एक्स्प्लोर

T20 World Cup 2024: धीम्या खेळपट्टीच्या नावावर किंग कोहलीचा खेळ खल्लास? टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात स्थान न मिळण्याची शक्यता

T20 World Cup 2024: टीम इंडियाचं 'रन मशिन' टी20 वर्ल्डकपला मुकणार? क्रिडाविश्वात चर्चांना जोरदार उधाण

Virat Kohli, T20 World Cup 2024: काही दिवसांतच आयपीएलच्या (IPL 2024) आगामी सीझनला सुरुवात होणार आहे. आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया (Team India) टी20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup) तयारीला सुरुवात करणार आहे. येत्या टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची धुरा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावर असणार आहे. मात्र, टी20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहली (Virat Kohli) याच्या सहभागाबाबत सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जूनमध्ये खेळवण्यात येणाऱ्या टी20 वर्ल्डकपमधून विराटचा पत्ता कट होऊ शकतो. विराट कोहली 2022 मध्ये खेळवण्यात आलेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये धुरळा उडवला होता. पण यंदाचा वर्ल्डकपचं आयोजन वेस्टइंडिज आणि यूएसएमध्ये होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचं म्हणणं आहे की, वेस्टइंडिजमधले स्लो पिच विराट कोहलीच्या खेळाच्या फॉर्मला साजेशी नसल्यामुळे बीसीसीआय हा मोठा निर्णय घेऊ शकते. 

याशिवाय, भारतीय क्रिकेट संघाचे चीफ सिलेक्टर्स, अजित आगरकर यांच्यावर बीसीसीआयकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याचं बोलंल जातं आहे. विराट कोहलीनं तरुणांना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करावा, ही जबाबदारी आगरकरांवर सोपवण्यात आल्याचं बोललं जात आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीफ सिलेक्टर्सनी कोहलीला टी20 बाबातचा आपला दृष्टिकोन बदलायला सांगितलं होतं. त्यानंतर कोहलीनं अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 सीरिजमध्ये आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, कोहली फारशी चांगली खेळी करू शकला नाही. तसेच, इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील राजकोट कसोटीदरम्यान बीसीसीआयचं सचिव जय शाह कोहलीबद्दल काहीहीच बोलले नव्हते. तसेच, टीम इंडिया 2024 चा टी-20 विश्वचषक रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळेल, ही घोषणा जय शाह यांनी केली होती. 

दरम्यान, आता किंग कोहलीकडे टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे, आगामी आयपीएल 2024. जर किंग कोहली आयपीएलच्या आगामी सीझनमध्ये फॉर्मात राहिला तर मात्र त्याला टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात स्थान मिळू शकतं. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, तिलक वर्मा आणि शिवम दुबे हे खेळाडू टीम इंडियाला पुढे नेण्यासाठी कोहलीपेक्षा अधिक योग्य असल्याचं बीसीसीआयचं म्हणणं आहे. आता कोहलीला टी-20 वर्ल्डकपमध्ये स्थान मिळणार की नाही, हे येता काळच सांगेल. पण, सध्या क्रीडाविश्वात मोठी खळबळ माजली आहे. अशातच, किंग कोहली वर्ल्डकप खेळू शकणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

एका वर्षात 2 IPL? टी20 ऐवजी T10 फॉरमॅट; BCCI क्रिकेटप्रेमींना मोठी गूड न्यूज देण्याच्या तयारीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget