एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bollywood War Films: सैनिकहो तुमच्यासाठी! भारतीय जवानांच्या कामगिरीला सलाम करणारे हे चित्रपट पाहिलेत का?
Bollywood War Films: बॉलिवूडमध्ये असे काही सुंदर सिनेमे आहेत जे देशासाठी युद्धात लढा देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या जीवनांवर आधारित आहेत. अशाच काही युद्धाच्या काहाण्या सांगणाऱ्या सिनेमांवर नजर टाकूया...
![Bollywood War Films: बॉलिवूडमध्ये असे काही सुंदर सिनेमे आहेत जे देशासाठी युद्धात लढा देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या जीवनांवर आधारित आहेत. अशाच काही युद्धाच्या काहाण्या सांगणाऱ्या सिनेमांवर नजर टाकूया...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/d7272902e3192d410b334201815d4be41688301585535704_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bollywood War Films
1/8
![अलीकडेच शेरशहा सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे.1999 च्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या जीवनावर आधारित सिनेमा आहे.शेरशहा सिनेमाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/1f090fd36716ca48b1c58c91651aa011a7500.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच शेरशहा सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे.1999 च्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या जीवनावर आधारित सिनेमा आहे.शेरशहा सिनेमाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे.
2/8
!['एलओसी कारगिल' - हा सिनेमा कारगिल युद्धावर आधारित आहे. या सिनेमात अजय देवगण, सुनिल शेट्टी, सैफ अली खान, मनोज वाजपेयी, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि संजय कपूर या स्टार कास्टचा समावेश होता. या प्रत्येकांनी सिनेमात जबरदस्त भूमिका पार पाडल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/fc416a8b8e4290ade51041ea314114fba98cb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'एलओसी कारगिल' - हा सिनेमा कारगिल युद्धावर आधारित आहे. या सिनेमात अजय देवगण, सुनिल शेट्टी, सैफ अली खान, मनोज वाजपेयी, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि संजय कपूर या स्टार कास्टचा समावेश होता. या प्रत्येकांनी सिनेमात जबरदस्त भूमिका पार पाडल्या आहेत.
3/8
!['गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल' - हा सिनेमा 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात जान्हवी कपूरने भारतीय हवाई दलातील पायलट गुंजन सक्सेना यांची भूमिका केली होती. या सिनेमाचा पूर्ण फोकस एक महिला पुरूषासाठी आरक्षित असलेल्या क्षेत्रात संधी मिळाली, तर स्वत:च्या कर्तृत्वानं जबरदस्त कामगिरी करू शकते. ह्यावर राहिला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/7472d6ba1a0daec14267b7fb20c81276fd9d5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल' - हा सिनेमा 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात जान्हवी कपूरने भारतीय हवाई दलातील पायलट गुंजन सक्सेना यांची भूमिका केली होती. या सिनेमाचा पूर्ण फोकस एक महिला पुरूषासाठी आरक्षित असलेल्या क्षेत्रात संधी मिळाली, तर स्वत:च्या कर्तृत्वानं जबरदस्त कामगिरी करू शकते. ह्यावर राहिला आहे.
4/8
!['बॉर्डर सिनेमा' - 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित बॉर्डर सिनेमाला लोकांचं भरपूर प्रेम मिळालं. या सिनेमात बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट होती. सिनेमाची शेवटची 15 मिनिटे युद्धात दोन्ही बाजूकडील देशाचं झालेलं नुकसान दाखवण्यात आलं आहे. या युद्धावर आधारित सिनेमा असाला तरी, शेवटी सिनेमातून युद्ध न करण्याचा संदेश दिला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/e1e84f6aab3ff8afc8a60a173caa599353d44.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बॉर्डर सिनेमा' - 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित बॉर्डर सिनेमाला लोकांचं भरपूर प्रेम मिळालं. या सिनेमात बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट होती. सिनेमाची शेवटची 15 मिनिटे युद्धात दोन्ही बाजूकडील देशाचं झालेलं नुकसान दाखवण्यात आलं आहे. या युद्धावर आधारित सिनेमा असाला तरी, शेवटी सिनेमातून युद्ध न करण्याचा संदेश दिला आहे.
5/8
!['हकीकत' -1964 मध्ये 'हकीकत' सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा 1962 च्या भारत-चीन युद्धावर आधारित सिनेमा आहे.लडाख प्रदेशातील चुशुल खोऱ्यातील रेझांग ला या पर्वतीय भागात भारतीय सैनिकांनी लढा दिला होता.1962 च्या युद्धात 120 भारतीय सैनिकांनी चीनच्या 1300 सैनिकांना धूळ चारली होती.हे युद्ध भारतीय सैनिक प्रतिकुल परिस्थितीतही निकारानं लढा देऊ शकतं, हे दाखवून दिलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/8225e881b2a7e5b3d8d0f46a6354fd81d044d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'हकीकत' -1964 मध्ये 'हकीकत' सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा 1962 च्या भारत-चीन युद्धावर आधारित सिनेमा आहे.लडाख प्रदेशातील चुशुल खोऱ्यातील रेझांग ला या पर्वतीय भागात भारतीय सैनिकांनी लढा दिला होता.1962 च्या युद्धात 120 भारतीय सैनिकांनी चीनच्या 1300 सैनिकांना धूळ चारली होती.हे युद्ध भारतीय सैनिक प्रतिकुल परिस्थितीतही निकारानं लढा देऊ शकतं, हे दाखवून दिलं होतं.
6/8
!['उरी द सर्जिकल स्ट्राइक' - हा 2019 मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून करण्यात आलेल्या ऑपरेशनवर आधारित सिनेमा आहे. या सिनेमात विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली होती. हा सिनेमाही भारतीयांनी खूप पसंत केलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/1b7ed1bf794b9d001dc390d4ad88db759b0dd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'उरी द सर्जिकल स्ट्राइक' - हा 2019 मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून करण्यात आलेल्या ऑपरेशनवर आधारित सिनेमा आहे. या सिनेमात विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली होती. हा सिनेमाही भारतीयांनी खूप पसंत केलं होतं.
7/8
![द गाझी अटॅक'- हा सिनेमा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.हा सिनेमा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. भारतीय नौदलानं पाकिस्ताच्या पाणबुडीला समुद्रातच जलसमाधी दिली होती. या सिनेमात राणा दग्गुबती आणि केके मेनन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/abad5a5f910d8739fc4b7022962396cd205b7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
द गाझी अटॅक'- हा सिनेमा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.हा सिनेमा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. भारतीय नौदलानं पाकिस्ताच्या पाणबुडीला समुद्रातच जलसमाधी दिली होती. या सिनेमात राणा दग्गुबती आणि केके मेनन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
8/8
!['लक्ष्य सिनेमा' - 2004 मध्ये लक्ष्य सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा कारगिल युद्धावर आधारित सिनेमा आहे. सिनेमात अमिताभ बच्चन आणि ऋतिक रोशन यांच्या मुख्य भूमिका आहेत. ऋतिकच्या जबरदस्त अभिनयामुळे सिनेमा खूप गाजला. हा सिनेमाही प्रेक्षकांना खूप आवडला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/a3a1bccbe95fd98ee0af90ca7226e7ed8969e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'लक्ष्य सिनेमा' - 2004 मध्ये लक्ष्य सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा कारगिल युद्धावर आधारित सिनेमा आहे. सिनेमात अमिताभ बच्चन आणि ऋतिक रोशन यांच्या मुख्य भूमिका आहेत. ऋतिकच्या जबरदस्त अभिनयामुळे सिनेमा खूप गाजला. हा सिनेमाही प्रेक्षकांना खूप आवडला होता.
Published at : 03 Jul 2023 12:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)