एक्स्प्लोर

World Cup 1979 History : भारताची विजयाची पाटी कोरीच, पाकिस्तानची सेमीफायनलपर्यंत मजल, विडिंजने जेतेपद राखले

World Cup 1979 History : पहिला विश्वचषक उंचावणाऱ्या वेस्ट इंडिजचा संघ 1979 च्या विश्वचषकात विजयाचे दावेदार म्हणून उतरला होता.

World Cup 1979 History : पहिला विश्वचषक उंचावणाऱ्या वेस्ट इंडिजचा संघ 1979 च्या विश्वचषकात विजयाचे दावेदार म्हणून उतरला होता. पण त्यांच्यापुढे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या तगड्या संघाचे आव्हान होते. पण दुसऱ्या विश्वचषकात वेस्ट इंडिजसमोर सर्वच संघ कमकुवत आणि दुबळे दिसले. वेस्ट इंडिजने दुसऱ्यांदा चषकावर नाव कोरत जगभरात आपले वर्चस्व स्थापन केले.

1979 ची विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये 9 जून ते 23 जून यादरम्यान पार पडली होती. 1975 प्रमाणे या स्पर्धेतही आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले होते. कॅनडा संघाने 1979 च्या विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केले होते. ईस्ट आफ्रिका संघ पात्रता फेरीतूनच बाहेर पडला होता. आशियातून भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान हे तीन संघ सहभागी होते.  15 सामन्यानंतर दुसरा विजेता मिळाला होता. भारत आणि श्रीलंका एका ग्रुपमध्ये होते.
 
ग्रुप अ 

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, कॅनडा

ग्रुप ब 

वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, भारत आणि श्रीलंका

भारताची निराशाजनक कामगिरी - 

1979 च्या विश्वचषकातही भारतीय संघाने अतिशय खराब कामगिरी केली. भारताला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही, तिन्ही सामने गमावले. त्यामुळे साखळी फेरीतच भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. दुसरीकडे पाकिस्तान संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता.

गतविजेत्या वेस्ट इंडिजने पिहल्याच सामन्यात भारताचा 9 विकेट आणि 51 चेंडू राखून दारुण पराभव केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 190 धावांपर्यंत मजल मारली. वेस्ट इंडिजने हे आव्हान फक्त एका विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताकडून गुंडप्पा विश्वनाथ यांनी 75 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्यांचा अपवाद वगळता सर्व दिग्गज फ्लॉप गेले.  

न्यूझीलंडने भारताचा आठ विकेटने पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 55.5 षटकात 182 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल न्यूझीलंड संघाने हे आव्हान दोन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताकडून सुनील गावसकर यांनी 55 धावांची खेळी केली. त्याशिवाय ब्रिजेश पेटलने 38 धावांचे योगदान दिले. 

श्रीलंकेने भारताचा 47 धावांनी पराभव केला. भारतालाही एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. श्रीलंकेने प्रथम फंलदाजी करताना 238 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल भारतीय संघ 191 धावांपर्यंत मजल मारु शकला. गोलंदाजीत भारताकडून मोहिंदर अमरनाथ यांनी तीन विकेट घेतल्या. तर फलंदाजीत दिलीप वेंगसरकर यांनी सर्वाधि 36 धावांची खेळी केली.

सेमीफायनलमध्ये काय झाले ?

ग्रुप अ मधून इंग्लंड आणि पाकिस्तान तर ग्रुप ब मधून वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या सेमीफायनल सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडने 60 षटकात आठ विकेटच्या मोबद्लयात 221 धावा केल्या. न्यूझीलंडचा संघ 212 धावांपर्यंतच मजल मारु शकला. न्यूझीलंडच्या संघाला नऊ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. 

पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या पाकिस्तानसमोर तगडया विंडिजचे आव्हान होते. गतविजेत्या विडिंजने पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. विडिंजने प्रथम फंलदाजी करताना 60 षटकात 293 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानचा संघ 250 धावांपर्यंत मजल मारु शकला. 

फायनलमध्ये काय झाले ?

वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 92 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा चषकावर नाव कोरले. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 60 षटकात 286 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल इंग्लंडचा संघ 194 धावांपर्यंत मजल मारु शकला. अंतिम सामन्यात विव रिचर्ड्स यांनी शतकी खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Vaibhav Sooryavanshi : अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं, बेबी बॉसचं झिम्बाब्वे विरुद्ध वादळी अर्धशतक 
अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं,झिम्बाब्वेमध्ये बेबी बॉसची वादळी फलंदाजी

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget