एक्स्प्लोर

साताऱ्यात कृष्णा कोयनेसह नद्या ओसंडून वाहिल्या, 350 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं, पुढील 24 तास महत्त्वाचे

सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ; कोयना,कृष्णा आणि वेण्णा नद्यांना महापूर नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Satara Heavy Rains: राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झालाय 10 जण जखमी आहेत. 14 लाख एकर शेती पाण्याखाली गेलीय. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन मदत पथक (NDRF) आणि (SDRF) तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्यात. सातारा घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील सर्व धरणांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा ,उरमोडी नद्यांना पूर आलाय.  सातारा, महाबळेश्वर, पाटण, वाई तालुक्यातील 350 हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलय.

कोयना धरणाचे दरवाजे उघडले, विसर्गात मोठी वाढ

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणात पाणी जलदगतीने भरत आहे. गेल्या 24 तासांत कोयना धरणातून तब्बल 11 वेळा विसर्गात वाढ करण्यात आली. सध्या धरणाचे सर्व दरवाजे 13 फूटांनी उघडे करून तब्बल 95 हजार 300 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण सध्या 102 टक्के क्षमतेने भरले असून परिसरातील अनेक भाग धोक्याच्या स्थितीत आले आहेत.

इतर धरणांचा आढावा

कोयना व्यतिरिक्त कण्हेर धरणातून 14 हजार 876 क्यूसेक, उरमोडी धरणातून 8 हजार 900 क्यूसेस, वीर धरणातून 55 हजार 800 क्यूसेक आणि धोम धरणातून 17 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या विसर्गामुळे नद्या ओसंडून वाहत आहेत. कोयना नदीवरील तांबवे आणि निसरे येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच संगमनगर धक्का पूल आणि मुळगावचा पूलही पाण्यात गेला आहे.

गावांवर संकट, रस्ते बंद

पूरस्थितीचा मोठा फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे. पाटण तालुक्यातील 53 कुटुंबातील 253 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. याशिवाय गुहागरमधील 150 प्रवासी अडकले होते, त्यांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. कराड-चिपळूण मार्गावर पाण्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना धोम बलकवडी उरमोडी तारळी धरणातून विसर्ग सुरू आहे . कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तेरा फुटाणे उचलून 93 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपत्रात केला जात असल्याने कृष्णा व कोयना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे कराडच्या प्रीतीसंगम परिसरातील कृष्णामाई मंदिर मध्ये पाणी घुसले असून आगामी 24 तासात पावसाचा जोर वाढल्यास पाटण कराड व सांगलीला महापुराचा धोका पोचू शकतो असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे

सांगली जिल्ह्यातही इशारा

साताऱ्यासोबतच कृष्णा नदीकाठच्या सांगली जिल्ह्यातील गावांनाही या पुराचा तडाखा बसणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर असून नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता हळूहळू राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. राज्यात अचानक पाऊस वाढण्याचं कारण म्हणजे, पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र. पण, आता हे कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू पुढे सरकत आहे. त्यामुळे आता राज्यभरातील पावसाचा जोर ओसरणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या खात्याचा धसका की खरंच दूध खराब? साताऱ्यात शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले शेकडो लिटर दूध; Video Viral
तुकाराम मुंढेंच्या खात्याचा धसका की खरंच दूध खराब? साताऱ्यात शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले शेकडो लिटर दूध; Video Viral
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
मुसळधार पावसामुळं साताऱ्यातील आलवडी गावात भूस्खलनाचा धोका,  नागरिकांना स्थलांतर करावं, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मुसळधार पावसामुळं साताऱ्यातील आलवडी गावात भूस्खलनाचा धोका,  नागरिकांना स्थलांतर करावं, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget