एक्स्प्लोर

तुम्ही मोबाईलच्या आहारी गेला आहात?, इथं चेक करा!

'तुम्ही मोबाईलचे मालक आहात, मोबाईल तुमचा मालक नाही.' या टॅगलाइनखाली मोटोरोलानं #phonelifebalance ही मोहीम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरु केली आहे.

मुंबई : तंत्रज्ञानच्या युगात आपण तांत्रिक ज्ञान आत्मसात केलं नाही तर मागे पडू अशी आज प्रत्येकालाच भीती वाटू लागली आहे. त्यातही मोबाईलसारखं डिव्हाइस आपल्या हाती आल्यानं त्यावर आपण बरंच अवलंबून राहू लागलो आहोत. इतंकच नाही तर आपण अक्षरश: मोबाईलच्या आहारी जात असल्याचंही समोर येत आहे. त्यामुळे आता एका मोबाईल कंपनीनेच याबाबत एक आगळीवेगळी मोहीम सुरु केली आहे. होय... मोटोरोला सारख्या नामांकित मोबाईल कंपनीनं #phonelifebalance ही मोहीम सुरु केली असून यूजर्सला एक प्रकारे सावध करण्याचा त्यांनी प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे. 'तुम्ही मोबाईलचे मालक आहात, मोबाईल तुमचा मालक नाही.' या टॅगलाइनखाली  मोटोरोलानं #phonelifebalance ही मोहीम सोशल मीडियावर सुरु केली आहे. फोटो सौजन्य : मोटोरोला फोटो सौजन्य : मोटोरोला आजची तरुणाई प्रत्यक्ष भेटी-गाठींपेक्षा मोबाइलच्या माध्यमातूनच एकमेकांशी कनेक्ट होऊ लागली आहेत. साधारणपणे याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसंच आपण फोनच्या प्रचंड आहारी जाऊ लागलो आहोत. चार लोकं एकत्र आल्यानंतरही जवळजवळ प्रत्येकजण हा फोनमध्येच गढून गेलेला असतो. या गोष्टीचं प्रमाण कमी होणं गरजेचं आहे. हे ओळखून मोटोरोलानं हे नवं पाऊल उचललं आहे. वारंवार फोन चेक करणं, सतत फोन आपल्या हातात असणं ही फोनच्या आहारी जाण्याची लक्षणं आहेत. पण याशिवाय देखील काही कारणं आहेत. ज्यामुळे आपण नकळतपणे फोनच्या आहारी जातो. आपण फोनच्या आहारी गेलो आहात की नाही हे तपासण्यासाठी मोटोरोलानं एका खास 'क्विझही' (प्रश्नावली) आणलं आहे. यामध्ये यूजर्ससाठी फोन वापरासंबंधी काही वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर तुम्ही फोनच्या किती आहारी गेले आहात याचं उत्तर तुम्हाला तात्काळ मिळेल. यासाठी वेगवेगळ्या लेव्हल देण्यात आल्या आहेत. तुम्ही जर पाचव्या लेव्हलपर्यंत पोहचलात तर तुम्ही फोनच्या प्रचंड आहारी गेला आहात एवढं निश्चित. त्यामुळे फोन हेच आयुष्य आहे असं मानणाऱ्यांसाठी ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. त्यामुळे वेळीच यापासून सावरणं गरजेचं आहे.

तुम्ही फोनच्या आहारी गेला आहात?... चेक करण्यासाठी इथं क्लिक करा. 

  दरम्यान, #phonelifebalance हा हॅशटॅग ट्विटरवर पाहायला मिळत आहे. मोटोरोलाच्या या मोहीमेत अभिनेत्री सोहा अली खान देखील सहभागी झाली आहे. सोहा अली म्हणते की, 'फोनचा वापर मी गरजेपुरता करते.' त्यामुळे तिने देखील एक प्रकारे फोनचा कमी वापर करण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे. मोटोरोलानं फोन लाईफ बॅलन्स (Phone-life balance)यासाठी जी प्रश्नावली विचारली आहे त्याच्याच आधारावर एक डेटाही त्यांनी जाहीर केला आहे. फोन लाईफ बॅलन्समधील (Phone-life balance) डेटावर एक नजर : प्रश्न : तुम्ही कुटुंब आणि फोन यापैकी कुणापासून आठवड्याभर दूर राहू शकता? तुम्ही मोबाईलच्या आहारी गेला आहात?, इथं चेक करा! 45 टक्के पुरुष हे फोनपेक्षा आपल्या कुटुंबाला प्राधान्य देतात. म्हणजेच अजूनही 55 टक्के पुरुष हे आपल्या फोनला महत्त्व देतात. त्यांच्यामते ते कुटुंबापासून आठवडाभर दूर राहू शकतात. पण आपल्या मोबाइलपासून ते दूर राहू शकत नाही. तुम्ही मोबाईलच्या आहारी गेला आहात?, इथं चेक करा! तर 41 टक्के महिला या आपल्या कुटुंबाला प्राधान्य देतात. याचाच अर्थ तब्बल 59 टक्के महिलांनी आपला मोबाईल महत्त्वाचा वाटतो. प्रश्न : तुम्ही किती तास तुमचा फोन तुमच्या हाताजवळ ठेवता? तुम्ही मोबाईलच्या आहारी गेला आहात?, इथं चेक करा! या डेटानुसार यूजर्स जवळजवळ 11 तास आपला फोन हाताजवळ ठेवतात. प्रश्न : एखाद्या अंत्ययात्रेत तुम्ही तुमचा फोन चेक करता का? तुम्ही मोबाईलच्या आहारी गेला आहात?, इथं चेक करा! डेटानुसार प्रत्येकी 10 पैकी एक व्यक्ती ही अंत्ययात्रेला गेली असताना देखील आपला फोन चेक करते. तुम्ही मोबाईलच्या आहारी गेला आहात?, इथं चेक करा! फोन आणि आयुष्य यांचा योग्य मेळ घालणाऱ्या शहरांमध्ये भारतातील मंगलोरचा पहिला क्रमांक लागतो. तुम्ही मोबाईलच्या आहारी गेला आहात?, इथं चेक करा! तर याचबाबतीत स्लोव्हाकिया या देशाचा प्रथम क्रमांक लागतो. यामध्ये भारत पहिल्या पाचामध्ये देखील नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget