एक्स्प्लोर

'या' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागेल, जाणून घ्या

शरीराला सुरळीत चालू ठेवण्यासाठी आपल्याला अनेक व्हिटामिनची आवश्यकता असते. गरजेच्या असणाऱ्या व्हिटामिनपैकी एकही व्हिटामिन कमी पडले तर बरेच आजार मागे लागू शकतात.

Disease Cause Due To Vitamin Deficiencies : गाडी निट चालण्यासाठी ज्याप्रमाणे पेट्रोलची गरज असते, तशीच आपल्या शरीराला गरज असते ती व्हिटामिनची. शरीराला सुरळीत चालवण्यासाठी विविध पदार्थातून  व्हिटामिन शरीरात जायला हवेत. व्हिटामिन कमतरतेमुळे तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया कोणत्या व्हिटामिनच्या कमरतेमुळे कोणता आजार होतो. 

व्हिटामिन बी

व्हिटामिन बी आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्हिटामिन बी चे अनेक प्रकार आहेत. या प्रकारांचे देखील आपल्या शरीरात फार महत्व आहे. शरीरात व्हिटामिन  B1 आणि व्हिटामिन  B2 ची कमतरता असेल तर नर्व्हस सिस्टम, स्किन, डोळे या भागांवर थेट परिणाम होतो. तसेच व्हिटामिन  B3 च्या कमतरतेमुळे थकवा , उलटी आणि पचन प्रक्रिया नीट न होणे या समस्या उद्भवतात. B6 च्या कमतरतेमुळे डिप्रेशन, कन्फ्यूजन, अॅनेमियाचा सामना करावा लागतो. तसेच व्हिटामिन  B12 मुळे भूक न लागणे, पोटात गॅस तयार होणे श्वास घेण्यास त्रास होणे असे आजार होऊ शकतात. व्हिटामिन बी हे जीन्स आणि डीएनए आपल्या शरीरात तयार करण्यासाठी फार महत्वाचे असते. शरीरात रेड ब्लड सेल्स तयार करण्याचे कामही व्हिटामिन बी करते. व्हिटामिन बीची कमतरता भरून काढायची असल्यास रोजच्या आहारात अंडे, मटण, मासा आणि दुधाचे पदार्थ यांचा समावेश करावा. 

व्हिटामीन ए

इतर व्हिटामिन प्रमाणेच व्हिटामिन ए शरीरासाठी फार महत्वाचे आहे. हे एक उत्कृष्ट अँटिऑक्सिडेंट आहे जे फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करण्यास मदत करते. शरीराच्या विकासातही ते खूप महत्त्वाची भूमिका बजावते. व्हिटॅमिन एच्या कमतरतेचा सर्वात जास्त परिणाम डोळ्यांवर होतो. त्याच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत राहते. तुम्हाला वारंवार संसर्ग होऊ शकतो.

व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे तुम्हाला अॅनिमियाचा देखील होऊ शकतो. मूत्रमार्गाच्या संसर्गाव्यतिरिक्त श्वसनाचा त्रास उद्भवू शकतो. व्हिटामिन ए च्या कमतरतेमुळे यकृताचे आजारही होऊ शकतात. हे व्हिटामिन आपल्या शरीराच्या स्किन , केस , दात आणि हिरड्या यासाठी सुद्धा महत्वाचे असते. सोबतच व्हिटामिन ए च्या अभावामुळे  स्किनच्या समस्या निर्माण होतात. व्हिटामीन ए आपल्या हाडांना भक्कम बनवते. गहू, पालक, पालेभाज्या, केळी, गाजर, सोयाबीन इ. समावेश आहारात करावा. 

व्हिटामिन के

व्हिटामिन के च्या कमतरतेमुळे अनेक भयंकर आजारांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर व्हिटामिन के संतुलित मात्रामध्ये असणे गरजेचे आहे. याच्या अभावामुळे ऑस्टियोपोरोसिस हा आजार तुम्हाला होऊ शकतो. तसेच कर्करोग होण्याचीही रिस्क मोठ्या प्रमाणात वाढू शकते. शरीरातील धमन्या कडक होतात. मासिक पाळीमध्ये पोटात खूप दुखणे , जास्त प्रमाणात रक्त जाणे अशा अनेक समस्या व्हिटामिन के च्या कमतरतेमुळे होतात. याची कमतरता भासू नये म्हणून कीवी, लाल मिरची, ब्रोकली, ऑलिव ऑईल हे खाऊ शकता. 

व्हिटामिन सी

शरीराच्या योग्य विकासासाठी व्हिटॅमिन सी देखील खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे केवळ त्वचेच्या समस्या उद्भवत नाहीत तर दात आणि हिरड्यांवरही त्याचा विशेष परिणाम होतो. शरीरात व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे, कोलेजनची कमतरता निर्माण होते. त्यामुळे हिरड्यांमधून रक्त येते. तसेच पुन्हा पुन्हा दात तुटू शकतात. व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडू शकता. तुम्हाला थकवा, स्नायू दुखणे, अशक्तपणा जाणवू शकतो. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर तुमच्या जखमा बऱ्या होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. व्हिटॅमिन सीची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मोसंबी, लिंबू, संत्री, जॅकफ्रूट, द्राक्षे, पुदिना, टोमॅटो,  फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करू शकता.

व्हिटामिन डी

शरीराच्या योग्य वाढीसाठी व्हिटामिन डी ची आवश्यकता असते. याच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात. अर्थराइटिस, ऑस्टियोपोरोसिस असे भयानक आजार तुम्हाला होऊ शकतात.  शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, हाडे ठिसूळ होतात आणि ते लगेच मोडू शकतात. यावरील सगळ्यात चांगला उपाय म्हणजे सकाळचे कोवळे ऊन. सकाळी उठल्या उठल्या कोवळ्या ऊन्हात 15 मिनट बसला तर व्हिटामिन डी तुम्हाला मिळू शकते. 

व्हिटामिन ई

त्वचा आणि सुंदर केसांकरीता व्हिटामिन ई चा आहारात समावेश असणे गरजेचे असते. तसेच व्हिटामिन ई तुमचे अनेक आजारांपासून संरक्षण करू शकते. व्हिटामिन ई कमतरतेमुळे इम्यून सिस्टम कमजोर बनू शकते. डोळ्यांचे आजार उद्भवू शकतात. याव्यतिरीक्त व्हिटामिन ई कोलेस्ट्रॉल नियंत्रणीत ठेवण्यास मदत करते. याची कमतरता भरून काढण्यासाठी पालक , बदाम , भुईमूग , अंडे , पालेभाज्या , आंबा याचा समावेश आहारात करावा. 

 

इतर महत्वाच्या बातम्या

Latur Pattern: शंभर नंबरी 'लातूर पॅटर्न'... दहावीच्या निकालात लातूरची भरारी...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Tiranga Morcha: 'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार
'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Chatur Maas 2026: अखेर चातुर्मासाला सुरूवात! पुढचे 4 महिने भगवंत योगनिद्रेत, आता सृष्टीचा कारभार कोण सांभाळणार? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा जाणून थक्क व्हाल
अखेर चातुर्मासाला सुरूवात! पुढचे 4 महिने भगवंत योगनिद्रेत, आता सृष्टीचा कारभार कोण सांभाळणार? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा जाणून थक्क व्हाल

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget