एक्स्प्लोर

Dombivli MIDC Blast: डोंबिवली MIDC स्फोट बॉयलरचा नव्हे, तर कशाचा? अग्निशमन दलाची माहिती, बफर झोनबाबत धक्कादायक माहिती

Dombivli News: डोंबिवली एमआयडीसी स्फोटात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवेत धोकादायक रसायने. अग्निशमन दलाची नवी माहिती. बफर झोनचे नियम न पाळल्याने नागरिकांच्या जीवाला धोका

डोंबिवली: डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटाबाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे. कालपर्यंत ही दुर्घटना केमिकल कंपनीतील बॉयलरच्या स्फोटामुळे (Dombivli Blast) घडल्याचे सांगितले जात होते. मात्र, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी याबाबत एक नवीन माहिती दिली. आम्ही सकाळी या कंपनीत सर्वेक्षण केले. त्यावेळी अमुदान कंपनीत बॉयलर अस्तित्त्वातच नसल्याचे दिसून आले. हा जो स्फोट झाला आहे तो बॉयलर नव्हे तर रिअॅक्टरमुळे झाल्याचे दिसत आहे. आम्हाला रिअॅक्टरचा पाया आणि काही तुकडे याठिकाणी दिसून आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

दोन प्रकारचे रिऍक्टर असतात, त्यापैकी हा एक असावा. सध्या डोंबिवली एमआयडीसीमध्ये (MIDC) 90 रिअॅक्टर सुरू आहेत, ज्यांची तपासणी आम्ही केली आहे, जे योग्य स्थितीत आहेत. तर 20 रिअॅक्टर बंद आहेत. अशी माहिती बाष्पके विभागाचे संचालक धवल अंतापुरकर यांनी दिली.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनीही एमआयडीसीला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी सांगितले की, रिअॅक्टरमध्ये तापमान वाढल्यामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाला असावा. संपूर्ण तपासणीनंतर खरं कारण समोर येईल. अमुदान कंपनीत सर्वप्रथम आग लागली, त्यानंतर आग बाजूच्या कंपन्यांम्ध्ये पसरली, असे जाखड यांनी सांगितले.

डोंबिवलीतील जमिनींचा भाव वाढला आणि बफर झोनचे तीनतेरा

या दुर्घटनेनंतर डोंबिवली एमआयडीसीच्या बफर झोनबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 1980 मध्ये डोंबिवलीत एमआयडीसी सुरु झाली तेव्हा रहिवासी भाग दूर होता. औद्योगिक वसाहत आणि रहिवासी या दोन्ही भागांमध्ये एक-दीड किलोमीटर अंतराचा बफर झोन होता. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये डोंबिवलीतील जमिनीचे भाव वाढले. त्यामुळे निवासी संकुले उभारण्यासाठी बफर झोनचा वापर होऊ लागला. अलीकडच्या काळात एमआयडीसी परिसराच्या अगदी जवळ निवासी इमारती उभ्या राहिल्या आहे. काही ठिकाणी रहिवासी आणि इमारती आणि एमआयडीतील कंपन्यांची भिंतही कॉमन आहे. गेल्या काही वर्षांमध्ये औद्योगिक कारणासाठी राखून ठेवलेले डोंबिवलीतील जवळपास 500 भूखंड बिल्डरांनी गिळंकृत केले. त्यावेळी एमआयडीसीने नोटीस पाठवण्यापलीकडे काहीच केले नाही, अशी माहिती कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली. 

आणखी वाचा

केमिकलच्या वाफेमुळे हवेत दुर्गंधी, उद्ध्वस्त ढिगाऱ्यांच्या बाजूला मृतदेहांचे तुकडे, डोंबिवली MIDC मधील भीषण दृश्य

बॉयलरचा तुकडा दीड किमी उडून कारवर पडला, प्रत्यक्षदर्शींनी डोंबिवली स्फोटाची हादरवणारी कहाणी सांगितली!

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! रस्ता नसल्यानं 5 किलोमीटर डोलीतून नेलं, पण रुग्णालय गाठेपर्यंत होत्याचं नव्हत झालं, सर्पदंशामुळं चिमुकल्याचा अंत, आदिवासी भागातील वास्तव समोर
धक्कादायक! रस्ता नसल्यानं 5 किलोमीटर डोलीतून नेलं, पण रुग्णालय गाठेपर्यंत होत्याचं नव्हत झालं, सर्पदंशामुळं चिमुकल्याचा अंत, आदिवासी भागातील वास्तव समोर
नालासोपाऱ्यातील नागेला तलावात बुडून 18 वर्षीय युवकाचा मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर नागरिकांचा संताप
नालासोपाऱ्यातील नागेला तलावात बुडून 18 वर्षीय युवकाचा मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर नागरिकांचा संताप
जीवघेण्या खड्ड्यानं घेतला महिलेचा बळी; दुचाकी घसरल्यानं ट्रकखाली सापडून जागीच मृत्यू, ठाणे-भिवंडी मार्गावरील घटना
जीवघेण्या खड्ड्यानं घेतला महिलेचा बळी; दुचाकी घसरल्यानं ट्रकखाली सापडून जागीच मृत्यू, ठाणे-भिवंडी मार्गावरील घटना
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget