एक्स्प्लोर

BMC Election Uddhav Thackeray: BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही, नव्या चेहऱ्यांना संधी

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे काय करणार?

Mumbai BMC Election 2026: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार ठाकरे गटाकडून BMC निवडणुकीसाठी उमेदवारी देताना ज्येष्ठ नगरसेवकांऐवजी तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत (Mahanagarpalika Election) शिवसेना ठाकरे गटात नवीन चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. तर 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नाही. यामुळे ठाकरे गटात (Uddhav Thackeray) प्रचंड मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नगरसेवक नाराज झाल्यास ते वेगळी भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे आता या संभाव्य निर्णयाचे ठाकरे गटात काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  (Mumbai News)

ज्येष्ठ नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार नसली तरी  माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार ठाकरे गटाकडून सुरु आहे. यामुळे पक्षात नवे व जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखून ठाकरेंच्या सेनेचे किमान 70 टक्के नवे चेहरे उमेदवार असतील. त्यानुसार मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी रणनीती आखत आहेत.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्याप युतीची घोषणा केली नसली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संयुक्त बैठका झाल्या आहेत. यामध्ये प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांची ताकद आणि प्रभाव याचा विचार करून जागावाटपाचा विचार केला आहे. शिवसेनेने 2017 च्या महापालिका निवडणुकीत 84 जागा जिंकल्या होत्या. मात्र, त्यातील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांच्या जागी नवीन चेहरे मैदानात उतरविण्यात येणार आहेत. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारीची संधी दिली जाणार नाही. परंतु, त्यांच्या वॉर्डातील उमेदवार निश्चित करताना त्यांचे अनुभव, पक्षातील योगदान लक्षात घेऊन त्यांचेही मत विचारात घेतले जाणार आहे. यामुळे नव्या पिढीला संधी मिळून पक्षात तरुण नेतृत्वाचा सहभाग वाढेल.

Eknath Shinde: आपल्याला निवडणूक महायुतीतच लढायची आहे: एकनाथ शिंदे

आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीत लढवायच्या असल्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना केली आहे. त्यासाठी आपापल्या मतदारसंघांमध्ये फिरुन कामाला लागा. अगदीच जिथे काही जुळून येत नसेल तिथे शेवटचा पर्याय म्हणून मैत्री पूर्ण लढत करू, अन्यथा सर्वत्र महायुतीच निवडणूक लढवू, असे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना सांगितले.

आणखी वाचा

...म्हणून मी शिवसेना सोडली, नारायण राणेंनी सांगितलं शिवसेना सोडण्याचं कारण? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
Embed widget