एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

T20 World Cup 2021: आता टी 20 वर्ल्डकपसाठी 'महासंग्राम' सुरू होणार; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

T20 World Cup 2021: आयसीसी टी -20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये सुरू होत आहे. 14 नोव्हेंबर रोजी दुबईत खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात या स्पर्धेचा विजेता ठरवला जाईल.

T20 World Cup 2021: आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धा संपली असली तरी यूएई (UAE) आणि ओमानमधील (Oman) क्रिकेटचा उत्साह अबाधित राहील. फरक एवढाच आहे की लीग क्रिकेटच्या युगातून आता हे जगातील टी 20 वर्चस्वाच्या युद्धात बदलेल. जगभरातील सर्व क्रिकेटपटू, जे आतापर्यंत आयपीएलमध्ये एकाच संघात सोबत खेळताना दिसले होते, ते एकमेकांच्या विरोधात दंड थोपटताना कोणतीही कसर सोडणार नाहीत. आयसीसी टी -20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये सुरू होत आहे. 17 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेच्या पात्रता फेरीचा (Qualifier Round) पहिला सामना ओमान क्रिकेट अकादमी मैदानावर खेळला जाईल. तर 14 नोव्हेंबर रोजी दुबईत (Dubai) खेळल्या जाणाऱ्या अंतिम (Final) सामन्यात स्पर्धेचा विजेता ठरवला जाईल.

भारत (Team India) 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) महान सामन्याने या स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि पाकिस्तान या दोघांना या विश्वचषकातील गट 2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) संध्याकाळी 7.30 पासून खेळला जाईल.

कोविड -19 मुळे स्पर्धा स्थलांतरित
शेवटचा टी -20 विश्वचषक 2016 मध्ये भारतात खेळला गेला. यंदाही ही स्पर्धा भारतातच होणार होती. पण, कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे ती यूएई आणि ओमानमध्ये हलवण्यात आली. बीसीसीआय (BCCI) या स्पर्धेचे यजमान आहे. गतविजेत्या वेस्ट इंडिजला (वेस्ट इंडीज) आपल्या जेतेपदाचे रक्षण करण्याचे आव्हान असेल. जर ते यात यशस्वी झाले, तर असे करणारा तो जगातील पहिला संघ असेल. दोन वेळा हे जेतेपद पटकावणारा वेस्ट इंडिज हा जगातील एकमेव संघ आहे. या वर्षी या स्पर्धेचे स्वरूप आणि नियम जाणून घेऊया.

Rahul Dravid: टीम इंडियाचा कोच होण्यास राहुल द्रविड तयार, 2023 पर्यंत होऊ शकतो करार

या मैदानावर सामने खेळले जातील
यंदाचे टी -20 विश्वचषक सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी येथील शेख जायद स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी मैदानावर खेळले जातील. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी याच मैदानावर स्पर्धेचा अंतिम सामनाही खेळला जाईल.


स्पर्धा तीन टप्प्यात खेळली जाईल
या वर्षी हा टी -20 विश्वचषक तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये खेळला जाईल. मुख्य स्पर्धा सुपर 12 (Super 12) स्वरूपात खेळली जाणार आहे. ज्यासाठी भारतासह आठ अव्वल संघ आयसीसी रँकिंगच्या (ICC Ranking) आधारे आधीच पात्र ठरले आहेत. सर्वप्रथम, टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सुपर 12 मध्ये स्थान मिळवण्यासाठी आठ संघ पात्रता सामने खेळताना दिसतील. हे आठ संघ गट अ  (Group A) आणि गट ब (Group B) मध्ये विभागले गेले आहेत.

17 ऑक्टोबर रोजी यजमान ओमान आणि पापुआ न्यू गिनी (PNG) यांच्यात ब गटातील पहिल्या पात्रता सामन्यासह स्पर्धेची सुरुवात होईल. त्याच गटाचा दुसरा सामना त्याच दिवशी स्कॉटलंड आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाईल. तर ग्रुप बीमध्ये, आयर्लंड-नेदरलँड्स आणि श्रीलंका-नामिबिया यांच्यातील सामने 18 ऑक्टोबर रोजी अबुधाबीमध्ये खेळले जातील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरतील.

Asia Cup 2023 : टीम इंडिया 17 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, आशिया कपचे यजमानपद PCB कडे


23 ऑक्टोबरपासून सुपर 12 सामने सुरू
टी -20 विश्वचषकासाठी भारताला पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानसह गट 2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. क्वालिफायर फेरीनंतर त्यात ग्रुप बी चा विजेता संघ आणि ग्रुप ए चा उपविजेता संघ असेल. तर गट 1 मध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांचा समावेश आहे. क्वालिफायर फेरीनंतर, गट अ चा विजेता संघ आणि गट ब चा उपविजेता संघ देखील समाविष्ट केला जाईल.

23 ऑक्टोबर रोजी, सुपर 12 चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गट 1 मध्ये खेळला जाईल. 24 ऑक्टोबर रोजी ग्रुप 2 चा पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. सुपर 12 चा शेवटचा सामना भारत आणि अ गटातील उपविजेता संघ यांच्यात पात्रता फेरीत खेळला जाईल.

उपांत्य फेरी 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी खेळली जाईल, अंतिम सामना 14 नोव्हेंबरला
यानंतर या स्पर्धेचा बाद फेरीचा टप्पा सुरू होईल. स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी 10 नोव्हेंबरला तर दुसरी उपांत्य फेरी 11 नोव्हेंबरला खेळली जाईल. तर टी -20 विश्वचषकाचा अंतिम सामना 14 नोव्हेंबरला होणार आहे. अंतिम फेरीसाठी 15 नोव्हेंबर हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.


ही पॉइंट सिस्टीम असेल
टी -20 विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात विजेत्या संघाला दोन गुण दिले जातील. दुसरीकडे, बरोबरी किंवा निकाल न लागल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. गट 1 आणि गट 2 मधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

तुम्ही भारतात टी -20 विश्वचषक सामने कुठे पाहू शकता?
आपण स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 2 वर टी 20 विश्वचषक सामने थेट पाहू शकता. याशिवाय, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स एचडी चॅनेलवरही सामना थेट प्रसारित केला जाईल. तुम्ही हा सामना डिस्ने हॉटस्टारच्या अॅप आणि वेबसाईटवर तुमच्या मोबाईलवर थेट पाहू शकता. क्रिकेट चाहत्यांनाही टी 20 वर्ल्डकपचा ​​आनंद थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे. हे सामने नवी दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबादसह 35 हून अधिक शहरांमधील 75 हून अधिक सिनेमागृहांमध्ये दाखवले जातील.

आयसीसी टी -20 विश्वचषकाचे टीम इंडिया स्क्वॉड 
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी

स्पर्धेतील भारताचे वेळापत्रक
24 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
31 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
3 नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान
5 नोव्हेंबर: भारत वि क्वालिफायर्स (पात्रता फेरीत ब गटातील विजेता)
नोव्हेंबर 8: क्वालिफायर्स वि भारत (पात्रता फेरीत अ गटातील उपविजेता संघ)

उपांत्य फेरी आणि अंतिम वेळापत्रक
10 नोव्हेंबर: पहिली उपांत्य फेरी
11 नोव्हेंबर: दुसरी उपांत्य फेरी
14 नोव्हेंबर: फायनल
15 नोव्हेंबर: अंतिम फेरीसाठी राखीव दिवस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्रABP Majha Headlines :  2 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
Embed widget