Nepal Protest : 'राजा आणा, देश वाचवा' नेपाळमध्ये जी राजेशाही हद्दपार केली तीच परत आणा अशी मागणी करत लोकं रस्त्यावर का उतरले?
गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनाचे मुख्य संयोजक नवराज सुबेदी यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी या आंदोलनाचा प्रमुख कमांडर दुर्गा परसाई याचा शोध सुरू आहे.

Nepal Protest : राजेशाहीच्या मागणीसाठी नेपाळमध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. हिंसाचाराला प्रोत्साहन, खाजगी मालमत्तेचे नुकसान आणि जाळपोळ केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी 105 जणांना अटक केली आहे. यामध्ये राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे उपाध्यक्ष रवींद्र मिश्रा, सरचिटणीस धवल समशेर राणा यांचा समावेश आहे. याशिवाय स्वागत नेपाळ, शेफर्ड लिंबू आणि संतोष तमांग यांसारख्या राजेशाहीचे समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांसह अन्य 17 नेत्यांचाही समावेश आहे. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनाचे मुख्य संयोजक नवराज सुबेदी यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी या आंदोलनाचा प्रमुख कमांडर दुर्गा परसाई याचा शोध सुरू आहे. 40 हून अधिक नेपाळी संघटनांच्या आंदोलकांनी शुक्रवारी काठमांडूच्या तिनकुने येथे एका इमारतीची तोडफोड केली आणि ती पेटवून दिली. आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली, ज्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा जवानांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
काठमांडूमधील कर्फ्यू हटवला
आंदोलकांनी सरकारला एका आठवड्याचा अल्टिमेटम दिला
शुक्रवारी आंदोलक 'राजा आणा, देश वाचवा', 'भ्रष्ट सरकार खाली करा', 'आम्हाला राजेशाही परत हवी' अशा घोषणा देत होते. त्यांनी सरकारला एका आठवड्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांच्या मागण्यांवर कारवाई न झाल्यास आणखी हिंसक आंदोलने होतील, असे त्यांचे म्हणणे आहे. नेपाळचे माजी राजा ज्ञानेंद्र यांनी 19 फेब्रुवारी रोजी प्रजासत्ताक दिनी जनतेकडे पाठिंबा मागितला होता. तेव्हापासून देशात ‘राजा आणा, देश वाचवा’ आंदोलनाची तयारी सुरू होती.
Violence led to the death of at least two people, including a journalist, in Nepal, as riot police tried to break up a rally by thousands of protesters demanding the restoration of constitutional monarchy https://t.co/Rz1aXszw24 pic.twitter.com/1gnsgHIlfz
— Reuters (@Reuters) March 28, 2025
राजा ज्ञानेंद्रवर कौटुंबिक हत्याकांडाचा आरोप
1 जून 2001 रोजी झालेल्या नारायणहिटी हत्याकांडात नेपाळचे माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांच्यावर त्यांच्या कुटुंबीयांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेत राजा वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह राजघराण्यातील 9 जणांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडासाठी क्राउन प्रिन्स दीपेंद्र यांना अधिकृतपणे जबाबदार धरण्यात आले. मात्र, ज्ञानेंद्र यांनी सत्ता मिळविण्यासाठी हा कट रचल्याचे अनेकांचे मत आहे, कारण त्या रात्री राजवाड्यात ते उपस्थित नव्हते आणि त्यांच्या कुटुंबाला कोणतीही हानी झाली नाही. या रहस्यमय हत्येमागील सत्य आजही वादग्रस्त आहे.
87 वर्षीय नवराज सुवेदी या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत
नवराज सुवेदी या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. राज इन्स्टिट्यूशन रिस्टोरेशन चळवळीशी त्यांचा संबंध आहे. नेपाळमध्ये राजेशाही पुनर्स्थापित करणे हा त्याचा उद्देश आहे. खरे तर नेपाळमध्ये 2006 मध्ये राजेशाहीविरुद्धचे बंड अधिक तीव्र झाले. अनेक आठवड्यांच्या निदर्शनांनंतर तत्कालीन राजा ज्ञानेंद्र यांना त्याग करून सर्व सत्ता संसदेकडे सोपवावी लागली. मात्र आता नेपाळमधील जनता भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि वारंवार होणाऱ्या सत्ताबदलामुळे हैराण झाली आहे. या चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांनी त्यांचे नाव पुढे केले तेव्हा सुवेदी यांचे नाव चर्चेत आले. तथापि, नेपाळच्या प्रमुख राजेशाही पक्षांमध्ये, जसे की राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी (RPPA) आणि RPPA नेपाळ, त्यांच्या नेतृत्वाबद्दल काही असंतोष आहे. नवराज सुबेदी म्हणाले, "आम्ही आमच्या मागण्या शांततेने मांडत आहोत, मात्र सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आम्हाला आंदोलन अधिक तीव्र करण्यास भाग पाडले जाईल. आमचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील."
इतर महत्वाच्या बातम्या
























