Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
चार चार नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.... जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा हायवेवरची वाहतूक कासवगतीनं सुरू आहे... कुठे दरड कोसळल्यामुळे, तर कुठे रस्त्याला नदीचं स्वरूप आल्यामुळे अनेकांची वाट अडलीय.. आम्ही गोष्ट करतोय रायगड जिल्ह्याची... पावसानं रायगड जिल्ह्याला कसं झोडपून काढलंय... पाहुयात आमच्या प्रतिनिधींचा हा ग्राऊंड झिरो रिपोर्ट...
हवामान विभागानं रायगड जिल्ह्यासाठी दिलेला रेड अलर्ट पावसानं खरा ठरवला...
ड्रोननं टिपलेलं हे सावित्री नदीचं रौद्र रूप खरं तर कुणाच्याही मनात धडकी भरवेल...
गेल्या काही वर्षांपासून पहिल्या एक-दोन पावसात,
सावित्री नदीचं पाणी महाड आणि पोलादपूरमधल्या परिसरात शिरतं...
रायगड जिल्ह्यात चार नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय
नागोठणेचा बराचसा भाग दिवसभर पाण्याखालीच राहिलाय...
अष्टविनायकांपैकी एक, पालीच्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात देखील पाणी शिरलं होतं...
All Shows






























