एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
तीन तास बेशुद्ध होते, पण भारताचं कोणीही फिरकलं नाही- धावपटू जैशा
![तीन तास बेशुद्ध होते, पण भारताचं कोणीही फिरकलं नाही- धावपटू जैशा Indian Athlete Running Three Hours Remained Unconscious तीन तास बेशुद्ध होते, पण भारताचं कोणीही फिरकलं नाही- धावपटू जैशा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/22213324/jaiswal-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्लीः रिओमध्ये मॅरेथॉन शर्यतीदरम्यान इतर देशांचे अधिकारी त्यांच्या खेळाडूंना दर 2 किलोमीटरवर पाणी, एनर्जी ड्रिंक देत होते. पण भारतीय धावपटूंना पाणी पाजण्यासाठी कुणीही नव्हतं, असं मॅरेथॉन रनर ओ.पी.जैशानं उघड केलं आहे.
रिओ ऑलिम्पिकमधून भारतात परतलेली मॅरेथॉन रनर ओ.पी. जैशाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. मॅरेथॉन पूर्ण केल्यावर जैशा बेशुद्ध होऊन खाली कोसळली होती. जैशाला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. पण भारतीय पदाधिकाऱ्यांना तीन तास याविषयी काहीच माहिती नव्हती, असा खुलासा जैशाने केला आहे.
प्रशिक्षक निकोलाय स्नेसारेव्हना ही गोष्ट कळल्यानंतर ते चांगलेच भडकले आणि मला भेटण्यासाठी आले. त्याचवेळी त्यांची डॉक्टरांशी बाचाबाची झाली असंही जैशानं म्हटलं आहे. जैशाला महिला मॅरेथॉन स्पर्धेत 89 व्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion