एक्स्प्लोर

Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा'साठी पॉलिस्टर, खादी उद्योगावर परिणाम; ग्रामीण रोजगाराच्या हिरावल्या संधी

Har Ghar Tiranga Campaign : पॉलिस्टर ऐवजी खादीचे ध्वज सक्तीचे झाले असते तर पुन्हा ग्रामीण रोजगाराला चालना मिळाली असती आणि खादीच्या विशिष्ट धाग्यांपासून कापड विणण्यासाठी हजारो ग्रामीण हात मोठ्या उमेदीने सक्रिय झाले असते.

वर्धा :  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभरात साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत 'हर घर तिरंगा' मोहिम राबवली जाणार आहे त्यासाठी प्रशासनाच्या वतीने भारतीय ध्वज विक्रीस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतीय ध्वज हा खादी कापडापासून बनलेला असतो. मात्र 'हर घर तिरंगा' मोहिमेसाठी हे ध्वज पॉलिस्टर या कापडापासून बनविलेले असणार आहेत. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना ते खरेदी करता येतील.  मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खादी व्यवसायावर मोठा परिणाम झाला. विशेषतः वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांच्या रोजगाराची संधी हिरावल्या गेली,असं म्हणायला हरकत नाही. कारण जर पॉलिस्टर ऐवजी खादीचे ध्वज सक्तीचे झाले असते तर पुन्हा ग्रामीण रोजगाराला चालना मिळाली असती आणि खादीच्या विशिष्ट धाग्यांपासून कापड विणण्यासाठी हजारो ग्रामीण हात मोठ्या उमेदीने सक्रिय झाले असते.

वर्धा जिल्ह्यात तयार केला जाणारा खादीचा कापड अतिशय मोलाचा आहे. महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा लाभला आहे, आताही खादी पासून तयार केले गेलेल्या ध्वजांची मागणी इतर जिल्ह्यातून देखील आहे. त्यासाठी ग्रामसेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि खादी व्यवसायिक रात्रंदिवस एक करून मेहनत घेत आहेत. मात्र कमी वेळेत दिलेले उद्दिष्ट पूर्ण होणे अशक्य आहे असेच चित्र समोर दिसत आहे.


Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा'साठी पॉलिस्टर, खादी उद्योगावर परिणाम; ग्रामीण रोजगाराच्या हिरावल्या संधी

सेवाग्राम आणि खादी मुळेच वर्ध्याची सातासमुद्रपार ओळख 

वर्धा जिल्ह्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खादी उद्योगाला चालना दिली त्यासाठी अनेक ग्रामीण भागातील बेरोजगार हातांना काम मिळाले होते.  वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खादीचे कापड तयार केले स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार असलेलं सेवाग्राम आश्रम आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा लाभलेली खादी, यांच्यामुळेच वर्धा जिल्ह्याला सातासमुद्र पार ओळख आहे. खादीपासून बनलेले मास्क देखील कोरोनाकाळात विदेशात पोहोचले होते. 

वर्धा खादी ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्षा करुणा फुटाणे म्हणाल्या, वर्धा जिल्ह्यात अनेक खादी संस्था आहेत आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या चार ते पाच हजार लोकांचे रोजगार या व्यवसायावर अवलंबून आहे. जर हे झेंडा बनवण्याचं काम सहा महिने आधी दिलं गेलं असतं तर निर्मिती झाली असती. स्थानीय कापसाला देखील चांगला भाव असता, शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळालं असतं. मात्र आज जो प्रश्न होणार आहे की,  एवढा मोठ्या प्रमाणावर झेंडे बनवले जात असताना 15 ऑगस्ट नंतर या झेंड्यांकडे दुर्लक्ष होऊ शकतं. झेंडे जर खादीचे असते तर ही समस्या आली नसती,कारण खादीच्या ध्वजामध्ये एक वैशिष्ट्य आहे.  खादीसाठी लागणारे सर्व कच्चामाल हा स्थानिक असतो. 


Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा'साठी पॉलिस्टर, खादी उद्योगावर परिणाम; ग्रामीण रोजगाराच्या हिरावल्या संधी

खादी व्यावसायिकांकडे 'उद्दिष्ट मोठं वेळ कमी' 

खादीचे  कापड हाताने बनवले जाते त्यासाठी मोठा कालावधी लागतो. वर्धा येथील खादी व्यावसायिकांना इतरही जिल्ह्यातून तिरंग्याची मागणी केली गेली आहे. त्यासाठी खादी व्यवसायिक रात्रंदिवस एक करून उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र 'उद्दिष्ट मोठा आणि वेळ कमी', अशी परिस्थिती उद्भवली आहे. कमी वेळेत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे अशक्य आहे, अशा प्रतिक्रिया खादी व्यवसायिकांनी व्यक्त केल्या आहेत. जर हेच उद्दिष्ट काही महिन्यांआधी दिलं गेलं असतं तर यातून लाखो लोकांना रोजगारही मिळाला असता. खादी व्यवसायाला, एकूणच ग्राम उद्योगाला चालना मिळाली असती, आणि झेंड्याचे महत्त्व टिकवून ठेवता आलं असतं अशी प्रतिक्रिया सेवाग्रामच्या मस्लीन खादीचे संचालक  बळवंत ढगे यांनी दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Kumar Mishra : ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Vidhan Parishad Speech | कार्यकर्त्यांनो पेटवा मशाल आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल, ठाकरेंवर हल्लाबोलUjjwal Nikam On Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सुनावणी, कोर्टात काय घडलं? वरिष्ठ वकील निकमांनी सांगितली A TO Z माहितीABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 26 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सAnil Parab vs Fadnavis : शिंदेंसारखे मुंबई रस्त्यावर उरुन डीप क्लिनिंग करणार का? परबांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Kumar Mishra : ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
आयुर्वेदिक डॉक्टरचा देशी जुगाड, उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कारला केलं शेणाचं लेपन, 50 टक्के तापमान कमी 
आयुर्वेदिक डॉक्टरचा देशी जुगाड, उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कारला केलं शेणाचं लेपन, 50 टक्के तापमान कमी 
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
Ajit Pawar : अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
Embed widget