एक्स्प्लोर

IndVsSA वॉन्डरर्स कसोटी : भारताला व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान

विराट कोहलीची टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली होती, ती एका ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाचं स्वप्न उराशी बाळगून. गेल्या पंचवीस वर्षात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आली नव्हती.

जोहान्सबर्ग, द. आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला आजपासून जोहान्सबर्गच्या वॉण्डरर्स स्टेडियमवर सुरुवात होत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियानं लाजिरवाणी हार स्वीकारली आहे. त्यामुळे जोहान्सबर्गच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश टाळून 'नंबर वन'ची प्रतिष्ठा राखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. केपटाऊन कसोटी... दक्षिण आफ्रिकेची टीम इंडियावर 72 धावांनी मात. सेन्च्युरियन कसोटी... दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाचा 135 धावांनी धुव्वा. आणि जोहान्सबर्ग कसोटीत विराट कोहलीच्या नंबर वन टीम इंडियासमोर आव्हान आहे ते व्हाईटवॉश टाळण्याचं. खरं तर विराट कोहलीची टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली होती, ती एका ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाचं स्वप्न उराशी बाळगून. गेल्या पंचवीस वर्षात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. सलग नऊ कसोटी मालिका जिंकणारा विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेतल्या पहिल्या कसोटी मालिका विजयाच्या दृष्टीने आजवरचा सर्वात सक्षम संघ मानला जात होता. भारतीय गोलंदाजांनी दोन्ही कसोटी सामन्यांत दक्षिण आफ्रिकेच्या वीस-वीस विकेट्स काढून आपली कामगिरी चोख बजावलीही. पण भारतीय फलंदाजांनी केपटाऊन आणि सेन्च्युरियनच्या मैदानात पुन्हा पुन: लोटांगण घातलं आणि टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेतल्या कसोटी मालिकाविजयाचं स्वप्न धुळीला मिळालं. आता तर विराटसेनेसमोर आव्हान आहे ते व्हाईटवॉश टाळून 'नंबर वन'ची प्रतिष्ठा राखण्याचं. याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीची टीम इंडिया आणि फॅफ ड्यू प्लेसीचा दक्षिण आफ्रिकी फौज जोहान्सबर्गच्या रणांगणात आमनेसामने येत आहेत. IndVsSA वॉन्डरर्स कसोटी : भारताला व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांत जोहान्सबर्गच्या वॉण्डरर्स स्टेडियमवर आजवर चार कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी तीन कसोटी सामने अनिर्णीत राहिले असून, एका कसोटी सामन्यात टीम इंडियानं बाजी मारली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या आगामी कसोटीसाठी वॉण्डरर्सच्या खेळपट्टीवर गवत राखण्याची यजमान दक्षिण आफ्रिकेची रणनीती आहे. भारतीय फलंदाजांची वेगवान गोलंदाजी खेळताना उडणारी दाणादाण पाहता दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसीची जोहान्सबर्ग कसोटीसाठीची रणनीती स्वाभाविक आहे.

भारताचा पुन्हा लाजिरवाणा पराभव, मालिकाही गमावली

भारताच्या एकाही फलंदाजांना पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी बजावता आलेली नाही. आधी मुरली विजय आणि शिखर धवन, मग मुरली विजय आणि लोकेश राहुलला भारतीय डावाचा भक्कम पाया रचता आला नाही. चेतेश्वर पुजारानं 2013 सालच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सर्वाधिक धावांचा रतीब घातला होता. एक भरवशाचा फलंदाज म्हणून त्याचा लौकिकही मोठा आहे. पण या दौऱ्यात पुजारानं आपल्या लौकिकावर बोळा फिरवला आहे. कर्णधार विराट कोहलीनं सेन्च्युरियनवर एक शतक ठोकलं, पण त्याचाही एकंदर परफॉर्मन्स लौकिकाला साजेसा नाही. रोहित शर्मालाही वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टीतला आपला फॉर्म दक्षिण आफ्रिकेतल्या कसोटी सामन्यांमध्ये दाखवता आलेला नाही. हार्दिक पंड्यानं केपटाऊनवर एकदा दांडपट्टा चालवला, पण त्याची कपिलदेवशी होणारी तुलना म्हणजे काजव्याची सूर्याशी होणारी तुलना असल्याचं लवकरच स्पष्ट झालं. भारतीय फलंदाजीची दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झालेली वाताहत पाहता, टीम इंडियाला आता आपले पत्ते पुन्हा पिसून घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. या परिस्थितीत भारतीय संघात काय बदल होऊ शकतात? अजिंक्य रहाणेला त्याची उपयुक्तता पुन्हा सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. चेतेश्वर पुजाराऐवजी स्ट्राईक बदलता ठेवू शकणारा फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर येणं अपेक्षित आहे. केपटाऊन कसोटीतला भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला पुन्हा संघात स्थान मिळण्याची गरज आहे. वॉण्डरर्सच्या खेळपट्टीचा बाऊन्स लक्षात घेऊन स्लीपच्या क्षेत्ररचनेतही बदल अपेक्षित आहे. अर्थात भारतीय संघात आवश्यक ते सारे बदल घडून आले, म्हणजे जोहान्सबर्गच्या कसोटीत विराटसेनेच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा होण्याची हमी देता येणार नाही. पण दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर नंबर वनची प्रतिष्ठा राखण्याची टीम इंडियाला मिळणारी ही अखेरची संधी आहे. ती संधी तरी विराटसेनेनं दवडू नये, एवढीच  तिच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या :

राहुलला दुखापत, तिसऱ्या कसोटीत रहाणेला संधी?

तिसऱ्या कसोटीत रहाणेला संधी देऊन विराट चूक सुधारणार?

दक्षिण आफ्रिका टीम इंडियाला व्हाईटवॉश देईल : कागिसो रबादा

दुसऱ्या डावात टीम इंडियाची घसरगुंडी, विजयासाठी २८७ धावांचं आव्हान

विराटचं शतक, पण टीम इंडिया बॅकफूटवरच

अनुष्कानं दिलेल्या अंगठीचं चुंबन घेत विराटचं सेलिब्रेशन

विराटमुळे भारताच्या पहिल्या डावाला आकार

टीम इंडियासाठी 'करो या मरो', केपटाऊनचा वचपा काढणार?

दुसऱ्या कसोटीआधी द. आफ्रिकेला मोठा धक्का

केपटाऊन कसोटीत भारतीय गोलंदाजांनी इतिहास रचला

दक्षिण आफ्रिकेने भारताचा विजयरथ रोखला, 72 धावांनी मात

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?
Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget