एक्स्प्लोर

World Cup 1979 History : भारताची विजयाची पाटी कोरीच, पाकिस्तानची सेमीफायनलपर्यंत मजल, विडिंजने जेतेपद राखले

World Cup 1979 History : पहिला विश्वचषक उंचावणाऱ्या वेस्ट इंडिजचा संघ 1979 च्या विश्वचषकात विजयाचे दावेदार म्हणून उतरला होता.

World Cup 1979 History : पहिला विश्वचषक उंचावणाऱ्या वेस्ट इंडिजचा संघ 1979 च्या विश्वचषकात विजयाचे दावेदार म्हणून उतरला होता. पण त्यांच्यापुढे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या तगड्या संघाचे आव्हान होते. पण दुसऱ्या विश्वचषकात वेस्ट इंडिजसमोर सर्वच संघ कमकुवत आणि दुबळे दिसले. वेस्ट इंडिजने दुसऱ्यांदा चषकावर नाव कोरत जगभरात आपले वर्चस्व स्थापन केले.

1979 ची विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये 9 जून ते 23 जून यादरम्यान पार पडली होती. 1975 प्रमाणे या स्पर्धेतही आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले होते. कॅनडा संघाने 1979 च्या विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केले होते. ईस्ट आफ्रिका संघ पात्रता फेरीतूनच बाहेर पडला होता. आशियातून भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान हे तीन संघ सहभागी होते.  15 सामन्यानंतर दुसरा विजेता मिळाला होता. भारत आणि श्रीलंका एका ग्रुपमध्ये होते.
 
ग्रुप अ 

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, कॅनडा

ग्रुप ब 

वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, भारत आणि श्रीलंका

भारताची निराशाजनक कामगिरी - 

1979 च्या विश्वचषकातही भारतीय संघाने अतिशय खराब कामगिरी केली. भारताला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही, तिन्ही सामने गमावले. त्यामुळे साखळी फेरीतच भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. दुसरीकडे पाकिस्तान संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता.

गतविजेत्या वेस्ट इंडिजने पिहल्याच सामन्यात भारताचा 9 विकेट आणि 51 चेंडू राखून दारुण पराभव केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 190 धावांपर्यंत मजल मारली. वेस्ट इंडिजने हे आव्हान फक्त एका विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताकडून गुंडप्पा विश्वनाथ यांनी 75 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्यांचा अपवाद वगळता सर्व दिग्गज फ्लॉप गेले.  

न्यूझीलंडने भारताचा आठ विकेटने पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 55.5 षटकात 182 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल न्यूझीलंड संघाने हे आव्हान दोन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताकडून सुनील गावसकर यांनी 55 धावांची खेळी केली. त्याशिवाय ब्रिजेश पेटलने 38 धावांचे योगदान दिले. 

श्रीलंकेने भारताचा 47 धावांनी पराभव केला. भारतालाही एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. श्रीलंकेने प्रथम फंलदाजी करताना 238 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल भारतीय संघ 191 धावांपर्यंत मजल मारु शकला. गोलंदाजीत भारताकडून मोहिंदर अमरनाथ यांनी तीन विकेट घेतल्या. तर फलंदाजीत दिलीप वेंगसरकर यांनी सर्वाधि 36 धावांची खेळी केली.

सेमीफायनलमध्ये काय झाले ?

ग्रुप अ मधून इंग्लंड आणि पाकिस्तान तर ग्रुप ब मधून वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या सेमीफायनल सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडने 60 षटकात आठ विकेटच्या मोबद्लयात 221 धावा केल्या. न्यूझीलंडचा संघ 212 धावांपर्यंतच मजल मारु शकला. न्यूझीलंडच्या संघाला नऊ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. 

पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या पाकिस्तानसमोर तगडया विंडिजचे आव्हान होते. गतविजेत्या विडिंजने पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. विडिंजने प्रथम फंलदाजी करताना 60 षटकात 293 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानचा संघ 250 धावांपर्यंत मजल मारु शकला. 

फायनलमध्ये काय झाले ?

वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 92 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा चषकावर नाव कोरले. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 60 षटकात 286 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल इंग्लंडचा संघ 194 धावांपर्यंत मजल मारु शकला. अंतिम सामन्यात विव रिचर्ड्स यांनी शतकी खेळी केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 Mumbai League : ‘आमच्या टीममध्येही वैभव सूर्यवंशी!’; जेतेपद राखण्यासाठी ‘मराठा रॉयल्स’ सज्ज, कॅप्टन सिद्धेश लाड काय म्हणाला?
‘आमच्या टीममध्येही वैभव सूर्यवंशी!’; जेतेपद राखण्यासाठी ‘मराठा रॉयल्स’ सज्ज, कॅप्टन सिद्धेश लाड काय म्हणाला?
RCB vs GT IPL 2026 Final : एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
Hardik Pandya : मुंबई इंडियन्सला रामराम ठोकताच हार्दिक पांड्या IPLचा इतिहास-भूगोल बदलणार?; 30 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी 3 संघ शर्यतीत
मुंबई इंडियन्सला रामराम ठोकताच हार्दिक पांड्या IPLचा इतिहास-भूगोल बदलणार?; 30 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी 3 संघ शर्यतीत
GT vs RR Match Fixing Allegation : राजस्थान विरुद्ध गुजरात सामना 'फिक्स' होता? चाहत्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न, सगळेच हादरले, क्वालिफायर-2मध्ये नेमकं काय घडलं?
राजस्थान विरुद्ध गुजरात सामना 'फिक्स' होता? चाहत्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न, सगळेच हादरले, क्वालिफायर-2मध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Politics : कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
Delhi Police: दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Rahul Gandhi on CUET UG : दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
Mumbai Crime News : क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
Satara Sangli MLC : मोठी बातमी, सातारा सांगलीत भाजप - शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या लढतीची चर्चा, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सातारा सांगलीच्या जागेवर नवा ट्विस्ट, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीत जागा कोणाला?
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
Embed widget