एक्स्प्लोर

Rohit Sharma : रोहित शर्मा अन् गंभीर एकमत,कॅप्टनपदासाठी सूर्याच्या नावाला पसंती, हार्दिक पांड्याचं काय होणार?

Rohit Sharma : टीम इंडियाचा टी 20 संघाचा कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं नाव आघाडीवर आहे.

नवी दिल्ली : भारत (Team India) तीन टी 20 सामने आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या (Sri Lanka Tour) दौऱ्यावर जाणार आहे. रोहित शर्मानं (Rohit Sharma) आंतराष्ट्रीय टी 20  क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. यामुळं बीसीसीआय, निवड समितीचा प्रमुख अजित आगरकर  आणि  मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमोर कॅप्टन निवडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) उपकॅप्टन पद भूषवलं असल्यानं त्याचं नवा चर्चेत होतं.  हार्दिक पांड्याचं नाव आघाडीवर असतानाच सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नावाची चर्चा सुरु झाली. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यात कुणाला कॅप्टनपद मिळणार याबाबत उत्सुकता आहे. रोहित शर्मानं टी 20 च्या कॅप्टनपदासाठी  सूर्यकुमार यादवच्या नावाला पसंती दिली असल्याची माहिती आहे. याशिवाय प्रशिक्षक गौतम गंभीर याची देखील  सूर्यकुमार यादवच्या नावाला पसंती असल्याच्या चर्चा आहेत. 

सूर्यकुमार यादवच्या नावाला रोहित शर्माची पसंती 

रोहित शर्माच्या नेतृत्त्वात सूर्यकुमार यादवनं टीम इंडिया तसेच मुंबई इंडियन्समध्ये क्रिकेट खेळलेलं आहे. भारतात पुढचा टी 20 वर्ल्ड कप आयोजित केला जाणार आहे. 2026 च्या टी वर्ल्ड कपचा विचार करुन कॅप्टन निवडला जाण्याची शक्यता आहे. रोहित शर्माची पसंती देखील सूर्यकुमार यादवच्या नावाला असल्याच्या चर्चा आहेत. याशिवाय गौतम गंभीरनं देखील सूर्यकुमार यादवच्या नावाला पसंती दिल्याच्या चर्चा आहेत. आता बीसीसीआय, निवड समिती आणि प्रशिक्षक यांच्या एकत्रित बैठकीत कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार ते पाहावं लागेल. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर देखील सूर्यकुमार यादवला कॅप्टन बनवण्याच्या बाजूनं आहेत. हार्दिक पांड्याचं नाव मागं का पडलं याबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. यामध्ये 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपचा विचार करुन निवड समिती नवा कॅप्टन निवडण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्याच्या दुखापतींचा विचार करता बीसीसीआय वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी देखील भारतीय संघाचं टी 20 क्रिकेटमध्ये यापूर्वी नेतृत्त्व केलं आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात भारतीय संघानं 16 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये भारताला 10 मॅचेसमध्ये विजय मिळाला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं 7 सामने खेळले आहेत. यामध्ये भारतानं 5 मॅचमध्ये विजय मिळवला तर दोन सामन्यांमध्ये पराभव झाला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सामने खेळले आहेत. आता बीसीसीआय कुणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

संबंधित बातम्या : 

ICC : अमेरिकेत टी 20 वर्ल्ड कपचे सामने आयोजित करणं भोवलं, आयसीसी मोठा फटका, कोट्यवधींच्या नुकसानावर चर्चा होणार

Team India: हार्दिक पांड्या की सूर्यकुमार यादव, टी 20 मध्ये भारताचा कॅप्टन कोण होणार? आकडेवारी नेमकी कुणाच्या बाजूनं?

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Actress Lives In 100 Year Old Bungalow: 100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफ अली खानची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!
100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Montha Cyclone Maharashtra Weather: मोंथा चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, उरणमधील बोट समुद्रात भरकटली, 50 खलाशांशी संपर्क तुटला
मोंथा चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, उरणची बोट समुद्रात भरकटली, 50 खलाशांशी संपर्क तुटला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mission BMC: ठाकरे गटाचा नवा डाव, 'नवीन चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य' देत जुन्यांना धक्का?
Maha Local Polls: 'जिथं जुळणार नाही, तिथं मैत्रीपूर्ण लढत', Eknath Shinde यांचे संकेत
Sillod Voter List Fraud : सिल्लोडमध्ये मतदार यादीत घोळ? बंद घरात तब्बल ५१० मतदार
Bachchu Kadu Morcha: 'मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करू', बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा
Ravikant Tupkar : 'आमदारच नव्हे, दोन-चार मंत्र्यांना कापा',तुपकरांचे चिथावणीखोर वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Actress Lives In 100 Year Old Bungalow: 100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफ अली खानची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!
100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Montha Cyclone Maharashtra Weather: मोंथा चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, उरणमधील बोट समुद्रात भरकटली, 50 खलाशांशी संपर्क तुटला
मोंथा चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, उरणची बोट समुद्रात भरकटली, 50 खलाशांशी संपर्क तुटला
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
BMC Election Uddhav Thackeray: BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही, नव्या चेहऱ्यांना संधी
BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही, नव्या चेहऱ्यांना संधी
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Embed widget