एक्स्प्लोर

साताऱ्यात कृष्णा कोयनेसह नद्या ओसंडून वाहिल्या, 350 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं, पुढील 24 तास महत्त्वाचे

सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ; कोयना,कृष्णा आणि वेण्णा नद्यांना महापूर नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Satara Heavy Rains: राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झालाय 10 जण जखमी आहेत. 14 लाख एकर शेती पाण्याखाली गेलीय. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन मदत पथक (NDRF) आणि (SDRF) तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्यात. सातारा घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील सर्व धरणांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा ,उरमोडी नद्यांना पूर आलाय.  सातारा, महाबळेश्वर, पाटण, वाई तालुक्यातील 350 हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलय.

कोयना धरणाचे दरवाजे उघडले, विसर्गात मोठी वाढ

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणात पाणी जलदगतीने भरत आहे. गेल्या 24 तासांत कोयना धरणातून तब्बल 11 वेळा विसर्गात वाढ करण्यात आली. सध्या धरणाचे सर्व दरवाजे 13 फूटांनी उघडे करून तब्बल 95 हजार 300 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण सध्या 102 टक्के क्षमतेने भरले असून परिसरातील अनेक भाग धोक्याच्या स्थितीत आले आहेत.

इतर धरणांचा आढावा

कोयना व्यतिरिक्त कण्हेर धरणातून 14 हजार 876 क्यूसेक, उरमोडी धरणातून 8 हजार 900 क्यूसेस, वीर धरणातून 55 हजार 800 क्यूसेक आणि धोम धरणातून 17 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या विसर्गामुळे नद्या ओसंडून वाहत आहेत. कोयना नदीवरील तांबवे आणि निसरे येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच संगमनगर धक्का पूल आणि मुळगावचा पूलही पाण्यात गेला आहे.

गावांवर संकट, रस्ते बंद

पूरस्थितीचा मोठा फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे. पाटण तालुक्यातील 53 कुटुंबातील 253 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. याशिवाय गुहागरमधील 150 प्रवासी अडकले होते, त्यांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. कराड-चिपळूण मार्गावर पाण्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना धोम बलकवडी उरमोडी तारळी धरणातून विसर्ग सुरू आहे . कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तेरा फुटाणे उचलून 93 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपत्रात केला जात असल्याने कृष्णा व कोयना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे कराडच्या प्रीतीसंगम परिसरातील कृष्णामाई मंदिर मध्ये पाणी घुसले असून आगामी 24 तासात पावसाचा जोर वाढल्यास पाटण कराड व सांगलीला महापुराचा धोका पोचू शकतो असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे

सांगली जिल्ह्यातही इशारा

साताऱ्यासोबतच कृष्णा नदीकाठच्या सांगली जिल्ह्यातील गावांनाही या पुराचा तडाखा बसणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर असून नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता हळूहळू राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. राज्यात अचानक पाऊस वाढण्याचं कारण म्हणजे, पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र. पण, आता हे कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू पुढे सरकत आहे. त्यामुळे आता राज्यभरातील पावसाचा जोर ओसरणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार, खेड ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन, विभागीय आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय
तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार, खेड ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन, विभागीय आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय
Raigad Accident Ambenali Ghat: आंबेनळी अपघातात सर्वात मोठा ट्विस्ट, तब्बल 24 तास स्कॉर्पिओ कोसळल्याचा थांगपत्ता कोणालाच नव्हता, चक्रावणारी माहिती समोर
आंबेनळी अपघातात सर्वात मोठा ट्विस्ट, 24 तास स्कॉर्पिओ कोसळल्याचा थांगपत्ता कोणालाच नव्हता, चक्रावणारी माहिती समोर
Raigad Accident Ambenali Ghat: आसगावच्या प्रत्येक घरात रडण्याचा आवाज, आंबेनळी घाटात एकाच गल्लीतल्या 5 तरुणांचा मृत्यू, आख्खं गाव सुन्न!
आसगावच्या प्रत्येक घरात रडण्याचा आवाज, आंबेनळी घाटात एकाच गल्लीतल्या 5 तरुणांचा मृत्यू, आख्खं गाव सुन्न!
Ambenali Ghat Scorpio Accident: चेंदामेंदा झालेली स्कॉर्पिओ, पाच फूट अंतरावर मृतदेहांची रास, 1000 फूट खाली आंबेनळी घाटातील भयानक दृश्य
चेंदामेंदा झालेली स्कॉर्पिओ, पाच फूट अंतरावर मृतदेहांची रास, 1000 फूट खाली आंबेनळी घाटातील भयानक दृश्य

व्हिडीओ

Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule : 'आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार', पुण्याच्या जमावबंदीवर सुप्रिया सुळेंची आगपाखड, म्हणाल्या 'पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय?...'
'आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार', पुण्याच्या जमावबंदीवर सुप्रिया सुळेंची आगपाखड, म्हणाल्या 'पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय?...'
Ulhasnagar News: ऑपरेशनच्या नावाखाली 4 वेळा उपाशी ठेवलं, महिनाभर रुग्ण हॉस्पिटलमध्येच; उल्हासनगर सरकारी रुग्णालयाचा गलथान कारभार समोर
ऑपरेशनच्या नावाखाली 4 वेळा उपाशी ठेवलं, महिनाभर रुग्ण हॉस्पिटलमध्येच; उल्हासनगर सरकारी रुग्णालयाचा गलथान कारभार समोर
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात उसळी, चांदी घसरली! जाणून घ्या 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे आजचे भाव
सोन्याच्या दरात उसळी, चांदी घसरली! जाणून घ्या 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे आजचे भाव
Eknath Shinde and Amit Shah meet: एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले? शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले? शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Maharashtra School: मोठी बातमी: राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरु ठेवा, दोन दिवस ऑनलाईन वर्ग ठेवण्याची मागणी
मोठी बातमी: राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरु ठेवा, दोन दिवस ऑनलाईन वर्ग ठेवण्याची मागणी
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
IPL 2026 RCB vs GT :  बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
Embed widget