एक्स्प्लोर

Yuvraj Singh XI for T20 World Cup :  युवराज सिंहच्या प्लेईंग 11 मध्ये संजूला स्थान नाही, कुणाकुणाचा समावेश?

Yuvraj Singh XI for T20 World: विश्वचषकात भारतीय संघाची प्लेईंग 11 कशी असेल? याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विश्वचषक विजेता युवराज सिंह याने भारताची प्लेईंग 11 निवडली आहे

Yuvraj Singh XI for T20 World:  आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी होणार आहे. तर 9 जून रोजी भारत पाकिस्तानसोबत भिडणार आहे. विश्वचषकात भारतीय संघाची प्लेईंग 11 कशी असेल? याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विश्वचषक विजेता युवराज सिंह याने भारताची प्लेईंग 11 निवडली आहे. युवराजने आपल्या प्लेईंग 11 मध्ये विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याला स्थान दिलेय. त्याचं कारणही त्याने सांगितलेय. युवराज सिंह याने आयसीसीसोबत बोलताना प्लेईंग 11 कशी असू शकते, याबाबत सांगितलेय. 

आघाडीचे फलंदाज कोण असतील? 

रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल डावाची सुरुवात करतील. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीला उतरले. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली शानदार फलंदाजी करत आलाय. चौथ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादव याचा पर्याय असेल, असे युवराज सिंह म्हणाला. 

विकेटकीपर कोण ?

पाचव्या क्रमांकासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतील. पण डावखुरा फलंदाज हवाय. कारण, मैदानावर एकाचवेळी डावखुरा आणि उजव्या हाताचे फलंदाज असतील, तेव्हा प्रतिस्पर्धी संघाला गोलंदाजी करणं कठीण होईल. पाचव्या क्रमांकावर ऋषभ पंत हा चांगला पर्याय असेल. संजू सॅमसनही चांगली पर्याय आहे, पण पंत डावखुरा असल्यामुळे त्याचं पारडं जड आहे, असे युवराज म्हणाला. युवराजने यष्टिरक्षकाच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी संजू सॅमसनपेक्षा ऋषभ पंत याला पंसती दिली. तो म्हणाला की, पंत आणि संजूने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. 

ऋषभ पंत यालाच का मिळणार संधी ? 

संजू सॅमसन यानं राजस्तानसाठी फक्त कर्णधार म्हणून काम केले नाही, तर फलंदाजीत त्याने महत्वाचं योगदान दिलेय. या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सध्या सातव्या स्थानावर आहे, त्याने 14 सामन्यांमध्ये 156.32 च्या प्रभावी स्ट्राइक रेटने 504 धावा केल्या आहे. राजस्थानने आठ विजय मिळवत प्लेऑफमध्येही प्रवेश केलाय.  दुसरीकडे ऋषभ पंत याने शानदार कमबॅक केलेय. तो आयपीएलमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. त्याने मध्यक्रममध्ये फटकेबाजी करत धावा जमवल्या आहेत. पंतने 13 सामन्यात 446 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 155 इतका राहिलाय. दोघांनीही खोऱ्याने धावा चोपल्या आहेत.  

संजू आणि पंत यांच्यातील एकाची निवड करणं कठीण आहे. पण डावखुरा फलंदाज हवा असल्यामुळे पंत याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळेल, असे युवराज म्हणाला. ऋषभ पंत भारताला कोणत्याही स्थितीमध्ये सामना जिंकून देऊ शकतो, त्याने भूतकाळात हे अनेकदा सिद्ध कलेय, असेही युवराज म्हणाला. 

फिनिशर कोण, अष्टपैलू कोण ?

सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या याचा पर्याय असेल. तो आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलाय, पण त्यानं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली. उपकर्णधार असल्यामुळे त्याचं संघातील स्थानही निश्चित असेल. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल, असे युवराज म्हणाला. आयपीएल संपताना पांड्याने गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली आहे. आगामी विश्वचषकात अष्टपैलू खेळाडू चांगली कामगिरी करेल, असा विश्वास युवराजने व्यक्त केला. 

दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या युवारजच्या मते,  शिवम दुबेला आयपीएलमधील प्रभावी कामगिरीनंतर संघात स्थान मिळायला हवं. दरम्यान, दुबेने चेन्नई सुपर किंग्जसाठी 14 सामन्यात 162.29 च्या सरासरीने 396 धावा केल्या. सुरुवातीला फक्त एक फलंदाज म्हणून दाखवत असला तरी, त्याने पंजाब किंग्जविरुद्ध उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी केली, ज्यामुळे भारताला T20 विश्वचषकात गोलंदाजीचा दुसरा पर्याय उपलब्ध झाला.

शिवम दुबे यानं आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. मध्यक्रम अथवा लोअर ऑर्डरमध्ये दुबे प्रभावी कामगिरी करेल, असं वाटतेय. 

चहलबद्दल काय म्हणाला युवी -

युजवेंद्र चहल याला पुन्हा एकदा संघात पाहून युवराजला आनंद झाला, त्याने ऑगस्ट 2023 नंतर टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. चहलने आयपीएलमध्ये शानदार गोलंदाजी केली. चहल यानं शानदार गोलंदाजी केली, त्यामुळे त्याला विश्वचषकाच्या ताफ्यात स्थान मिळाले. विश्वचषक उत्तरार्धाकडे झुकल्यानंतर खेळपट्ट्या संथ होतील, त्यावेळी फिरकी गोलंदाजाची भूमिका महत्वाची असेल. 

वेगवान गोलंदाज - 

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या अनुभवाला अर्शदीप सिंह याची जोड आहे. आपला संघ मजबूत दिसत आहे. पण टीम इंडियाला सिद्ध करावे लागले, असे युवराज म्हणाला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget