एक्स्प्लोर

सुर्यकुमार यादवचं काय चुकलं? निवडसमितीला हरभजनचा संतप्त सवाल

मुंबईच्या सुर्यकुमार यादवची टीम इंडियामध्ये निवड न झाल्याने टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह याने बीसीसीआयच्या निवडसमितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : नव्या वर्षात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-20 आणि वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. परंतु टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह याने बीसीसीआयच्या निवडसमितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईच्या सुर्यकुमार यादवची टीम इंडियामध्ये निवड न करणाऱ्या निवडसमितीच्या संघनिवडीवर हरभजनने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सुर्यकुमार यादवला न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी इंडिया-ए संघात स्थान देण्यात आले होते. परंतु राष्ट्रीय संघात सुर्यकुमारचे नाव नसल्याने हरभजन नाराज झाला आहे. हरभजनने त्याची नाराजी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.

हरभजनने ट्वीट केले आहे की, सुर्यकुमार यादवची टीम इंडियामध्ये निवड न झाल्यामुळे मला आश्चर्य वाटतंय. सुर्यकुमारने काय चूक केली आहे? टीम इंडिया, इंडिया-ए, इंडिया-बी संघात निवड झालेल्या इतर खेळाडूंप्रमाणे सुर्यकुमारही खेळतोय. मग त्याच्यासोबत भेदभाव का केला जातोय?

सुर्यकुमारने 73 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4 हजार 920 धावा केल्या आहेत. यामध्ये 13 शतकं आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे. या 29 वर्षीय खेळाडूची सरासरी 43.53 इतकी आहे. टी-20 मध्ये तो 149 सामने खेळला आहे. त्यात त्याने 31.37 च्या सरासरीने 3,012 धावा फटकावल्या आहेत. तर आयपीएलमध्ये त्याने 85 सामन्यांमध्ये सात अर्धशतकांच्या सहाय्याने 1548 धावा जमवल्या आहेत.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सलामीवीर शिखर धवनचं संघात पुनरागमन झालं आहे. तर उपकर्णधार रोहित शर्मा आणि यंदाच्या वर्षातला यशस्वी गोलंदाज मोहम्मद शमीला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. भारत आणि श्रीलंका संघातला पहिला सामना 5 जानेवारी रोजी गुवाहाटी येथे खेळवला जाईल.

दिल्लीत झालेल्या बीसीसीआयच्या निवड समितीच्या बैठकीत या दोन्ही संघांची घोषणा झाली. भारतीय क्रिकेटरसिकांसाठी आनंदाची बाब म्हणजे पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला जसप्रीत बुमरा पुन्हा संघात परतला आहे. बुमरानं सप्टेंबरपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धची किंग्सस्टन कसोटी खेळल्यानंतर दुखापतीमुळे बुमरानं दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि विंडीजविरुद्धच्या मायदेशातल्या मालिकांमधून माघार घेतली होती.

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनही अंगठ्याच्या दुखापतीतून सावरल्यानं त्याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेला मुकावं लागलं होतं.

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेन्टी मालिकेसाठीचा भारतीय संघ पुढीलप्रमाणे  विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, शिवम दुबे, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनीष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Vaibhav Sooryavanshi : अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं, बेबी बॉसचं झिम्बाब्वे विरुद्ध वादळी अर्धशतक 
अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं,झिम्बाब्वेमध्ये बेबी बॉसची वादळी फलंदाजी

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
Embed widget