एक्स्प्लोर
Mumbai Local Accident Update : मुंब्रातील अपघात प्रकरणात मनसे आक्रमक, अविनाश जाधव यांचे शिष्टमंडळ ठाणे स्थानकात दाखल, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांना दिलं निवेदन
Mumbai : मुंब्रातील अपघात प्रकरणात मनसे चांगलीच आक्रमक झाली असून मनसे नेते अविनाश जाधव यांचे शिष्टमंडळ ठाणे स्थानकात दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांना दिलं निवेदन दिलंय.
Mumbai Local Accident Update
1/5

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेविरोधात मनसेने रेल्वे प्रशासनावर धडक मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात आता मनसे शिष्टमंडळ ठाणे रेल्वे स्थानकात दाखल झाले आहे.
2/5

यावेळी बोलताना मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले की, एका महाराष्ट्र सैनिकाने या अपघाताबद्दल आधीच रेल्वे प्रशासनाला सूचना दिली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आले आहे. या वेळी स्टेशन मास्तर, आरपीएफ, जीआरपी यांचे अधिकारी देखील उपस्थित होते.
3/5

मनसेने गावदेवी मैदानापासून ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत भव्य मोर्चा काढला आहे.
4/5

मनसेचा रेल्वेविरोधातील मोर्च्यात मनसेनं रेल्वे प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत.
5/5

यात स्वतंत्र रेल्वे बोर्ड मुंबईसाठी असावे, 8 हजार केसेस अपघाताच्या पेंडिंग आहेत, त्या आधी सोडवाव्या, प्लॅटफॉर्म वरील स्टॉल्स काढून टाकावे, प्रत्येक लोकलमध्ये 2 एसी डबे असावे, अशा काही मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
Published at : 10 Jun 2025 11:24 AM (IST)
आणखी पाहा























