एक्स्प्लोर
Immunity Tips : रिकामी पोटी 'या' 3 गोष्टी खाऊ नका; रोगप्रतिकारकशक्तीवर होईल परिणाम!
Immunity Tips : रिकाम्या पोटी आंबट फळं, ब्लॅक कॉफी किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्याने पोटाचं संतुलन बिघडतं. योग्य, हलका आणि पौष्टिक नाष्टा केल्याने दिवसभर ऊर्जा आणि आरोग्य टिकून राहतं.
Health Tips
1/12

सकाळी उठल्यावर आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. यासाठीच सकाळी रिकाम्या पोटी काही पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.
2/12

पोट हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि जर आपली पचनशक्ती नीट राहिली तर त्यामुळे आपलं आरोग्यही चांगलं राहतं.
3/12

जर आपलं पोट बिघडलं तर पोटाशी संबंधित अनेक आजार आपल्याला भेडसावू शकतात. यासाठीच कोणताही पदार्थ खाण्याआधी तो आपल्या पोटासाठी योग्य आहे का याचा विचार करणं फार गरजेचं आहे.
4/12

याचं कारणं म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आपली पचनशक्ती बिघडू शकते.
5/12

सकाळचा पोटभर नाश्ता केल्यानंतरही जर तुम्हाला भूक लागत असेल तर याचा अर्थ तुम्ही पोटभर नाश्ता करत नाही किंवा जो नाश्ता करता तो तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाहीये.
6/12

आंबट फळं जसे की, संत्र, लिंबू, डाळिंब आणि आवळा या फळांमध्ये व्हिटॅमिन C जास्त प्रमाणात आढळते.
7/12

ही फळं तुमच्या रोगप्रतिकारकशक्तीसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. पण जर ही फळं तुम्ही रिकाम्या पोटी खाल्ली तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
8/12

कारण यातील सिट्रिक ऍसिड थेट तुमच्या पोटाच्या आतल्या आतडीवर परिणाम करू शकतं. त्यामुळे तुमच्या पोटात जळजळ, पोटदुखी आणि गॅस निर्माण होऊ शकते.
9/12

जास्त ऍसिडमुळे तुमच्या पोटाचं पीएच संतुलन बिघडू शकतं. तसेच, यामुळे तुमचे दातही कमकुवत होऊ शकतात.
10/12

तुमची पाचनशक्ती निरोगी राहण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून तो पिऊ शकता.
11/12

तसेच सकाळी रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी, तळलेले पदार्थ किंवा पोटभर नाश्ता करणं टाळावं.
12/12

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Published at : 25 Oct 2025 04:14 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























