अद्याक्षरे घेऊन केलेली टिपण्णी असो, २०१४पासून दर निवडणुकीत काँग्रेसच्या लोकांनी मोदींवर केलेली किंवा भाजपच्या समर्थकांनी राहुल गांधींवर केलेली विधाने, असे अनेक दाखले भारताच्या राजकारणातले दाखवता येतील. मात्र, महाराष्ट्र या राजकीय होळीतही सदैव तळपत्या सूर्यासारखा वेगळा भासला. इथं, सत्ताधारी विरोधक एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होतात, वाद विसरुन एकत्र येतात. कालच झालेल्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निरोप समारंभात झालेल्या भाषणातही याच राजकीय संस्कृतीचा प्रत्यय आला.

मात्र, महाराष्ट्राचं हे चित्र वेगानं बदलतंय. राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या समर्थकांच्या सोशल मीडियावरील घाणेरड्या भाषेनंतर आता नेते मंडळीही भान आणि जबाबदारी विसरु लागलीयेत असं दिसतंय. याची साक्ष देणारा घटनाक्रम काल-परवापासून ते आज आणि अगदी आत्ताच्या घडीला विधीमंडळ परिसरात चालू आहे. याला निमित्त ठरलाय तो भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे  जितेंद्र आव्हाडा यांच्यातला राडा. याची सुरुवात कुठे झाली, हा प्रश्न महत्त्वाचा नाही. मात्र, दोन्हीकडून वाद वाढतच जाईल अशा कृती आणि वक्तव्ये केली गेली हे समोर आहे. विधीमंडळात बाहेर जसं कॅज्युअली वागतात तसं वागू नये, हे साधं तत्व असताना आव्हाडांनी पडळकर माध्यमांशी बोलत असताना मंगगळसूत्र चोराचा अशा घोषणा देणं असेल, गाडी लावण्यावरुन पडळकरांनी आव्हाडांना उद्देशून वापरलेल भाषा असेल ते आज विधीमंडळाच्या लॉबीत पडळकर-आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी असेल. हा एकूणच प्रकार काट्याचा नायटा होण्याच्या दिशेने चाललाय अशी स्थिती आहे. दुर्दैवानं सत्ताधारी किंवा विरोधकांकडे देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा उद्धव ठाकरे, वडेट्टीवार, जयंत पाटील, शरद पवार असे नेते असूनही त्यांना हे वातावरण शांत करता येत नाहीये. अशानं आधीच सोशल मीडियावरचा दोन्ही बाजूकडचा चिखल आता गटार बनून सगळीकडे वाहणार का? सवाल आहे. यावरच आहे आजचा झिरो अवरचा प्रश्न...

 

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे
Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget