एक्स्प्लोर

Raju Shetti on Organic farming : सेंद्रीय शेतीच्या नावाखाली प्रचंड बुवाबाजी, पूर्णतः सेंद्रीय शेतीकडे जाणे हा वेडेपणा ठरेल; राजू शेट्टींचे स्पष्ट मत

Raju Shetti on Organic Farming : एक वर्ग पोटाची आग विझविण्यासाठी खात असून दुसरा वर्ग आरोग्यासाठी, चवीसाठी खातो. सेंद्रीय शेतीचे शंभर टक्के मी समर्थन करत नाही, असेही त्यांनी सांगितले. 

Raju Shetti on Organic Farming : पूर्णतः सेंद्रीय शेतीकडे जाणे हा वेडेपणा ठरेल, सेंद्रीय शेतीच्या नावाखाली प्रचंड बुवाबाजी, फसवणूक चालू असल्याचा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे. पूर्णतः सेंद्रीय शेतीकडे जाणे हा वेडेपणा ठरेल, असा इशाराच त्यांनी दिला आहे. ते सांगलीत अग्रणी शिवार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

सगळ्या जगानं सेंद्रीय शेती करावी या मताचा मी नाही

राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सेंद्रीय शेती वाढली, तर जगामध्ये अन्नधान्याचा आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. सगळ्या जगानं सेंद्रीय शेती करावी (Raju Shetti on Organic farming) या मताचा मी नाही. कारण देश स्वतंत्र झाला, त्यावेळी देश सेंद्रीय शेती करत होता. रासायनिक खते, कीटकनाशके माहीत नव्हते. त्यावेळी लोकसंख्या 35-40 कोटींच्या आसपास असताना  बाहेरच्या देशातून भीक मागून या देशातील जनतेला अन्नधान्य खायला आणावे लागत होते. आज 40 कोटींची लोकसंख्या 140 कोटींवर गेली तरी रासायनिक खतांच्या वापरामुळे पुरेसं अन्नधान्य आज मिळत आहे. एक वर्ग पोटाची आग विझविण्यासाठी खात असून दुसरा वर्ग आरोग्यासाठी, चवीसाठी खातो. सेंद्रीय शेतीचे शंभर टक्के मी समर्थन करत नाही, असेही त्यांनी सांगितले. 

स्वाभिमानी लोकसभेच्या रिंगणात 

दरम्यान, आगामी लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रणशिंग फुंकण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरणार असून राज्यात हातकणंगलेसह पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. हातकणंगले सोडून या कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार? त्याचा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अभ्यास शिबीराच्या सांगता सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राजू शेट्टी यांनी लोकसभेच्या निवडणुकीची माहिती दिली. राजू शेट्टी यावेळी म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आहेत. भाजपमधून या अगोदरच बाजूला झालो आहोत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष चालू आहे. रस्त्यावरची लढाई आमची संपलेली नाही. केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही, असे ठणकावून सांगणे गरजेचे आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :  

विधिमंडळात कशाला जाऊन बसता? आता खऱ्या अर्थाने हेलीकॉप्टरने फिरण्याची गरज, बळीराजाला मदत करायला पाहिजे : संभाजीराजे 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget