एक्स्प्लोर
उत्तर भारतात उष्णतेच्या झळा, तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढे
देशात तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. अनेक राज्यात तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढ गेला आहे.
IMD Weather
1/9

देशात दिवसेंदिवस तापमानाचा (Temperature) पारा वाढत आहे. उष्णतेमुळं नागरिकांच्या अंगाची काहीली होत आहे.
2/9

उष्णतेच्या (Heat) पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.
3/9

काही राज्यांमध्ये उष्णतेनं कहर केलाय. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), दिल्ली (Delhi) आणि राजस्थानमध्ये (Rajasthan) या तीन राज्यात तापमानाचा पारा हा 46 अंशाच्या पुढे गेला आहे.
4/9

उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) हे शहर देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. या शहराचं तापमान हे 46.9 अंशांवर गेलं आहे.
5/9

देशातील बहुतांश शहरात तापमान हे 40 अंशाच्या पुढे गेलं आहे. वाढत्या तापमानामुळं नागरिकांना त्रासाला सामोर जावं लागत आहे.
6/9

उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानबरोबरच इतर अनेक शहरात तापमानात वाढ झालीय.
7/9

गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेशातही तापमानाचा पारा हा 45 अंशाच्या आसपास गेला आहे.
8/9

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार काल (17 मे) उत्तर प्रदेशातील आग्रा हे शहर देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. येथील कमाल तापमान 46.9 अंशांवर नोंदवले गेले आहे.
9/9

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 18 मे ते 21 मे पर्यंत उत्तर प्रदेशात कमाल तापमान 45 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
Published at : 18 May 2024 01:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
























