एक्स्प्लोर

96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजलं, वर्ध्यातील उत्तम आयोजनाचं कौतुक

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan :वर्धा येथे सुरू असलेल्या 96 व्या  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची (96 Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) आज सांगता झाली.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : वर्धा येथे सुरू असलेल्या 96 व्या  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची (96 Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) आज सांगता झाली. संमेलनाचा समारोप सोहळा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. या संमेलानचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघाच्या वतीने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचं उत्तम आयोजन वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात वर्धा प्रशासनानं केलं. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उपस्थित सर्वांनीच आयोजकांचं कौतुक केलं. 

वर्धा येथे 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले खरे, परंतु या साहित्य संमेलनाला साहित्यिक प्रेमींनी मात्र म्हणावा तसा प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र होतं.  3 फेब्रुवारी रोजी परंपरागत ग्रंथ दिंडीने साहित्य संमेलनाला सुरुवात झाली होती . या संमेलनाच्या अनुषंगाने वर्धा नगरीतील नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ग्रंथ दिंडीमध्ये विठ्ठल-रुखमाई, संत समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ, चक्रधर स्वामी, महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, संत जनाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ, झांशीची राणी लक्ष्मीबाई, रझिया सुलताना, मदर टेरेसा आदी महापुरुषांच्या वेशभूषेत विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रगल्भ झालेल्या वर्धा नगरीत 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले.  

काल संमलेनात नागराज मंजुळे, किशोर कदम, सयाजी शिंदे, अरविंद जगताप यांची मुलाखत बालाजी सुतार यांनी घेतली होती. यावेळी प्रांगण ओसंडून वाहिलेलं दिसून आलं. 

साहित्य संमेलनाला प्रतिसाद कमी

96 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. संमेलनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी देखील आचार्य विनोबा भावे या मुख्य सभागृहासह इतर सभागृहात उपस्थितांची संख्या अतीशय कमी होती. पहिल्या दिवशी संमेलनाचे अध्यक्ष माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे अध्यक्षीय भाषण सुरू असताना देखील मुख्य सभागृहात 90% खुर्च्या रिकाम्या होत्या. दुसऱ्या दिवशीही फारशी स्थिती बदललेली नव्हती. त्यामुळे साहित्य संमेलन सरकारी अनुदानावर चालणारी सहल बनले आहे का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
Embed widget